शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिमत्तेची चाचणी घेणार, कौशल्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:36 IST

शिक्षक निवड आणि नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता, गैरव्यवहार होतात हे सर्वज्ञात आहे. या अनुषंगाने खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरती गुणवत्तेवर आधारित व्हावी, निवड प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश २४ जून २०१५ च्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

- धर्मराज हल्लाळेशिक्षक निवड आणि नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता, गैरव्यवहार होतात हे सर्वज्ञात आहे. या अनुषंगाने खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरती गुणवत्तेवर आधारित व्हावी, निवड प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश २४ जून २०१५ च्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देताना खासगी शाळांमधील निवड प्रक्रियेत राज्य शासनाला हस्तक्षेप करता येणार नाही, असे स्पष्ट केले होते़ या दोन्ही निकालांचा संदर्भ घेऊन राज्य शासनाने खासगी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेल्या पहिली ते बारावी वर्गासाठी शिक्षण सेवक भरती प्रक्रिया अभियोग्यता व बुिद्धमत्ता चाचणीच्या निकालावर करण्याचे जाहीर केले आहे़भरती प्रक्रियेतील आर्थिक उलाढाल हे उघड सत्य आहे़ त्यावर अंकुश आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे हे आपण मान्य करू़ अनुदानित व अनुदानास पात्र असलेल्या सर्व शाळांमधील रिक्त पदांवर निवड करताना समान संधी मिळावी व तसेच उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड व्हावी, असाही उदात्त हेतू आहे़ तो सफल झाला तर सध्या बिनदिक्कतपणे सुरू असलेली अर्थव्यवहाराची व्यवस्था मोडीत निघेल़ त्या दिशेने पाऊल पडले पाहिजे़ मात्र निर्णय घेताना ठेवलेल्या पळवाटा गैरमार्ग निर्माण करणाºया ठरतात़ सध्या राज्यात सुरू असलेली अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा विषयनिहाय होत नाही़ मात्र सदर परीक्षेत मिळालेले सर्वाधिक गुण निवड प्रक्रियेसाठी गृहित धरले जाणार आहेत़ त्यात ज्या विषयाची जागा भरली जाणार आहे, त्या-त्या विषय ज्ञानाचा कितपत अंतर्भाव या परीक्षेत असणार हे स्पष्ट नाही़ डी.एड. पदविका व बी.एड. पदवी घेतलेल्यांना अध्यापन कौशल्याचे किमान प्रशिक्षण मिळते़ केवळ विषय ज्ञान असलेला शिक्षक उत्तम सेवा बजावू शकतो असे नाही, याउलट ज्यांच्याकडे अध्यापन कार्याचे उत्कृष्ट कौशल्य आहे ते विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरतात़ त्यामुळे मुलाखत, अध्यापन कौशल्याची चाचणी याचा या निवड प्रक्रियेत कुठेही संदर्भ नाही़ विशेष म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले परंतु डी.एड. वा बी.एड. केले नाही, अशांनीही सदर अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दिली आहे़ त्यांना अभियोग्यता चाचणीतील पात्र गुणांसह आधीपासूनच निश्चित असलेली डी.एड., बी.एड. तसेच संबंधित विषयातील पदवी, पदव्युत्तर ही शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे का याबाबत स्पष्टता करावी लागणार आहे़ एकूणच शालेय शिक्षण विभागाचा पसारा लक्षात घेता प्रत्येक जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागासाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाचा एक अधिकारी असावा, अशी सूचना सनदी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी शासनाकडे मांडली होती़ ती आज गरजेची वाटते़ सध्या अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न आहे़ तो सुटल्यानंतरच संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरती होईल़ त्यावेळी संस्थाचालकांची भूमिका समोर येईल़ अशावेळी निखळ गुणवत्तेवर एखाद्यास शाळेत नेमणूक देताना संस्थाचालक किती खळखळ करणार हाही कळीचा मुद्दा आहे़ नाही तरी सेवा शर्तीच्या कुठल्यातरी नियमावर बोट असणारच आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक