शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

बुद्धिमत्तेची चाचणी घेणार, कौशल्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:36 IST

शिक्षक निवड आणि नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता, गैरव्यवहार होतात हे सर्वज्ञात आहे. या अनुषंगाने खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरती गुणवत्तेवर आधारित व्हावी, निवड प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश २४ जून २०१५ च्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

- धर्मराज हल्लाळेशिक्षक निवड आणि नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता, गैरव्यवहार होतात हे सर्वज्ञात आहे. या अनुषंगाने खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरती गुणवत्तेवर आधारित व्हावी, निवड प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश २४ जून २०१५ च्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देताना खासगी शाळांमधील निवड प्रक्रियेत राज्य शासनाला हस्तक्षेप करता येणार नाही, असे स्पष्ट केले होते़ या दोन्ही निकालांचा संदर्भ घेऊन राज्य शासनाने खासगी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेल्या पहिली ते बारावी वर्गासाठी शिक्षण सेवक भरती प्रक्रिया अभियोग्यता व बुिद्धमत्ता चाचणीच्या निकालावर करण्याचे जाहीर केले आहे़भरती प्रक्रियेतील आर्थिक उलाढाल हे उघड सत्य आहे़ त्यावर अंकुश आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे हे आपण मान्य करू़ अनुदानित व अनुदानास पात्र असलेल्या सर्व शाळांमधील रिक्त पदांवर निवड करताना समान संधी मिळावी व तसेच उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड व्हावी, असाही उदात्त हेतू आहे़ तो सफल झाला तर सध्या बिनदिक्कतपणे सुरू असलेली अर्थव्यवहाराची व्यवस्था मोडीत निघेल़ त्या दिशेने पाऊल पडले पाहिजे़ मात्र निर्णय घेताना ठेवलेल्या पळवाटा गैरमार्ग निर्माण करणाºया ठरतात़ सध्या राज्यात सुरू असलेली अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा विषयनिहाय होत नाही़ मात्र सदर परीक्षेत मिळालेले सर्वाधिक गुण निवड प्रक्रियेसाठी गृहित धरले जाणार आहेत़ त्यात ज्या विषयाची जागा भरली जाणार आहे, त्या-त्या विषय ज्ञानाचा कितपत अंतर्भाव या परीक्षेत असणार हे स्पष्ट नाही़ डी.एड. पदविका व बी.एड. पदवी घेतलेल्यांना अध्यापन कौशल्याचे किमान प्रशिक्षण मिळते़ केवळ विषय ज्ञान असलेला शिक्षक उत्तम सेवा बजावू शकतो असे नाही, याउलट ज्यांच्याकडे अध्यापन कार्याचे उत्कृष्ट कौशल्य आहे ते विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरतात़ त्यामुळे मुलाखत, अध्यापन कौशल्याची चाचणी याचा या निवड प्रक्रियेत कुठेही संदर्भ नाही़ विशेष म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले परंतु डी.एड. वा बी.एड. केले नाही, अशांनीही सदर अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दिली आहे़ त्यांना अभियोग्यता चाचणीतील पात्र गुणांसह आधीपासूनच निश्चित असलेली डी.एड., बी.एड. तसेच संबंधित विषयातील पदवी, पदव्युत्तर ही शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे का याबाबत स्पष्टता करावी लागणार आहे़ एकूणच शालेय शिक्षण विभागाचा पसारा लक्षात घेता प्रत्येक जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागासाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाचा एक अधिकारी असावा, अशी सूचना सनदी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी शासनाकडे मांडली होती़ ती आज गरजेची वाटते़ सध्या अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न आहे़ तो सुटल्यानंतरच संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरती होईल़ त्यावेळी संस्थाचालकांची भूमिका समोर येईल़ अशावेळी निखळ गुणवत्तेवर एखाद्यास शाळेत नेमणूक देताना संस्थाचालक किती खळखळ करणार हाही कळीचा मुद्दा आहे़ नाही तरी सेवा शर्तीच्या कुठल्यातरी नियमावर बोट असणारच आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक