शहरं
Join us  
Trending Stories
1
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
4
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
5
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
6
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
7
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
8
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
9
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
10
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
11
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
12
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
13
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
14
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
15
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
16
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
17
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
18
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
19
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
20
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कुठे चाललाय सबका साथ... सबका विकास...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:02 IST

देशात २०१७ मध्ये निर्माण झालेल्या संपत्तीपैकी ७३ टक्के संपत्ती एक टक्का लोकांकडे गेली आहे. देशातील आर्थिक विषमतेची दरी किती वेगाने वाढत आहे, हे दाखविणारे हे आकडे आहेत.‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा देणा-या मोदी सरकारचे धोरण कुणाच्या हितासाठी आहे, असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.

देशात २०१७ मध्ये निर्माण झालेल्या संपत्तीपैकी ७३ टक्के संपत्ती एक टक्का लोकांकडे गेली आहे. देशातील आर्थिक विषमतेची दरी किती वेगाने वाढत आहे, हे दाखविणारे हे आकडे आहेत.‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा देणा-या मोदी सरकारचे धोरण कुणाच्या हितासाठी आहे, असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.भारतात गतवर्षी निर्माण झालेल्या संपत्तीपैकी ७३ टक्के संपत्ती देशातील एक टक्का श्रीमंतांच्या खिशात गेली असल्याचा धक्कादायक अहवाल आॅक्सफॅम या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रसिद्ध केला आहे. यावरून देशाचा विकास कोणत्या दिशेने चालला आहे? कुणाचा विकास कोणत्या गतीने होत आहे, हे स्पष्ट होते. ‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या विकासाच्या दाव्याचाही पोल खोलणारा हा अहवाल आहे.आर्थिक विषमता ही संपूर्ण जगाला ग्रासलेली एक समस्या आहे. भांडवलशाही देशात तर ती अधिकच गंभीर आहे. भारतात १९२२ मध्ये प्राप्तिकर कायदा झाला. तेव्हापासून २०१४ मध्ये भारतातील आर्थिक विषमतेची दरी सर्वाधिक होती, असे भारतातील आर्थिक विषमता, १९२२ ते २०१४ : ब्रिटिश राज’ ते ‘अब्जाधीश राज’ या जागतिक विषमता अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, २०१४ मध्ये १० टक्के भारतीयांकडे देशाची एकूण ५६ टक्के संपत्ती एकवटलेली होती. १९३० मध्ये एक टक्का भारतीयांकडे देशाची २१ टक्के संपत्ती होती. १९८० मध्ये ती सहा टक्क्यांनी घटली होती, तर २०१४ मध्ये २२ टक्क्यांनी वाढली होती, असे हा अहवाल सांगतो.गरिबी हटवण्याचा, वंचित आणि शोषितांचा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास होत असल्याचा दावा मोदी सरकार करीत आहे. परंतु, आॅक्सफॅमच्या अहवालानुसार, २०१७ मध्ये देशातील ६७ कोटी लोकांच्या उत्पन्नात गतवर्षी केवळ एक टक्क्याची भर पडली आहे, तर देशातील एक टक्का लोकांच्या उत्पन्नात २०.९ लाख कोटींची भर पडली आहे. केंद्र सरकारच्या २०१७-१८ च्या एकूण अर्थसंकल्पाच्या जवळपास जाणारा हा आकडा आहे. गतवर्षी भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत १७ ने भर पडली. देशात १०१ अब्जाधीश आहेत. २०१० पासून अब्जाधीशांच्या संपत्तीत दरवर्षी सरासरी १३ टक्के वाढ होत आहे. सर्वसामान्य कामगारांच्या वेतनात मात्र सरासरी दोन टक्क्यांची वाढ होत आहे. यावरून श्रीमंतच कसे अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब कसे अधिक गरीब होत आहेत, हे लक्षात यावे.जगभरातील परिस्थितीही फारशी समाधानकारक नाही. जगातील ८२ टक्के संपत्ती एक टक्का श्रीमंतांकडे आहे, तर तीन अब्ज सात कोटी लोकांच्या उत्पन्नात २०१७ मध्ये काडीचीही भर पडलेली नाही.आॅक्सफॅमच्या गतवर्षीच्या अहवालात भारतातील एक टक्का लोकांकडे देशातील ५८ टक्के मालमत्ता असल्याचे म्हटले होते. डाओस येथे जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक होत आहे. या बैठकीच्या आधी हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. जागतिक नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा अहवाल आहे. या परिषदेत या अहवालातील मुद्यांवर चर्चा, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करता येतील का? यावर निर्णय अपेक्षित आहे.दररोज असे कोणते ना कोणते अहवाल प्रसिद्ध होत असतात. ते सगळेच खरे मानायचे का? त्यांच्या सर्वेचा आधार कितपत वास्तवाशी भिडणारा असतो, असा सवाल काही नेते, तज्ज्ञ करतील. काही संस्थांच्या सर्वेबाबतीत तसे असेलही; परंतु वास्तव बदलता येते थोडेच. ते तर जगाला उघड्या डोळ्याने दिसत असते.- चंद्रकांत कित्तुरे (chandrakant.kitture@lokmat.com)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा