शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

बाईला ‘डाकीण’ ठरवून चटके दिले जातात, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 06:37 IST

एखादी स्त्री डाकीण असते, माणसं-प्राण्यांचा जीव घेते, पिकपेरा कमी करते, गाई-म्हशीचे दूध आटवते यावर आजही लोकांचा विश्वास बसतो, याला काय म्हणावे?

विनायक सावळे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, विद्यापीठाचे कुलगुरू, जिल्ह्यातील सर्व प्रमुख, संस्था-संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पूर्ण एका दिवसाची परिषद, त्या परिषदेत डाकीण प्रश्नावर सखोल चर्चा आणि प्रबोधन झालेले, प्रत्येक गावात असलेल्या पोलीस पाटलांचे प्रशिक्षण झालेले, प्रत्येक गावात असलेल्या अंगणवाडी सेविका, पाडा सेवक, आशा वर्कर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी या सगळ्यांचे प्रशिक्षण झालेले, पोलीस पाटलांची तत्कालीन गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘डाकीण प्रथाविरोधी संकल्प परिषद’ पार पडलेली, गावागावात प्रबोधनासाठी काढलेल्या अक्काराणी ते याहामोगी संवाद यात्रा, डाकीण ठरवत असलेल्या होऱ्यापाणीच्या चंपालाल महाराजाचा भांडाफोड, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने पाड्यापाड्यावर प्रत्यक्ष प्रबोधनाचे कार्यक्रम, कितीतरी डाकीण पीडित महिलांना समोर आणून त्यांच्या व्यथा समाजासमोर आणल्या, त्याच्यावर एक पुस्तक; ज्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ‌्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला, सर्व अधिकारी, राजकीय पुढारी यांच्याशी संवाद, त्यांच्या सहभागाने अनेक कार्यक्रम... इतका विविधांगी प्रयत्न कदाचितच कोणी एखाद्या विषयावर सातत्याने केला असेल; पण तरीही डाकिणीचा प्रश्न आपली क्रूरता जराही कमी करायला तयार नाही.

गेल्या आठवड्यात एका तरुण महिलेला निर्वस्त्र करून, ‘तू कोणाकोणाला खाल्लं? अजून कोण तुझ्यासोबत आहे? त्यांची नावं सांग’, अशी विचारणा करीत तिला चटके देऊन छळ केला जात असतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला.  कार्यकर्ते, प्रशासन, पत्रकार सगळ्यांनाच हादरवून टाकणाऱ्या या व्हिडिओने डाकीण प्रश्नाचे आव्हान किती भयंकर आहे, याची परत जाणीव करून दिली.२१ व्या शतकात ज्याला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग म्हणतो, अशा युगात आजही, ‘एखादी स्त्री डाकीण असते. ती माणसांना खाते, मारून टाकते, प्राण्यांचा जीव घेते, पीकपेरा कमी करते, गाई-म्हशीचे दूध आटवते, अपघात घडवते, आजारी पाडते, जंगली प्राण्यांच्या रूपाने हल्ला करते’ असे भ्रम घेऊन जगणारी माणसे आहेत. या अघोरी अंधश्रद्धेतून कितीतरी महिलांना डाकीण ठरवून मारहाण करणे, गावातून हाकलून देणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, नग्न करून तिचा छळ करणे आणि प्रसंगी तिचा खूनच करणे हे सारे काही आजही घडत आहे.

शिक्षण क्षेत्राने सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, भारताच्या संविधानाने कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवायला आपण सारेच कमी पडलो. मोबाइलचा डाटा पोहोचला, रस्ते पोहोचले, योजना पोहोचल्या, विजेचे खांब पोहोचले, सौरदिवे पोहोचले, आदिवासी पाडे प्रकाशमय झाले, पण मनातील अंधश्रद्धांचा अंधकार दूर करण्यासाठी विवेकाच्या प्रकाशाची साधी एक तिरीपही तिथे पोहोचली नाही... हे सारे मन विषन्न करणार आहे. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर म्हणून म्हणत होते, ‘ही शतकांची लढाई आहे, ती अधिक निकराने लढावी लागणार आहे.’ - ही लढाई केवळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लढून भागणार नाही तर येथील राजकीय पुढारी, प्रशासन, शिक्षण संस्था, माध्यमे, विविध संस्था, संघटना या सर्वांनी मिळून लढायची आहे. पोलीस प्रशासनाची जबाबदारी यात  मोठी आहे. पोलीस पाटलांच्या माध्यमातून त्यांचा सर्व गावांची थेट संबंध येतो. जादूटोणाविरोधी कायद्याचा धाकदेखील पाड्यापाड्यावर पोहोचण्याची गरज आहे.

मंत्रतंत्र, जादूटोणा जगात  अस्तित्वात नाही. कोणत्याही घटनेमागे काहीतरी कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाचे पायाभूत तत्त्व पोहोचण्यासाठी सर्व माध्यमांना पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जमेल ती भूमिका पार पाडायला हवी. ज्याला याविरोधात बोलणे शक्य त्याने बोलावे, ज्याला संघटित कामात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संघटनेत सहभागी व्हावे, एखाद्याने पीडित महिलेला मदत करावी, एखाद्याने याबाबत लिहावे...  अशा सगळ्या मार्गांनी सगळ्यांनी कृतिशील राहूया..

vinayak.savale123@gmail.com