शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

लालूंचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:45 IST

डोळे मिटून किती दिवस दूध प्यायचे, हे त्या त्या मांजरानेच ठरवायचे असते. मालक बदलला किंवा मालकाची नियत बदलली की धपाटा ठरलेला असतो.

डोळे मिटून किती दिवस दूध प्यायचे, हे त्या त्या मांजरानेच ठरवायचे असते. मालक बदलला किंवा मालकाची नियत बदलली की धपाटा ठरलेला असतो. त्यामुळे दूध पीत असतानाच हा सारा भवतालही पाहता यावा लागतो. राजकारण्यांचेही असेच असते. सत्ता ताब्यात आली रे आली की, डोळे मिटून दूध न पिणारा राजकारणी सध्या अपवादानेच सापडतो; मात्र हे करीत असतानाच ज्याची नजर भवतालही टिपत असते तो यशस्वी राजकारणी ठरतो. नाही तर त्याचा लालूप्रसाद यादव होतो. चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्टÑीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरविले. पोलिसांनी तातडीने त्यांना तुरुंगातही टाकले. न्यायालय ३ जानेवारी रोजी त्यांना शिक्षा सुनावेल. शासकीय तिजोरीतून १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले दाखवून ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याचा हा खटला होता. चारा न पुरवताच कंत्राटदारांच्या नावे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही त्याकडे कानाडोळा केला हा लालूंवरील आरोप सिद्ध झाला. यात त्यांना सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. सीबीआय अधिकारी जोगिंदरसिंग, अमित खरे, राकेश अस्थाना, यू. एन. बिश्वास असे जिगरबाज अधिकारी लाभले म्हणून या घोटाळ्याचा असा निकाल समोर आला. या घोटाळ्याच्या ३३ पैकी सहा खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य चार खटल्यांचे कामकाज अजून सुरूच आहे. बिहारच्या राजकारणात या निकालामुळे फारसा फरक पडेल असे अजिबात वाटत नाही. लालूंचे तुरुंगात जाणे बिहारला नवे नाही. चैबासा तिजोरीतून ३७.५ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद झाली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लालूंनी बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या म्हणजे राष्टÑीय जनता दलाच्या सर्वाधिक जागा निवडून आणल्या होत्या. लालूंवर कितीही आरोप झाले आणि ते सिद्ध झाले तरी बिहारमधील यादव आणि मुस्लीम समाज पाठीशी आहे तोपर्यंत लालूंना चिंता नाही. मुलगा तेजस्वी यादव यांना राजकीय वारस जाहीर करून याआधीच लालूंनी राज्यातील भविष्याची चिंता मिटविली आहे. हे दोन्ही समाज नितीशकुमार वा मोदींच्या भाजपला मतदान करतील, अशी अलीकडच्या काळात तीळमात्रही शक्यता नाही, त्यामुळे बिहारमध्ये लालूंच्या पक्षाला मरण नाही. राहिला प्रश्न केंद्राचा. घोटाळ्यांच्या मालिकेची ही शर्यत पूर्ण करता करता केंद्रात पोहोचणे तसे त्यांना सोपे नाही. लालू आणि एकूणच मोदी विरोधकांना हाच मोठा फटका असणार आहे. अलीकडेच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष बाजीगर ठरला. मोदींच्या विजयापेक्षा राहुल गांधी यांचा निसटता पराभव अधिक चर्चेचा ठरला. पुढे २-जी घोटाळ्यातून ए. राजा आणि कनिमोळी सुटले. इकडे महाराष्टÑात ‘आदर्श’मधून अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला. मोदी विरोधकांची मोट अशी घट्ट होत असतानाच लालूंचा हा निकाल आला. गुजरात-हिमाचल प्रदेशची निवडणूक झाली. आता पाच महिन्यांत कर्नाटक निवडणुकीचे धूमशान आहे. कर्नाटकनंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुकीचा फड रंगणार आहे. हे होता होता २०१९ साली लोकसभेचा महासंग्राम होणार आहे. या महासंग्रामात मोदींशी टक्कर देण्यासाठी विरोधकांनी आतापासून मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. चारा घोटाळ्यात लालूंच्या तुरुंगात जाण्यामुळे या मोटीचे बळ काहीसे कमी झाले आहे.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव