शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कुलगुरूंचा ‘निकाल’ लागला... विद्यापीठाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:00 IST

परीक्षा भवनासमोर सप्टेंबर महिन्यातही विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या. दिवसभर परीक्षा भवनात फिरून-फिरून थकलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच पडत होती.

पूजा दामलेपरीक्षा भवनासमोर सप्टेंबर महिन्यातही विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या. दिवसभर परीक्षा भवनात फिरून-फिरून थकलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच पडत होती. मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागतात, त्यामध्ये गोंधळ होतो या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर करताना, विद्यापीठाचे निकाल पारदर्शकपणे लागतील आणि लवकर लागतील, असा त्यांना विश्वास होता. पण, ढिसाळ नियोजन, प्राध्यापकांना योग्य पद्धतीने न मिळालेले प्रशिक्षण, तांत्रिक त्रुटी अशा सर्वच गोष्टींची परिणती अखेर निकालाच्या ‘लेटमार्क’वर दिसून आली.जून महिन्यात लागणारे निकाल अखेर १९ सप्टेंबरला जाहीर झाले. पण, या सर्व गोंधळात कुलगुरूंचा ‘निकाल’ लागला. मात्र, विद्यापीठाच्या निकालाचे काय, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. डॉ. संजय देशमुख यांची ७ जुलै २०१५ रोजी कुलगुरू पदी नियुक्ती झाली. यंदाचे विद्यापीठाचे १६०वे वर्ष असल्याने कुलगुरू या नात्याने अनेक कार्यक्रम आणि उपाययोजनांचे आयोजन केले होते. विद्यापीठात ‘डिजिटल लॉकर’ सुरू करण्यात आले. यानंतर आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची पद्धत देशमुख यांनी विद्यापीठात आणली. पण, ही पद्धत आणण्याची वेळ चुकली. कारण, पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा या मार्च -एप्रिल महिन्यात सुरू झाल्या. आणि आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया ही एप्रिल महिन्याच्या अखेर सुरू झाली.निविदा प्रक्रियेलाही पहिल्यांदा अत्यल्प प्रतिसाद मिळूनही कुलगुरूंनी हट्ट सोडला नाही. सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचा हट्ट कुलगुरूंना भोवला. हजारो विद्यार्थ्यांचे करिअर पणाला लागल्याने राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव यांनी निकालाच्या प्रकरणात लक्ष घातले. कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. या सगळ्या गोंधळात विद्यार्थी संघटना संतप्त होऊन कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी करू लागल्या. कुलगुरूंनी कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिले, पण राजीनामा दिला नाही. अखेर मंगळवार, २४ आॅक्टोबरला कुलगुरूंना पदावरून काढून टाकण्यात आले.१६० वर्षांच्या विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. आत्तापर्यंत विद्यापीठात प्राध्यापक हाती उत्तरपत्रिका तपासत होते. त्या वेळी उशीर झाला तरीही ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल हे जून महिन्यापर्यंत लागायचे. पण, आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत मात्र विद्यापीठाला या प्रक्रियेसाठी सप्टेंबर महिना उजाडला. पण, आॅनलाइन तपासणीसाठी ज्या कंपनीला कंत्राट दिले होते, त्या मेरिट ट्रॅक कंपनीवर अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. हिवाळी परीक्षांच्या उत्तरपत्रिकाही याच कंपनीतर्फे आॅनलाइन तपासून घेतल्या जाणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागल्याने राज्यभरातील विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला. मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली आहे.या सर्व गोंधळात सध्या विद्यापीठाचा सर्व कारभार हा प्रभारी खांद्यावर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा निकाल कधी लागणार, विद्यापीठ उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन पुन्हा सुरळीत कधी होणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राला पडले आहेत.कुलगुरू शोधण्याची परीक्षा...डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरू पदावरून काढून टाकण्यात आल्यावर राज्यपालांनी दुसºया दिवशी ‘कुलगुरू शोध समिती’ची स्थापना केली आहे. मुंबई विद्यापीठातील या गोंधळानंतर कुलगुरू निवडणे हीच मोठी परीक्षा आहे. विद्यापीठाची मलिन झालेली प्रतिमा उजळणे आणि निकालाचा गोंधळ होऊ न देणे या जबाबदाºया नवीन कुलगुरूंवर असणार आहेत.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ