शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वाचनीय लेख - ‘खोडसाळ’ बातम्यांनी भारताचे काय बिघडेल?

By विजय दर्डा | Updated: April 8, 2024 07:45 IST

भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना ‘नेमकी वेळ’ साधून ब्रिटिश माध्यमांमध्ये निराधार बातम्या पेरल्या जातात, याचा अर्थ काय?

डाॅ. विजय दर्डा 

भारताने २०२० पासून आतापर्यंत पाकिस्तानात २० जणांची ‘ठरवून हत्या’ केलेली आहे, अशी बातमी ‘गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राने दिली आहे. वृत्तपत्राने या बातमीसाठी कोणताही हवाला/आधार/पुरावा दिलेला नसल्याने मी ती बातमीच मानत नाही. केवळ काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांचा आधार घेऊन अशा प्रकारची बातमी छापणे ही बेजबाबदार पत्रकारिताच होय! भारतामध्ये ऐन निवडणुकीच्या काळात अशा प्रकारची बातमी छापण्यामागचा नेमका हेतू काय आहे? बातमीत काय म्हटले आहे, हे सर्वांत प्रथम माहीत करून घेऊ. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंग- रॉ ने २०१९ मध्ये पुलवामातील हल्ल्यानंतर अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होऊ नयेत यासाठी आधीच बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने एक मोहीम हाती घेतली. त्याकरिता परदेशी भूमीवर काही करावे लागले, तरी ते करावे असे ठरले. या मोहिमेंतर्गतच पाकिस्तानमध्ये आतापर्यंत २० हत्या झाल्या आहेत. रॉचे नियंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे आहे, असेही या बातमीत म्हटले आहे. 

‘गार्डियन’ला काय म्हणायचे आहे हे आपण नक्कीच समजू शकतो. पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या दस्तावेजाच्या आधारे बातमीतील तपशील दिला गेला यातच या वृत्तपत्राची नियत स्पष्ट होते. पाकिस्तान भारताला बदनाम करणारी कागदपत्रे तयार करील हे तर उघडच आहे. ‘टार्गेट किलिंग’ची ही मोहीम भारत संयुक्त अरब अमिरातीतून संचालित करीत होता. त्यासाठी स्लीपर सेल तयार केला गेला. पाण्यासारखा पैसा खर्च केला गेला. या सगळ्याला दोन वर्षे लागली, असे या बातमीत म्हटले आहे. मग प्रश्न असा की या दोन वर्षांत पाकिस्तानने काय केले? संयुक्त अरब अमिरातीत स्लीपर सेल तयार झाले आणि पाकिस्तानला त्याचा सुगावाही लागला नाही? हा सगळा अहवाल बनावटरीत्या तयार केला गेलेला दिसतो. या बातमीत खलिस्तानचा समर्थक गुरुपतवंत सिंह पन्नू हा मृत असल्याचे म्हटले आहे. वास्तवात तो जिवंत आहे. लोकांनी यावर प्रश्न उपस्थित केल्यावर वृत्तपत्राने त्यात तत्काळ सुधारणा केली. परंतु, जिवंत माणसाला मृतांच्या यादीत आपण कसे टाकले यावर कोणतीही टिप्पणी केली नाही.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही भारतावर ‘टार्गेट किलिंग’चा आरोप केलेला आहे. तेथे खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर आपापसातील वैमनस्यातून मारला गेला. कॅनडाने केवळ आरोप केले, कोणतेही पुरावे दिले नाहीत. अमेरिकेनेही भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. ब्रिटनमध्ये खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख अवतार सिंह खांडा याचा रहस्यमय मृत्यू झाला. तसेच, पाकिस्तानात दहशतवादी परमजितसिंह पंजवार याची गोळ्या झाडून हत्या केली गेली. या दोन्ही घटनांशी भारताचा संबंध जोडला गेला. भारताने नेहमीच असे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘परदेशी भूमीवर टार्गेट किलिंग भारताच्या धोरणात बसत नाही’, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. त्यांच्याशी मी पूर्णतः सहमत आहे. तर, माझा प्रश्न असा की, कोण कोणाला मारतो आहे? पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांच्या गोळ्यांनी मारले गेलेले लोक ना पाकिस्तानचे राजकीय नेते होते, ना कुणी सज्जन सामान्य लोक होते. ते दहशतवादी होते आणि दहशतवाद्यांमध्ये आपापसात चकमकी झडत असतात.  दहशतवादाच्या मागे ड्रग्ज माफिया, शस्त्रास्त्रांचे सौदागर यांचा हात असतो. दहशतवादाचा आता कुठल्याही विचारधारेशी काहीही संबंध राहिलेला नाही. आपापसातील वैमनस्यातून हत्या होत राहतात. यात भारताला का ओढले जात आहे? आपल्या निवडणूक फायद्यासाठी कॅनडा खलिस्तान्यांना पाळतो, पोसतो. अमेरिकेत ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यातही संघर्ष चालू आहे. भारतात निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करणे हा गार्डियनचा हेतू स्पष्ट होतो. एकेकाळी ब्रिटनच्या पत्रकारितेविषयी साऱ्या जगात आदरभाव होता; परंतु या पत्रकारितेत भारताविषयी विद्वेष स्पष्ट दिसत आहे. भारताचा विकास अनेक देशांच्या पचनी पडत नाही आणि त्यातूनच हे असे हल्ले होत आहेत. असे हल्ले करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावे : भारत देशाची लोकशाही हा काही कच्च्या मातीतून तयार केलेला वाघोबा नाही. त्याची मुळे खूप खोल आहेत. या मुळांना स्वातंत्र्य लढ्यातील सेनानींनी आपल्या बलिदानाने सिंचित केले आहे. या देशाचा प्रत्येक नागरिक देशभक्त आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या विचारधारा काहीही असोत ते निवडणुका शर्थीने लढतात. परंतु, या देशातले राजकीय नेते आपल्या देशाविरुद्ध षड्‌यंत्र रचत नाहीत;  देशाची लूट करून आपले घर भरत नाहीत. असे लुटारू जेव्हा भारताला सल्ले देतात तेव्हा त्यांची कीव येते. 

आम्ही भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांचे अनुयायी जरूर आहोत. आम्ही अहिंसेवर विश्वास ठेवतो. परंतु, याचा अर्थ असा नव्हे की, भारत कमजोर आहे! घरात घुसून मारण्याचा ठेका कोणत्या एका राष्ट्राने घेऊन ठेवलेला नाही. भारतही ते करू शकतो.गरज पडली तर आम्ही घरात घुसू. जगाने हे जरूर लक्षात ठेवावे की भारताच्या मानमर्यादेला  कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न करील, तर  त्याला योग्य धडा शिकवताना हा देश जराही मागेपुढे पाहणार नाही.

(लेखक लोकमत समूह, एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत) 

टॅग्स :Englandइंग्लंडIndiaभारतPakistanपाकिस्तान