शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अधिकारी जनतेत कधी जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:43 IST

उपराजधानीत डांबर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अनेक महिन्यांपासून नागरिक यापासून त्रस्त आहेत.

उपराजधानीत डांबर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अनेक महिन्यांपासून नागरिक यापासून त्रस्त आहेत. परंतु शहराची ही समस्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतलेलीच नाही. त्यामुळेच की काय जूनअखेरीस शहरात केवळ २६६ खड्डे असल्याचा अजब दावा मनपातर्फे करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारात मनपाने दिलेली ही माहिती प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा उत्तम नमुनाच आहे. मुळात अशाप्रकारची उत्तरे तेव्हाच येतात, ज्यावेळी अधिकाºयांना प्रत्यक्ष तळागाळातील समस्यांची जाण नसते. वातानुकूलित दालनांमध्ये बसून धोरणे तयार होतात, निर्णय होतात. मात्र प्रत्यक्षात नागरिकांची नेमकी आवश्यकता काय व त्यांच्या अपेक्षा-अडचणी काय हे जाणून घेण्याचे कष्ट फारसे होताना दिसून येत नाहीत. मुळात अधिकारी हे जनता व प्रशासन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा असतात. त्यामुळे नागरिकांशी त्यांचा संवाद असणे अत्यावश्यक असते. परंतु आपली खुर्ची टिकवून ठेवण्याच्या नादात नागरिकांपेक्षा राजकारण्यांशी ‘सु’संवाद वाढविण्यावर जास्त भर देण्यात येतो. एखाद्या राजकारण्याला अडचणीत आणणाºया मुद्याला बेमालूमपणे दुसरी दिशा देण्यात येते. याची माहिती ना जनतेपर्यंत पोहोचते, ना याच्यावर प्रश्न उपस्थित होतात. नागपूर मनपाची खड्ड्यांच्या माध्यमातून झालेली ही ‘पोलखोल’ हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कुठल्याही रस्त्यावर गेले तर खड्ड्यांनी अधिकाºयांचेदेखील स्वागत होतेच. असे असतानादेखील कागदोपत्री केवळ सोयीस्कर आकडे दाखविणे ही प्रशासकीय अकार्यक्षमतेकडेच संकेत करणारी बाब आहे. जर कनिष्ठ अधिकाºयांनी असे दिशाभूल करणारे आकडे मांडले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमतदेखील दाखविण्यात येत नाही. फक्त रस्तेच नाही तर अनेक प्रशासकीय बाबींमध्ये ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असे धोरण घेऊन अधिकारी बसतात. तंत्रज्ञानाच्या युगात तर संवाद साधण्यासाठी अनेक मंच उपलब्ध आहेत. मात्र ‘सोशल’ होणे आपल्याच अंगावर येऊ शकते याची जाण अधिकाºयांना चांगल्या पद्धतीने असते. त्यामुळेच ‘कशाला हवी ती ब्याद’ असे म्हणत एका चौकटीत कार्य करण्यावर त्यांचा भर असतो. केवळ मनपाच नाही तर विविध सरकारी विभागांमध्ये असेच दुर्दैवी चित्र आहे. राजकारण्यांना जनतेचे महत्त्व चांगल्या पद्धतीने ठाऊक असते. निवडणुकांच्या काळात तरी त्यांच्यासाठी जनता ‘जनार्दन’ असते. अधिकाºयांनीदेखील जनतेत जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्यांच्या मानसिकतेत बदल घडून आला नाही तर असे ‘खड्डेपुराण’ वारंवार अनुभवायला मिळेल यात शंका नाही.

टॅग्स :Potholeखड्डे