शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध आई-बापाला लाथाडणाऱ्या दिवट्यांचे काय करायचे?

By किरण अग्रवाल | Updated: February 28, 2023 08:05 IST

आई-बापाची शेतीवाडी नावावर करून घेऊन म्हातारपणी त्यांना सांभाळण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कशी आणि का दिसते आहे?

- किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माणूस सोशल झाला, असे लाख म्हटले जात असले, तरी ते कसे फसवे, दिशाभूल करणारे व निखालस खोटे आहे, हे लक्षात आणून देणारी उदाहरणे कमी नाहीत. या फसव्या सामाजिकतेमागे दडलेला ढोंगी, विद्रुप व संवेदनाहीन चेहरा लपता लपत नाही, अन्यथा बापजाद्यांची शेतीवाडी नावावर करून घेऊन आईच्या म्हातारपणी तिचे पालन पोषण करण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कधी दिसली असती?

वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडीच्या एका ७२ वर्षीय वृद्ध स्त्रीला आपल्या उदरनिर्वाहासाठी सरकारी उंबरठे झिजवावे लागल्याची घटना अलीकडेच समोर आली आहे. कोरोनामुळे तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिच्या तिन्ही मुलांनी वडिलांची शेती आपल्या नावे करून घेतली व आईला वाऱ्यावर सोडले. अखेर या मातेने सरकारी हेल्पलाईनद्वारे आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचल्यावर तिला न्याय मिळाला. गेल्या ऐन दिवाळीच्या दिवशी अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातही एका वृद्धेला तिच्या पोराबाळांनी बेवारसपणे रस्त्यावर सोडून दिल्याचे प्रकरण समोर आले होते. आई-वडिलांची संपत्ती लाटून घेतल्यावर त्यांना बेवारस सोडून देणाऱ्या या व अशा घटनांमधून जीवनातील भेसुरताच समोर येते.

समाज माध्यमांवरील अंगठेबाज प्रतिसादाने हुरळून जात स्वतःचे ‘सोशल’ असणे सिद्ध करू पाहणाऱ्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या या घटना आहेत. अशा घटना अपवादात्मक  असतात हे खरे, पण या शितांवरून समाज नावाच्या अक्राळविक्राळ पातेल्यात शिजत असलेल्या भाताच्या दर्जाची कल्पना येतेच येते! या घटना पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचल्या म्हणून त्यांच्या बातम्या झाल्या आणि घरोघरी चाललेल्या कहाण्यांचे काही तुकडे समोर तरी आले. पण अनेक घरांमध्ये तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असलेली व अडगळीत पडलेली जी वृद्ध मंडळी आहेत त्यांच्या वाट्याला आलेल्या घुसमटल्या त्रासाचे काय? विशेषत: संयुक्त कुटुंब पद्धतीतून बाहेर पडलेल्या एकल कुटुंबातील वृद्धांच्या नशिबी आलेले एकाकीपण व त्यातही आपल्याच रक्ताच्या माणसांकडून होणारी उपेक्षा ही जिवंतपणी किती मरणयातना देणारी असेल, याचा विचारच संवेदनशील माणसाच्या मनाचा थरकाप उडवणारा आहे. 

वृद्ध माता-पित्यांच्या संगोपनाची जबाबदारी उचलावयास भाग पाडणारा कायदा आपल्याकडे आहे खरा, पण पोरांच्याच अब्रूचे धिंडवडे निघू नयेत म्हणून वेदनेने भळभळणाऱ्या जखमा उरात बाळगून अनेक मायबाप त्यांचे म्हातारपण अक्षरश: ओढत असतात.  सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशी अनेकांची अडचण आहे. कायदा असूनही हात टेकले जातात, कारण चारचौघात आपल्या घरातली ओंगळ धुणी धुण्याची लाज वाटते! पूर्वी निदान घराघरात आई-वडिलांच्या सांभाळाकडे नजर ठेवून  असलेली समाजव्यवस्था तरी तरुण जोडप्यांवर वचक ठेवीत असे. आता तर काय सगळ्याच बाबतीत समाजाला फाट्यावर मारण्याचाच रिवाज असल्याने ‘लोक काय म्हणतील?’ याची भीतीही सैल झाली आहे. त्यामुळे ना नात्यागोत्यातल्या लोकांची पर्वा, ना लोकलज्जेची. अशा स्थितीत घरातले ज्येष्ठ लोक दुर्लक्षाचे धनी होऊ लागले आहेत. आधीच जुनी घरे पाडून उभ्या राहात असलेल्या नवीन घरात म्हाताऱ्या माणसांच्या हक्काच्या जागा गमावल्या गेल्या आहेत. जुन्या घरात म्हातारा-म्हातारी अंगण, ओसरीत वावरत असत, आता ओसरी गेली आणि खेड्यातल्या घरातसुद्धा म्हाताऱ्यांची खाट  मागच्या दाराला गेली. हे कमी  म्हणून की काय, आता त्यांची  शेतीवाडी लुबाडून आई-वडिलांना थेट वाऱ्यावर सोडताना लोकांना काही वाटेनासे झाले आहे.

आपण खूप प्रगती केली. अगदी चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळावर पाणी शोधायला निघालो; मोबाईलमुळे अवघे जग मुठीत आले व त्यातूनच आपण सोशल व्हायला निघालो, पण खरंच झाले का तसे? अलीकडे बुवा, बाबा, प्रवचनकारांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यांचे मांडव भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहताना दिसतात. पण हे सारे पालथ्या घड्यावर पाणीच म्हणायचे का? मुलेबाळे असूनही वृद्धांना उदरनिर्वाहासाठी पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागत असेल, तर काय उपयोग या प्रगतीचा व सत्संगाचा?     kiran.agrawal@lokmat.com