शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

अधिकारी जनतेत कधी जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:43 IST

उपराजधानीत डांबर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अनेक महिन्यांपासून नागरिक यापासून त्रस्त आहेत.

उपराजधानीत डांबर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अनेक महिन्यांपासून नागरिक यापासून त्रस्त आहेत. परंतु शहराची ही समस्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतलेलीच नाही. त्यामुळेच की काय जूनअखेरीस शहरात केवळ २६६ खड्डे असल्याचा अजब दावा मनपातर्फे करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारात मनपाने दिलेली ही माहिती प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा उत्तम नमुनाच आहे. मुळात अशाप्रकारची उत्तरे तेव्हाच येतात, ज्यावेळी अधिकाºयांना प्रत्यक्ष तळागाळातील समस्यांची जाण नसते. वातानुकूलित दालनांमध्ये बसून धोरणे तयार होतात, निर्णय होतात. मात्र प्रत्यक्षात नागरिकांची नेमकी आवश्यकता काय व त्यांच्या अपेक्षा-अडचणी काय हे जाणून घेण्याचे कष्ट फारसे होताना दिसून येत नाहीत. मुळात अधिकारी हे जनता व प्रशासन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा असतात. त्यामुळे नागरिकांशी त्यांचा संवाद असणे अत्यावश्यक असते. परंतु आपली खुर्ची टिकवून ठेवण्याच्या नादात नागरिकांपेक्षा राजकारण्यांशी ‘सु’संवाद वाढविण्यावर जास्त भर देण्यात येतो. एखाद्या राजकारण्याला अडचणीत आणणाºया मुद्याला बेमालूमपणे दुसरी दिशा देण्यात येते. याची माहिती ना जनतेपर्यंत पोहोचते, ना याच्यावर प्रश्न उपस्थित होतात. नागपूर मनपाची खड्ड्यांच्या माध्यमातून झालेली ही ‘पोलखोल’ हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कुठल्याही रस्त्यावर गेले तर खड्ड्यांनी अधिकाºयांचेदेखील स्वागत होतेच. असे असतानादेखील कागदोपत्री केवळ सोयीस्कर आकडे दाखविणे ही प्रशासकीय अकार्यक्षमतेकडेच संकेत करणारी बाब आहे. जर कनिष्ठ अधिकाºयांनी असे दिशाभूल करणारे आकडे मांडले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमतदेखील दाखविण्यात येत नाही. फक्त रस्तेच नाही तर अनेक प्रशासकीय बाबींमध्ये ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असे धोरण घेऊन अधिकारी बसतात. तंत्रज्ञानाच्या युगात तर संवाद साधण्यासाठी अनेक मंच उपलब्ध आहेत. मात्र ‘सोशल’ होणे आपल्याच अंगावर येऊ शकते याची जाण अधिकाºयांना चांगल्या पद्धतीने असते. त्यामुळेच ‘कशाला हवी ती ब्याद’ असे म्हणत एका चौकटीत कार्य करण्यावर त्यांचा भर असतो. केवळ मनपाच नाही तर विविध सरकारी विभागांमध्ये असेच दुर्दैवी चित्र आहे. राजकारण्यांना जनतेचे महत्त्व चांगल्या पद्धतीने ठाऊक असते. निवडणुकांच्या काळात तरी त्यांच्यासाठी जनता ‘जनार्दन’ असते. अधिकाºयांनीदेखील जनतेत जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्यांच्या मानसिकतेत बदल घडून आला नाही तर असे ‘खड्डेपुराण’ वारंवार अनुभवायला मिळेल यात शंका नाही.

टॅग्स :Potholeखड्डे