शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

वृद्ध आई-बापाला लाथाडणाऱ्या दिवट्यांचे काय करायचे?

By किरण अग्रवाल | Updated: February 28, 2023 08:05 IST

आई-बापाची शेतीवाडी नावावर करून घेऊन म्हातारपणी त्यांना सांभाळण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कशी आणि का दिसते आहे?

- किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माणूस सोशल झाला, असे लाख म्हटले जात असले, तरी ते कसे फसवे, दिशाभूल करणारे व निखालस खोटे आहे, हे लक्षात आणून देणारी उदाहरणे कमी नाहीत. या फसव्या सामाजिकतेमागे दडलेला ढोंगी, विद्रुप व संवेदनाहीन चेहरा लपता लपत नाही, अन्यथा बापजाद्यांची शेतीवाडी नावावर करून घेऊन आईच्या म्हातारपणी तिचे पालन पोषण करण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कधी दिसली असती?

वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडीच्या एका ७२ वर्षीय वृद्ध स्त्रीला आपल्या उदरनिर्वाहासाठी सरकारी उंबरठे झिजवावे लागल्याची घटना अलीकडेच समोर आली आहे. कोरोनामुळे तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिच्या तिन्ही मुलांनी वडिलांची शेती आपल्या नावे करून घेतली व आईला वाऱ्यावर सोडले. अखेर या मातेने सरकारी हेल्पलाईनद्वारे आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचल्यावर तिला न्याय मिळाला. गेल्या ऐन दिवाळीच्या दिवशी अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातही एका वृद्धेला तिच्या पोराबाळांनी बेवारसपणे रस्त्यावर सोडून दिल्याचे प्रकरण समोर आले होते. आई-वडिलांची संपत्ती लाटून घेतल्यावर त्यांना बेवारस सोडून देणाऱ्या या व अशा घटनांमधून जीवनातील भेसुरताच समोर येते.

समाज माध्यमांवरील अंगठेबाज प्रतिसादाने हुरळून जात स्वतःचे ‘सोशल’ असणे सिद्ध करू पाहणाऱ्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या या घटना आहेत. अशा घटना अपवादात्मक  असतात हे खरे, पण या शितांवरून समाज नावाच्या अक्राळविक्राळ पातेल्यात शिजत असलेल्या भाताच्या दर्जाची कल्पना येतेच येते! या घटना पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचल्या म्हणून त्यांच्या बातम्या झाल्या आणि घरोघरी चाललेल्या कहाण्यांचे काही तुकडे समोर तरी आले. पण अनेक घरांमध्ये तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असलेली व अडगळीत पडलेली जी वृद्ध मंडळी आहेत त्यांच्या वाट्याला आलेल्या घुसमटल्या त्रासाचे काय? विशेषत: संयुक्त कुटुंब पद्धतीतून बाहेर पडलेल्या एकल कुटुंबातील वृद्धांच्या नशिबी आलेले एकाकीपण व त्यातही आपल्याच रक्ताच्या माणसांकडून होणारी उपेक्षा ही जिवंतपणी किती मरणयातना देणारी असेल, याचा विचारच संवेदनशील माणसाच्या मनाचा थरकाप उडवणारा आहे. 

वृद्ध माता-पित्यांच्या संगोपनाची जबाबदारी उचलावयास भाग पाडणारा कायदा आपल्याकडे आहे खरा, पण पोरांच्याच अब्रूचे धिंडवडे निघू नयेत म्हणून वेदनेने भळभळणाऱ्या जखमा उरात बाळगून अनेक मायबाप त्यांचे म्हातारपण अक्षरश: ओढत असतात.  सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशी अनेकांची अडचण आहे. कायदा असूनही हात टेकले जातात, कारण चारचौघात आपल्या घरातली ओंगळ धुणी धुण्याची लाज वाटते! पूर्वी निदान घराघरात आई-वडिलांच्या सांभाळाकडे नजर ठेवून  असलेली समाजव्यवस्था तरी तरुण जोडप्यांवर वचक ठेवीत असे. आता तर काय सगळ्याच बाबतीत समाजाला फाट्यावर मारण्याचाच रिवाज असल्याने ‘लोक काय म्हणतील?’ याची भीतीही सैल झाली आहे. त्यामुळे ना नात्यागोत्यातल्या लोकांची पर्वा, ना लोकलज्जेची. अशा स्थितीत घरातले ज्येष्ठ लोक दुर्लक्षाचे धनी होऊ लागले आहेत. आधीच जुनी घरे पाडून उभ्या राहात असलेल्या नवीन घरात म्हाताऱ्या माणसांच्या हक्काच्या जागा गमावल्या गेल्या आहेत. जुन्या घरात म्हातारा-म्हातारी अंगण, ओसरीत वावरत असत, आता ओसरी गेली आणि खेड्यातल्या घरातसुद्धा म्हाताऱ्यांची खाट  मागच्या दाराला गेली. हे कमी  म्हणून की काय, आता त्यांची  शेतीवाडी लुबाडून आई-वडिलांना थेट वाऱ्यावर सोडताना लोकांना काही वाटेनासे झाले आहे.

आपण खूप प्रगती केली. अगदी चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळावर पाणी शोधायला निघालो; मोबाईलमुळे अवघे जग मुठीत आले व त्यातूनच आपण सोशल व्हायला निघालो, पण खरंच झाले का तसे? अलीकडे बुवा, बाबा, प्रवचनकारांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यांचे मांडव भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहताना दिसतात. पण हे सारे पालथ्या घड्यावर पाणीच म्हणायचे का? मुलेबाळे असूनही वृद्धांना उदरनिर्वाहासाठी पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागत असेल, तर काय उपयोग या प्रगतीचा व सत्संगाचा?     kiran.agrawal@lokmat.com