शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध आई-बापाला लाथाडणाऱ्या दिवट्यांचे काय करायचे?

By किरण अग्रवाल | Updated: February 28, 2023 08:05 IST

आई-बापाची शेतीवाडी नावावर करून घेऊन म्हातारपणी त्यांना सांभाळण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कशी आणि का दिसते आहे?

- किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माणूस सोशल झाला, असे लाख म्हटले जात असले, तरी ते कसे फसवे, दिशाभूल करणारे व निखालस खोटे आहे, हे लक्षात आणून देणारी उदाहरणे कमी नाहीत. या फसव्या सामाजिकतेमागे दडलेला ढोंगी, विद्रुप व संवेदनाहीन चेहरा लपता लपत नाही, अन्यथा बापजाद्यांची शेतीवाडी नावावर करून घेऊन आईच्या म्हातारपणी तिचे पालन पोषण करण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कधी दिसली असती?

वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडीच्या एका ७२ वर्षीय वृद्ध स्त्रीला आपल्या उदरनिर्वाहासाठी सरकारी उंबरठे झिजवावे लागल्याची घटना अलीकडेच समोर आली आहे. कोरोनामुळे तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिच्या तिन्ही मुलांनी वडिलांची शेती आपल्या नावे करून घेतली व आईला वाऱ्यावर सोडले. अखेर या मातेने सरकारी हेल्पलाईनद्वारे आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचल्यावर तिला न्याय मिळाला. गेल्या ऐन दिवाळीच्या दिवशी अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातही एका वृद्धेला तिच्या पोराबाळांनी बेवारसपणे रस्त्यावर सोडून दिल्याचे प्रकरण समोर आले होते. आई-वडिलांची संपत्ती लाटून घेतल्यावर त्यांना बेवारस सोडून देणाऱ्या या व अशा घटनांमधून जीवनातील भेसुरताच समोर येते.

समाज माध्यमांवरील अंगठेबाज प्रतिसादाने हुरळून जात स्वतःचे ‘सोशल’ असणे सिद्ध करू पाहणाऱ्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या या घटना आहेत. अशा घटना अपवादात्मक  असतात हे खरे, पण या शितांवरून समाज नावाच्या अक्राळविक्राळ पातेल्यात शिजत असलेल्या भाताच्या दर्जाची कल्पना येतेच येते! या घटना पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचल्या म्हणून त्यांच्या बातम्या झाल्या आणि घरोघरी चाललेल्या कहाण्यांचे काही तुकडे समोर तरी आले. पण अनेक घरांमध्ये तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असलेली व अडगळीत पडलेली जी वृद्ध मंडळी आहेत त्यांच्या वाट्याला आलेल्या घुसमटल्या त्रासाचे काय? विशेषत: संयुक्त कुटुंब पद्धतीतून बाहेर पडलेल्या एकल कुटुंबातील वृद्धांच्या नशिबी आलेले एकाकीपण व त्यातही आपल्याच रक्ताच्या माणसांकडून होणारी उपेक्षा ही जिवंतपणी किती मरणयातना देणारी असेल, याचा विचारच संवेदनशील माणसाच्या मनाचा थरकाप उडवणारा आहे. 

वृद्ध माता-पित्यांच्या संगोपनाची जबाबदारी उचलावयास भाग पाडणारा कायदा आपल्याकडे आहे खरा, पण पोरांच्याच अब्रूचे धिंडवडे निघू नयेत म्हणून वेदनेने भळभळणाऱ्या जखमा उरात बाळगून अनेक मायबाप त्यांचे म्हातारपण अक्षरश: ओढत असतात.  सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशी अनेकांची अडचण आहे. कायदा असूनही हात टेकले जातात, कारण चारचौघात आपल्या घरातली ओंगळ धुणी धुण्याची लाज वाटते! पूर्वी निदान घराघरात आई-वडिलांच्या सांभाळाकडे नजर ठेवून  असलेली समाजव्यवस्था तरी तरुण जोडप्यांवर वचक ठेवीत असे. आता तर काय सगळ्याच बाबतीत समाजाला फाट्यावर मारण्याचाच रिवाज असल्याने ‘लोक काय म्हणतील?’ याची भीतीही सैल झाली आहे. त्यामुळे ना नात्यागोत्यातल्या लोकांची पर्वा, ना लोकलज्जेची. अशा स्थितीत घरातले ज्येष्ठ लोक दुर्लक्षाचे धनी होऊ लागले आहेत. आधीच जुनी घरे पाडून उभ्या राहात असलेल्या नवीन घरात म्हाताऱ्या माणसांच्या हक्काच्या जागा गमावल्या गेल्या आहेत. जुन्या घरात म्हातारा-म्हातारी अंगण, ओसरीत वावरत असत, आता ओसरी गेली आणि खेड्यातल्या घरातसुद्धा म्हाताऱ्यांची खाट  मागच्या दाराला गेली. हे कमी  म्हणून की काय, आता त्यांची  शेतीवाडी लुबाडून आई-वडिलांना थेट वाऱ्यावर सोडताना लोकांना काही वाटेनासे झाले आहे.

आपण खूप प्रगती केली. अगदी चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळावर पाणी शोधायला निघालो; मोबाईलमुळे अवघे जग मुठीत आले व त्यातूनच आपण सोशल व्हायला निघालो, पण खरंच झाले का तसे? अलीकडे बुवा, बाबा, प्रवचनकारांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यांचे मांडव भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहताना दिसतात. पण हे सारे पालथ्या घड्यावर पाणीच म्हणायचे का? मुलेबाळे असूनही वृद्धांना उदरनिर्वाहासाठी पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागत असेल, तर काय उपयोग या प्रगतीचा व सत्संगाचा?     kiran.agrawal@lokmat.com