शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी पक्षात बंडखोरी झाली की..., पक्षांतरानंतरचे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 04:58 IST

ज्योतिरादित्य हा काँग्रेससाठी चांगला चेहरा होता. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकालात त्यांनी संसदेत उत्तम कामगिरी केली होती.

मध्य प्रदेशातील राजकीय डावपेचांत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर मात केली. मध्य प्रदेशात भाजपकडून गडबड केली जाणार हे कर्नाटकमधील सत्तांतरानंतर लक्षात येऊनही काँग्रेसचे नेते एक तर बेसावध राहिले वा कमलनाथ आणि दिग्विजयसिंगांच्या कूटनीतीवर त्यांनी आंधळा विश्वास टाकला. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना जसे उपमुख्यमंत्री केले गेले त्यापद्धतीने ज्योतिरादित्य शिंदे यांना सत्तेमध्ये नीट सामावून घेतले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. भाजपमध्ये तरुण नेत्यांना आवर्जून मोठे केले जाते.

कमलनाथ व दिग्विजय यांनी असे न करता आपलीच घोडी पुढे दामटली. ज्योतिरादित्य हा काँग्रेससाठी चांगला चेहरा होता. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकालात त्यांनी संसदेत उत्तम कामगिरी केली होती. मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येण्यातही त्यांचा चांगला वाटा होता. तरीही त्यांना सत्तेत सामावून घेतले गेले नाही. ज्योतिरादित्य यांचा जाहीर अपमानही केला गेला. राहुल गांधींनीही त्याकडे दुर्लक्ष केले. भाजपने याचा फायदा उठविला. ज्योतिरादित्यांची तिखट टीका विसरून मोदी-शाह जोडीने त्यांच्याशी राजकीय व्यवहार केला.

शिवराजसिंह चौहान यांचे अमित शाह यांच्याशी जमत नाही. चौहान मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणूनच मागील निवडणूक निकालानंतर सरकार बनविण्यासाठी चौहान यांना शाह यांनी हिरवा कंदील दाखविला नाही. भाजप सत्तेपासून केवळ नऊ आकड्यांनी दूर होता व नऊ आमदार जमविणे चौहान यांना सहज शक्य होते. भाजप त्यावेळी स्वस्थ राहिला. आता देशात सीएए, एनपीए अशा विषयांवरून सर्व बाजून्ांी विरोध होत असताना आपली राजकीय ताकद दाखवून देणे भाजपला आवश्यक होते. शिंदे गळाला लागताच भाजपच्या नेत्यांनी वेगवान हालचाली केल्या व काँग्रेसला खिंडार पाडले. काँग्रेसच्या २२ सदस्यांनी आमदारकीवर पाणी सोडण्याची तयारी दाखविली यावरून भाजपची तयारी किती भक्कम होती याचा अंदाज येईल.

सत्ता मिळवायची असे एकदा ठरविले की साधनविवेक बाजूला ठेवून मोदी-शाह कामाला लागतात. हे अन्य राज्यांत दिसले आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांत पुढे दिसले तर आश्चर्य वाटू नये. गुजरात काँग्रेसमधील अस्वस्थता उघड होत आहे. भाजपची ही रणनीती माहिती असूनही काँग्रेसचे नेते गाफील कसे राहिले हे एक गूढ आहे. कमलनाथ यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात भाजप यशस्वी झाला असला तरी पुढील मार्ग सोपा नाही. काँग्रेसमधून फुटून आलेल्या २२ आमदारांची काय सोय लावायची हा मोठा प्रश्न आहे. २२ ठिकाणी आता पोटनिवडणुका घ्याव्या लागतील. या सर्व ठिकाणी तेच आमदार निवडून येतील याची खात्री नाही.

ज्योतिरादित्य शिंदे यांचा प्रभाव असलेल्या पट्ट्यातील हे आमदार असल्यामुळे जिंकणाऱ्यांचे प्रमाण जास्त असेल इतकेच. भाजपची गरज नऊ आमदारांची आहे. ती पूर्ण होईल, पण अन्य आमदारांचे काय. त्याचबरोबर ज्योतिरादित्य शिंदे यांचा सन्मान कसा करायचा, हाही प्रश्न आहे. शिवराजसिंह चौहान हे शाह यांना पसंत नसले तरी भाजपमध्ये त्यांचे वजन आहे. तीन निवडणुका जिंकण्याचे कौशल्य त्यांनी दाखविले आहे. केंद्रात मंत्रिपद मिळवून ज्योतिरादित्य स्वस्थ बसतील असे नाही. त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी असेल व त्याला भाजपमध्ये वाव द्यावा लागेल. ज्योतिरादित्य यांना योग्य प्रकारे सामावून घेतले तर भाजपचा फायदा होईल हे मात्र खरे.

तथापि मध्य प्रदेशातील घटनांतून निर्माण होणारा खरा प्रश्न लोकशाही व्यवस्थेबाबतचा आहे. पक्षांतरविरोधी कायद्याची दुर्बलता अधिक स्पष्ट होऊ लागली आहे. त्याचबरोबर पक्षांचे बलाबल तपासण्यासाठी विधानसभा हीच योग्य जागा असताना विश्वासदर्शक ठराव क्षुल्लक कारणे देऊन लांबणीवर टाकण्याचे प्रकार होत आहेत. सत्ताधारी पक्षात बंडखोरी झाली की, विधानसभेत दोन किंवा तीन दिवसांत शक्तिपरीक्षा झाली तर घोडेबाजाराला वेळच मिळणार नाही. पण तसे होत नाही. शक्तिपरीक्षणाच्या टाळाटाळीमुळे राजकीय पेच हे न्यायालयात नेले जातात. राजकीय पेच हे विधानसभेतच सुटले पाहिजेत, न्यायालयांना इतर अनेक महत्त्वाची कामे आहेत. विधिमंडळ आपले कर्तव्य पाळीत नसल्याने न्यायालयाला ते काम करावे लागते. हे योग्य नव्हे.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेश