शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

‘टोल’धाड कधी थांबेल? महाराष्ट्र टोलमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2023 07:29 IST

राज्यातील जनतेला वाटले की, बस्स, महाराष्ट्र टोलमुक्त झालाच; पण तसे काही होण्याची शक्यता दिसत नाही. 

महाराष्ट्रात गेला महिनाभर महामार्गावर होणाऱ्या टोलवसुलीच्या विषयावर राजकीय रणकंदन झाले. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक असते आणि त्यांच्या आंदोलनामुळे काही वर्षांपूर्वी राज्यातील काही टोलनाके बंदची घोषणा सरकारला करावी लागली होती. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्याच्या प्रवेशद्वारांवरील टोलवसुलीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याची दखल घ्यावी लागली. सरकारमधील मंत्री थेट राज ठाकरे यांच्या घरी गेले आणि यशस्वी वगैरे तोडगाही निघाला. राज्यातील जनतेला वाटले की, बस्स, महाराष्ट्र टोलमुक्त झालाच; पण तसे काही होण्याची शक्यता दिसत नाही. 

कित्येक वर्षांनंतर जे महामार्ग आता कुठे टोलमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तिथेही वाढत्या रहदारीमुळे मार्गिका वाढविण्याचे प्रस्ताव तयार आहेत. यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे उदाहरण देता येईल. दोन महानगरे जोडणारा हा एक्स्प्रेस वे अठ्ठावीस वर्षांपूर्वी बांधला गेला. नंतर अधूनमधून त्याची दुरुस्ती केली गेली. काही नव्या लेन वाढविल्या गेल्या. त्यामुळे त्यावरील टोलवसुली पुढच्या २०४५ पर्यंत चालेल. 

दररोज तब्बल ५५ लाख वाहनांची ये-जा होणारा हा महामार्ग अपुरा पडत असल्याने आता रस्ते विकास महामंडळाने अंदाजे पाच हजार कोटींचा आठपदरी मार्गाचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. या खर्चाची सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करावी, असे महामंडळाचे म्हणणे आहे. तसे होण्याची शक्यता कमी आहे. कारण, सरकारचे टोलव्यवस्थेवरील प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे महामंडळ या कामासाठी निधी उभा करेल आणि त्यामुळे अनिश्चित काळासाठी तिथली टोलवसुली सुरू राहील. या पृष्ठभूमीवर, हे लक्षात घ्यायला हवे की, कोणताही रस्ता जनतेच्याच पैशाने बनतो. सरकारकडून थेट अर्थसंकल्पात तरतूद झाली तरी तो पैसा जनतेकडून कररूपाने वसूल करण्यात आलेला असतो आणि खासगी गुंतवणूकदारांनी बांधला तर थेट टोलच्या माध्यमातून त्याची वसुली होते. आणि मुळात या टोल व्यवस्थेवर कुणाचाही अंकुश नाही. 

एखादा रस्ता किंवा महामार्गाच्या बांधकामावर खर्च किती झाला आणि खासगी गुंतवणूकदाराने किती टोल वसूल केला, याची उपलब्ध होणारी आकडेवारी विश्वासार्ह नाही. त्यात चोरीचपाटी होत असावी, असा संशय नेहमीच व्यक्त होतो. जो प्रचंड खर्च दाखविला जातो, त्याच्या तुलनेत रस्त्याचा दर्जा अगदीच दुय्यम असल्याची आणि त्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती करावी लागत असल्याची अनेक उदाहरणे देता येतील. हे फक्त खासगी वसुलीच्या स्थितीतच होते, असे नाही. अलीकडे अपघाती मृत्यूंमुळे चर्चेत असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर साधारणपणे पन्नास हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि त्याचा ठाणे जिल्ह्यातील टप्पा पूर्ण होईपर्यंत हा खर्च सत्तर- ऐंशी हजार कोटींच्या घरात जाईल. हा पैसा खासगी गुंतवणूकदारांकडून उभा करण्यात आलेला आहे आणि त्याची परतफेड करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडूनच या महामार्गावर टोलवसुली केली जाते. 

तथापि, प्रचंड गुंतवणुकीच्या तुलनेत सध्या त्यातून जेमतेच पाचशे-साडेपाचशे कोटी रुपये वसूल होत आहेत. त्यामुळे हा महामार्ग गुंतवणुकीचा परतावा नेमका कधी पूर्ण करेल हे कोणीही सांगू शकत नाही. तो पेच कायम असतानाच नागपूर ते गोवा असा दक्षिण महाराष्ट्रातून जाणाऱ्या नव्या महामार्गाचा प्रस्ताव तयार आहे. टोलवसुलीचा कालावधी हादेखील वादग्रस्त मुद्दा आहे. राज्यकर्ते पुढारी, बांधकाम खात्यातील अधिकारी आणि रस्ते बांधकामातील खासगी गुंतवणूकदार यांची अशी एक साखळी तयार झाली आहे की, रस्ता छोटा असो की मोठा, महत्त्वाचा असो की बिनमहत्त्वाचा, एकदा टोलवसुली सुरू झाली की तहहयात ती सुरू राहील, याची काळजी हे सगळे घटक घेतात. 

वाहनचालकांच्या खिशातून ती रक्कम निघत राहते. टोलच्या संदर्भात नेहमी चर्चा होते ती प्रवासी वाहनांची; पण या वसुलीच्या साखळीची गोम तिथे नाहीच. अनेकांच्या ही गोष्ट खिजगणतीतही नसते की, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून होणारी वसुली हे तिथल्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे आणि वाहतूकदार भरतात तो टोल पुन्हा बाजारात ग्राहकांच्याच खिशातून वसूल केला जातो. इंधनावरील खर्चाइतकाच हा टोलचा खर्चही महागाई वाढविण्यास कारणीभूत ठरतो. म्हणूनच या वसुलीला ‘टोलधाड’ म्हणत असावेत आणि एकूणच सरकारी धोरणातील ‘टोलप्रेम’ लक्षात घेतले तर दुर्दैवाने हे दुष्टचक्र संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

 

टॅग्स :tollplazaटोलनाका