शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी जनतेत कधी जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:43 IST

उपराजधानीत डांबर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अनेक महिन्यांपासून नागरिक यापासून त्रस्त आहेत.

उपराजधानीत डांबर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अनेक महिन्यांपासून नागरिक यापासून त्रस्त आहेत. परंतु शहराची ही समस्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतलेलीच नाही. त्यामुळेच की काय जूनअखेरीस शहरात केवळ २६६ खड्डे असल्याचा अजब दावा मनपातर्फे करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारात मनपाने दिलेली ही माहिती प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा उत्तम नमुनाच आहे. मुळात अशाप्रकारची उत्तरे तेव्हाच येतात, ज्यावेळी अधिकाºयांना प्रत्यक्ष तळागाळातील समस्यांची जाण नसते. वातानुकूलित दालनांमध्ये बसून धोरणे तयार होतात, निर्णय होतात. मात्र प्रत्यक्षात नागरिकांची नेमकी आवश्यकता काय व त्यांच्या अपेक्षा-अडचणी काय हे जाणून घेण्याचे कष्ट फारसे होताना दिसून येत नाहीत. मुळात अधिकारी हे जनता व प्रशासन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा असतात. त्यामुळे नागरिकांशी त्यांचा संवाद असणे अत्यावश्यक असते. परंतु आपली खुर्ची टिकवून ठेवण्याच्या नादात नागरिकांपेक्षा राजकारण्यांशी ‘सु’संवाद वाढविण्यावर जास्त भर देण्यात येतो. एखाद्या राजकारण्याला अडचणीत आणणाºया मुद्याला बेमालूमपणे दुसरी दिशा देण्यात येते. याची माहिती ना जनतेपर्यंत पोहोचते, ना याच्यावर प्रश्न उपस्थित होतात. नागपूर मनपाची खड्ड्यांच्या माध्यमातून झालेली ही ‘पोलखोल’ हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कुठल्याही रस्त्यावर गेले तर खड्ड्यांनी अधिकाºयांचेदेखील स्वागत होतेच. असे असतानादेखील कागदोपत्री केवळ सोयीस्कर आकडे दाखविणे ही प्रशासकीय अकार्यक्षमतेकडेच संकेत करणारी बाब आहे. जर कनिष्ठ अधिकाºयांनी असे दिशाभूल करणारे आकडे मांडले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमतदेखील दाखविण्यात येत नाही. फक्त रस्तेच नाही तर अनेक प्रशासकीय बाबींमध्ये ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असे धोरण घेऊन अधिकारी बसतात. तंत्रज्ञानाच्या युगात तर संवाद साधण्यासाठी अनेक मंच उपलब्ध आहेत. मात्र ‘सोशल’ होणे आपल्याच अंगावर येऊ शकते याची जाण अधिकाºयांना चांगल्या पद्धतीने असते. त्यामुळेच ‘कशाला हवी ती ब्याद’ असे म्हणत एका चौकटीत कार्य करण्यावर त्यांचा भर असतो. केवळ मनपाच नाही तर विविध सरकारी विभागांमध्ये असेच दुर्दैवी चित्र आहे. राजकारण्यांना जनतेचे महत्त्व चांगल्या पद्धतीने ठाऊक असते. निवडणुकांच्या काळात तरी त्यांच्यासाठी जनता ‘जनार्दन’ असते. अधिकाºयांनीदेखील जनतेत जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्यांच्या मानसिकतेत बदल घडून आला नाही तर असे ‘खड्डेपुराण’ वारंवार अनुभवायला मिळेल यात शंका नाही.

टॅग्स :Potholeखड्डे