शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्था कुरतडणाऱ्या उंदरांचे काय करणार?

By यदू जोशी | Updated: March 26, 2018 01:28 IST

गेली अनेक वर्षे मंत्रालय पोखरणारे भ्रष्ट उंदीर आजही सर्रास फिरत आहेत. त्यातील काही आघाडीच्या काळातील तर काही सध्याच्या सत्ताधा-यांनी मोठे केलेले आहेत.

गेली अनेक वर्षे मंत्रालय पोखरणारे भ्रष्ट उंदीर आजही सर्रास फिरत आहेत. त्यातील काही आघाडीच्या काळातील तर काही सध्याच्या सत्ताधा-यांनी मोठे केलेले आहेत. त्यांचा बंदोबस्त होईल तो सुदिनएका उंदराचे आयुष्यमान हे साधारणत: दोन ते साडेतीन वर्षे इतके असते. त्यापेक्षा अधिक ते जगत नाहीत. जगात सर्वाधिक प्रजनन क्षमता असलेल्या प्राण्यांमध्ये उंदराचे स्थान वरचे आहे. त्यामुळे त्यांची पिलावळ लगेच फोफावते. परवा विधानसभेत मंत्रालयातील उंदरांचा विषय चर्चिला गेला. मंत्रालयात आजही उंदरांचा प्रचंड सुळसुळाट आहे. दिवसाही ते फायलींवरून फिरत असतात. त्यांना वाचता आले असते तर कक्ष अधिकारी वा सचिवापेक्षाही त्यांना एकेका प्रकरणाची खडान्खडा माहिती राहिली असती. त्या फायलींमध्ये माणसांनी केलेले भ्रष्टाचार बघून कदाचित त्यांना नैराश्यातून मंत्रालय सोडावेसे वाटले असते आणि त्यामुळे त्यांना मारण्यासाठीचा सरकारचा पैसाही वाचला असता. संपूर्ण राज्याचा कारभार हाकणाºया मंत्रालयाने गेल्या अनेक वर्षांत अनेक उंदीर अनुभवले. व्यवस्थाच कुरतडणाºया उंदरांनी घातलेला धुडगूसही बघितला. आघाडी सरकारच्या काळात असे उंदीर अक्षरश: थयथयाट करीत असत. अनेक मंत्री, अधिकाºयांशी त्यांचे अर्थपूर्ण संबंध होते. पारदर्शकतेचा शब्द देऊन सत्तेत आलेली भाजपा आणि तिच्यासोबत ८० टक्के समाजकारण व २० टक्के समाजकारणाची हमी देणारी शिवसेना असल्याने भ्रष्ट उंदीर हे तात्काळ कारवाईच्या गोळ्या खाऊन पटापट मरतील, अशी आशा वाटली होती पण अनुभव काही फारसा चांगला नाही. आघाडीच्या काळातील अनेक मस्तवाल उंदरांची बºयाच जणांची मंत्री कार्यालयांमध्ये आजही ऊठबस आहे. सामाजिक न्याय, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण, परिवहन, सार्वजनिक आरोग्य या शेवटच्या माणसाशी संबंधित विभागात ‘वही झाग वही सफेदी’ असे चित्र आहे. अशा मस्तवाल उंदरांना मारणाºया गोळ्या तयार व्हायच्या आहेत आणि पिंजरेही बाजारात मिळत नाहीत. हजारो अंगणवाड्यांमधील लाखो मुलांना देण्यात येणाºया टेक होम रेशनच्या (टीएचआर) पुरवठ्यावर बारीक नजर ठेवणारी ‘मॉनिटरिंग सिस्टीम’ येऊच नये व योजनेतील भ्रष्टाचार सुखेनैव सुरू राहावा यासाठी विशिष्ट उंदीर-घुशी सक्रिय आहेत. त्यातील एक कंत्राटदार उंदीर हा राज्याच्या सिंह शिकाºयाच्या जाळ्यात अडकला तर ते जाळे कुरतडून आपणच सिंहाची सुटका करु शकतो, असा अहंभाव बाळगणारा आहे. तब्बल १८ महिने निविदा न काढता विशिष्ट कंपनीलाच मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहांच्या तसेच डॉ. आंबेडकर समाजभवनांच्या सफाईचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट दिले जात आहे. या प्रकरणात तर गणपतीचा उंदीरच ‘प्रसाद’ खात असून त्याचे ‘लाड’ सुरूच आहेत. मागासवर्गीय शिष्यवृत्तीसह आॅनलाईनची अनेक कामे घेणाºया नागपूरच्या इनोवेव्ह या कंपनीला नगरविकास विभागातील बड्या उंदरांपासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत कुणाकुणाचे संरक्षण होते तेही बघितले पाहिजे. मंत्रालयातील उंदरांच्या सुळसुळाटाबद्दल चिंता वाहणाºयांनीही ते सत्तास्थानी असताना कुठे आणि किती किती कुरतडले याच्या सुरस कथा फार जुन्या झालेल्या नाहीत. ते आजही सत्तेत असते तर कदाचित ही उंदरे आठवली नसती.जाता जाता : अमृता करवंदे या अनाथ तरुणीची कथा अन् व्यथा ‘लोकमत’ने पहिल्यांदा जगासमोर आणली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलता दाखवत अनाथांना सरकारी नोकºयांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या जीआरची अद्याप प्रतीक्षा आहे.