शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

लालूंचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:45 IST

डोळे मिटून किती दिवस दूध प्यायचे, हे त्या त्या मांजरानेच ठरवायचे असते. मालक बदलला किंवा मालकाची नियत बदलली की धपाटा ठरलेला असतो.

डोळे मिटून किती दिवस दूध प्यायचे, हे त्या त्या मांजरानेच ठरवायचे असते. मालक बदलला किंवा मालकाची नियत बदलली की धपाटा ठरलेला असतो. त्यामुळे दूध पीत असतानाच हा सारा भवतालही पाहता यावा लागतो. राजकारण्यांचेही असेच असते. सत्ता ताब्यात आली रे आली की, डोळे मिटून दूध न पिणारा राजकारणी सध्या अपवादानेच सापडतो; मात्र हे करीत असतानाच ज्याची नजर भवतालही टिपत असते तो यशस्वी राजकारणी ठरतो. नाही तर त्याचा लालूप्रसाद यादव होतो. चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्टÑीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरविले. पोलिसांनी तातडीने त्यांना तुरुंगातही टाकले. न्यायालय ३ जानेवारी रोजी त्यांना शिक्षा सुनावेल. शासकीय तिजोरीतून १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले दाखवून ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याचा हा खटला होता. चारा न पुरवताच कंत्राटदारांच्या नावे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही त्याकडे कानाडोळा केला हा लालूंवरील आरोप सिद्ध झाला. यात त्यांना सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. सीबीआय अधिकारी जोगिंदरसिंग, अमित खरे, राकेश अस्थाना, यू. एन. बिश्वास असे जिगरबाज अधिकारी लाभले म्हणून या घोटाळ्याचा असा निकाल समोर आला. या घोटाळ्याच्या ३३ पैकी सहा खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य चार खटल्यांचे कामकाज अजून सुरूच आहे. बिहारच्या राजकारणात या निकालामुळे फारसा फरक पडेल असे अजिबात वाटत नाही. लालूंचे तुरुंगात जाणे बिहारला नवे नाही. चैबासा तिजोरीतून ३७.५ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद झाली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लालूंनी बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या म्हणजे राष्टÑीय जनता दलाच्या सर्वाधिक जागा निवडून आणल्या होत्या. लालूंवर कितीही आरोप झाले आणि ते सिद्ध झाले तरी बिहारमधील यादव आणि मुस्लीम समाज पाठीशी आहे तोपर्यंत लालूंना चिंता नाही. मुलगा तेजस्वी यादव यांना राजकीय वारस जाहीर करून याआधीच लालूंनी राज्यातील भविष्याची चिंता मिटविली आहे. हे दोन्ही समाज नितीशकुमार वा मोदींच्या भाजपला मतदान करतील, अशी अलीकडच्या काळात तीळमात्रही शक्यता नाही, त्यामुळे बिहारमध्ये लालूंच्या पक्षाला मरण नाही. राहिला प्रश्न केंद्राचा. घोटाळ्यांच्या मालिकेची ही शर्यत पूर्ण करता करता केंद्रात पोहोचणे तसे त्यांना सोपे नाही. लालू आणि एकूणच मोदी विरोधकांना हाच मोठा फटका असणार आहे. अलीकडेच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष बाजीगर ठरला. मोदींच्या विजयापेक्षा राहुल गांधी यांचा निसटता पराभव अधिक चर्चेचा ठरला. पुढे २-जी घोटाळ्यातून ए. राजा आणि कनिमोळी सुटले. इकडे महाराष्टÑात ‘आदर्श’मधून अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला. मोदी विरोधकांची मोट अशी घट्ट होत असतानाच लालूंचा हा निकाल आला. गुजरात-हिमाचल प्रदेशची निवडणूक झाली. आता पाच महिन्यांत कर्नाटक निवडणुकीचे धूमशान आहे. कर्नाटकनंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुकीचा फड रंगणार आहे. हे होता होता २०१९ साली लोकसभेचा महासंग्राम होणार आहे. या महासंग्रामात मोदींशी टक्कर देण्यासाठी विरोधकांनी आतापासून मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. चारा घोटाळ्यात लालूंच्या तुरुंगात जाण्यामुळे या मोटीचे बळ काहीसे कमी झाले आहे.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव