शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

आध्यात्म म्हणजे काय? - सद्गुरू जग्गी वासुदेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 05:41 IST

या शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेच, आजच्या लोकप्रिय संस्कृतीत त्याच्या असलेल्या विविध प्रतिमा, आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात.

‘आध्यात्म’ या शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेच, आजच्या लोकप्रिय संस्कृतीत त्याच्या असलेल्या विविध प्रतिमा, आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात. दुर्दैवाने, त्यामुळे प्रचंड प्रमाणात गैरसमज निर्माण होतात. प्रामुख्याने आध्यात्म म्हणजे, शारीरिक मर्यादा पार करून आयुष्य अनुभवण्याची क्षमता.मानवी स्वभावाचे स्वरूपच असे आहे की, त्याचा एक भाग ज्याची सहजप्रवृत्ती आत्मसंरक्षण आहे, तो सतत मर्यादा निर्माण करून त्यांचे संरक्षण करत राहतो. मनुष्याची अजून एक बाजू आहे, ती या क्षणी आहे, तो जो आहे, त्यापेक्षा काहीतरी अधिक होण्याची इच्छा त्याच्यात सदैव कार्यरत असते. तुम्ही कोण आहात, किती मोठे आहात, तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही साध्य केले असले, तरीही त्याहूनही आणखी अधिक काही होण्याची इच्छा सदैव मनात असतेच. ती इच्छाच तुम्हाला सतत नवे काही करण्याची आशा जागृत करण्यास, त्यासाठी धडपड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास कारणीभूत ठरते.याचा अर्थ असा आहे की, आपल्यात असे काहीतरी आहे, जिला मर्यादा आवडत नाहीत. आपल्यात असे काहीतरी आहे, जे अमर्याद होण्यासाठी तळमळत आहे. ती दूर करण्यासाठी, लोकांनी सर्व प्रकारची शांततावादी तत्त्वज्ञाने अंगीकारण्याचा प्रयत्न केला आहे. आपण लोभी बनू नये, अशी शिकवण देऊन, सध्याच्या तुमच्या मर्यादांमध्येच कसे समाधानी राहायचे हे शिकवून, काहीतरी करून ती तळमळ थांबविण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांनी तुम्हाला कोणतीही शिकवण दिलेली असली, तरीही आज तुम्ही आहात, त्यापेक्षा अधिक काहीतरी बनण्याची तळमळ, या पृथ्वीतलावरील एकाही मनुष्याच्या मनात शमलेली नाही. कारण अमर्याद राहण्याची इच्छा अनंतकाळपासूनची आहे. त्यामुळे सतत काही ना काही नवे मिळवण्याची उर्मी सर्वांमध्ये निर्माण होत राहते.मनुष्याची ही तळमळ जेव्हा अगदी स्थूल रूपाने व्यक्त होते, तेव्हा आपण त्याला लैंगिकता म्हणतो. जर तिला भावनिक अभिव्यक्तीची जोड मिळाली, तर आपण त्याला प्रेम म्हणतो. जर या तळमळीत मानसिक अभिव्यक्ती आढळली, तर सहसा समाजात त्याकडे लोभ, महत्त्वाकांक्षा, विजय वगैरे म्हणून बघितले जाते. त्याला ते नाव किंवा रूप दिले जाते. फक्त जेव्हा तिला एक जागृत अभिव्यक्ती गवसते, तेव्हा ती एक आध्यात्मिक प्रक्रिया होते. ती प्रक्रिया गाठणे म्हणजेच आध्यात्म होय. त्यासाठीचे प्रयत्न गरजेचे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक