शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

पवारांच्या नेतृत्वाबद्दल ही अविश्वासार्हता का?

By गजानन जानभोर | Updated: December 5, 2017 06:51 IST

अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या या ज्येष्ठ नेत्याच्या नेतृत्वाची ही अविश्वासार्हता वेदना देणारी आहे.

अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या या ज्येष्ठ नेत्याच्या नेतृत्वाची ही अविश्वासार्हता वेदना देणारी आहे.शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांत आदर आहे. गडकरी-फडणवीसांपासून तर राज-उद्धवपर्यंत सारेच नेते सणा-समारंभात तसा आदरही व्यक्त करीत असतात. परंतु पवारांच्या राजकारणाचा विषय आला की ही मंडळी सावध होतात. काँग्रेस नेत्यांना तर पवारांबद्दल वाटणाºया शंका-कुशंकांचा इतिहास तसा जुना आहे. गांधी घराण्याला ही गोष्ट वारशातून मिळालेली आहे. त्यामुळे पवारांबद्दल इंदिरा गांधी जेवढ्या साशंक राहायच्या तेवढेच राहुल गांधीसुद्धा असतात. त्यातूनच अन्य काँग्रेस नेत्यांना असलेले पवारांचे वावडे हे त्यांच्या राजकीय संस्काराचे अभिन्न अंग बनले आहे. हे संस्कारही पिढ्यान्पिढ्या सुरू असतात, अगदी शंकरराव चव्हांणापासून ते अशोक चव्हाणांपर्यंत.हा विषय इथे पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, येत्या १२ डिसेंबरला विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आयोजित केलेला काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचा संयुक्त मोर्चा. या मोर्चाचे नेतृत्व एकट्या पवारांकडे राहू नये म्हणून सध्या काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरूआहेत. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पुढे केले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून पवार आपल्या पक्षाची ताकद वाढवतील व ती भविष्यात आपल्यालाच नामोहरम करण्यासाठी वापरली जाईल, ही काँग्रेस नेत्यांना असलेली भीती पूर्वेतिहास बघता अनाठायी नाही पण अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या या ज्येष्ठ नेत्याच्या नेतृत्वाची ही अविश्वासार्हता त्याच्या चाहत्यांना वेदना देणारी आहे. पवारांबद्दल आदर आहे, पण विश्वास नाही. त्यांचे बोट धरावेसे वाटते पण ते कुठे नेतील याचा नेम नाही, या व अशा अनेक संभ्रमांमुळेच त्यांचे नेतृत्व सर्वमान्य, देशव्यापी होऊ शकलेले नाही. कधीकाळी वैचारिक निष्ठेपोटी आपले राजकीय आयुष्य पणास लावणारे पवार अलीकडच्या काळात भाजपाला मदत करतानाही या देशाने बघितले आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर पवार सुरुवातीच्या काळात मोदींच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. त्याच काळात त्यांच्या मनात राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल असंख्य प्रश्न निर्माण होतात. पण नंतर ते मोदींवर टीका करतात आणि राहुल त्यांना अचानक परिपक्वही वाटू लागतात. मध्येच ते मुख्यमंत्री फडणवीसांच्या जातीला टोचून बोलतात, त्यांना ‘बालिश’ ठरवतात. मनात प्रश्न येतो, ‘सुसंस्कृत मूल्ये कटाक्षाने पाळणारे पवार असे विखारी का वागतात’?पवारांनंतर त्यांच्या पक्षाचे काय? त्यांचा वारसदार कोण? हे दोन प्रश्न राजकीय क्षेत्रात जसे चर्चिले जातात तसेच ते पवारांनाही अस्वस्थ करीत असतात. अजूनही ते आपला उत्तराधिकारी ठरवू शकलेले नाहीत. दुसºया फळीचे नेतृत्व नाही, ज्यांच्याकडून आशा होत्या त्यातील काही जण तुरुंगात तर काही त्याच वाटेने आणि उर्वरित भाजपाच्या वाटेवर... अशा वातावरणात पक्षाचे अस्तित्व दाखविण्यासाठी पवारांना असे डावपेच खेळावे लागतात. आपल्याला ते राजकारण वाटते. पण खरे तर ते त्यांच्या मनातील द्वंद्व आहे. मुलांच्या भवितव्याची चिंता असली की बापाच्या मनात असे द्वंद्व निर्माण होत असते. या जाणत्या राजाच्या वर्तमान धरसोडीकडे काँग्रेस नेत्यांनी याच करुणेतून बघितले तर विधिमंडळ अधिवेशनातील मोर्चाच्या नेतृत्वाचा वाद मग शिल्लकच राहात नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस