शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सावधान; खवळलेला समुद्र, प्रचंड लाटा वरचेवर दिसणार; वादळं धडकत राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 06:31 IST

‘अम्फान’पाठोपाठ भारतीय किनाऱ्यावर धडकलेल्या ‘निसर्ग’ वादळाने केवळ किनारपट्टीलाच नव्हे, तर संपूर्ण देशालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळांचे आगमन आणि त्यांच्या संहारक क्षमतेतली वाढ आता वरचेवर अनुभवावी लागेल.

पाबूक, फणी, वायू, हिक्का, क्यार, महा, बुलबुल आणि पवन! ही नावे आहेत जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभराच्या काळात भारतीय किनाºयावर धडकलेल्या वादळांची. बारा महिन्यांत तब्बल आठ वादळांचा सामना भारताने याआधी १९७६ मध्ये केला होता. यंदाचे पहिले चार महिने किनारपट्टीला किंचित उसंत मिळाली; पण मे महिन्याच्या मध्यावर आलेल्या अम्फान वादळाने ओडिशाला आणि पश्चिम बंगालसह बांगलादेशाला झोडपून काढले. त्या वादळाने विस्कळीत केलेले जनजीवन स्थिरावतेय, तोपर्यंत अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ वादळाने देशाच्या पश्चिम किनारपट्टीला धडक  दिलीय.

एरवी मान्सूननंतर भारतीय उपखंडात एक-दोन वादळे निर्माण व्हायची. गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या तर वाढलीच, शिवाय मान्सूनपूर्व काळातही वादळांची निर्मिती होते आहे. दोन वादळांमधला कालावधी कमी होतो आहे आणि वादळांची संहारक क्षमताही वाढत चालली आहे. १३ मे रोजी श्रीलंकेजवळ समुद्रात तयार झालेले अम्फान वादळ १६६ कि.मी. प्रतितास इतक्या जोराने वाहणारे वारे घेऊन किनाºयावर धडकेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने देत त्याला दुसºया श्रेणीचे वादळ म्हणून घोषित केले होते. ही घटना १६ मे रोजीची. मात्र, १८ मे ची सकाळ उजाडताना वाºयाचा वेग २४० कि.मी.वर जात अम्फानचे महावादळात परिवर्तन झाले होते. अवघ्या २४ तासांत ही किमया घडली. वादळ ही नैसर्गिक उत्पत्ती असली तरी त्यांच्या निर्मितीतले सातत्य आणि त्यांच्या हिंसक क्षमतेत झालेली वाढ ही गेल्या चार-पाच दशकांतली अनुभूती आहे. भारतीय समुद्राचे गतीने वाढणारे तापमान या वादळांच्या तीव्रतेमागचे प्रमुख कारण असून, भविष्यात देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांना धडकणाºया वादळांची संख्या वाढतच जाईल, असे इशारे तज्ज्ञ देताहेत. समुद्रसपाटीवरले तापमान वाढले की वादळाची संहारक क्षमताही वाढते आणि मुसळधार पाऊस पडतो. त्याचबरोबर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे वादळाला अंतर्भागापर्यंत जात आपला इंगा दाखवायची शक्ती आणि गती प्राप्त होते. वातावरण बदलामुळे घनघोर वादळांचा सामना आपल्याला नित्यनेमाने करावा लागणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ग्रीनहाऊस वायूंच्या उत्सर्गामुळे निर्माण झालेली ९० टक्के उष्णता समुद्र शोषून घेत असतो. समुद्राच्या पोटातली ही उष्णता वादळांच्या रूपाने जमिनीच्या भेटीला येत असते. यापुढे आपल्याला खवळलेला समुद्र, प्रचंड संहारक लाटा यांचे दर्शन वरचेवर घडणार आहे.

किनारपट्टीच्या आश्रयाने राहणाºयांना वित्तहानी आणि मनुष्यहानीचा अनुभव नियमितपणे येत राहील. अम्फान वादळाने केलेले नुकसान १३ अब्ज रुपयांच्या घरात गेले. किनारपट्टीतील उद्यमालाही वादळांच्या सातत्याने धोक्याचा इशारा दिलेला आहे. वादळी वारे, समुद्राच्या पातळीतली वाढ आणि अथक पावसाला जोड मिळते ती किनारपट्टीतील अनियोजित भूविकासाची. पाण्याचा निचरा, सखल आणि पाणथळ भागांचे महत्त्व याविषयी अनभिज्ञ असलेल्या घटकांकडून उभी केलेली बांधकामे वादळानंतरच्या संकटांची निर्मिती करतात. समुद्राचे पाणी लोकवस्तीत शिरते. गगनचुंबी इमारतींना त्याचा विशेष त्रास होत नाही; पण या इमारतींच्या भरवशावर उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांना आणि मध्यमवर्गाच्या वस्त्यांना ते उद्ध्वस्त करते.

वादळाच्या धडकण्याला समुद्रभरतीची साथ मिळाली, तर संहाराची व्याप्ती प्रचंड वाढते. सखल भाग आणि कांदळवनांवरले आक्रमण याच्या मुळाशी असल्याचे तज्ज्ञ गेली अनेक वर्षे घसे खरवडून सांगत असले, तरी त्यांचे इशारे पुराचे पाणी ओसरल्याबरोबर विस्मृतीत ढकलले जातात. निसर्गनियमांकडे सातत्याने दुर्लक्ष करून उभा राहिलेल्या भौतिक विकासाने आज मुंबई, कोलकातासारख्या शहरांबरोबरच किनारपट्टीतल्या जनजीवनासमोर अस्तित्वाचे संकट निर्माण केले आहे. एका दिवसावर येऊन ठेपलेल्या जागतिक पर्यावरण दिनाला भपकेबाज कार्यक्रमांसह साजरा करणे तूर्त शक्य नाही. मात्र, आजवर केलेल्या चुकांची उजळणी करून त्यांची पुनरावृत्ती टाळण्याची शपथ घेतली, तर पर्यावरण दिन सुयोग्यरीत्या साजरा होईल.

 

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ