शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

वाचनीय लेख - ...‘अशा’वेळी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 06:40 IST

राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या विद्यार्थी-कर्मचारी आणि प्राध्यापक संघटनांच्या ‘दबाव तंत्रा’मुळे विद्यापीठातील वातावरण गढूळ झाले आहे.

डॉ. विजय पांढरीपांडे

नुकत्याच तीन विद्यापीठांच्या कुलगुरूपदी नव्या नियुक्त्या झाल्या आहेत. आजकाल कुलगुरूंसमोर व्यवस्थेची आणि व्यवस्थाबाह्य अशी अनेक आव्हाने आहेत. कुलगुरूचे पद म्हणजे फक्त काटेरी मुकुटच नव्हे, तर ती बाणाची काटेरी भीष्मशय्या असते. उस्मानिया विद्यापीठाचे एक माजी कुलगुरू म्हणत असत, एखाद्या कुलगुरूंना ब्लड प्रेशरचा त्रास नसेल तर ते काम करीत नाहीत, टाइमपास करतात असे खुशाल समजावे!

कुलगुरूंना  त्रास मुख्यत: विविध विद्यार्थी संघटना, कर्मचारी, प्राध्यापक संघटनांकडून होतो. या सगळ्या संघटना राजकीय पक्षांशी संबंधित असतात. तरुण मुलांना  नेतेगिरीचे प्रदर्शन करण्याची हौस असते. अनेक चांगले नेते, लोकप्रतिनिधी, मंत्री अशा चळवळीतूनच पुढे आले, यशस्वी झाले हेही खरे. एक गोष्ट आधीच स्पष्ट केलेली बरी. लोकशाही पद्धतीने योग्य, न्याय्य हक्कांसाठी लढा देणे यात काहीच गैर नाही. कुठल्याही व्यवस्थेत त्रुटी असतातच. निर्णयप्रक्रियेत माणसे असतातच. त्यांच्या हातून चुका होणे, कुणी त्या मुद्दाम करणे, कुणी अप्रामाणिक असणे शक्य आहे. अशा वेळी प्रशासनाच्या लक्षात त्या चुका आणून देणे, कायद्याच्या चौकटीत राहून न्यायासाठी आग्रह धरणे योग्यच. कुणीही कुलगुरू सहसा हे अमान्य करणार नाही. शिवाय न्याय्य मागण्या रेटण्यासाठी वेगवेगळी प्राधिकरणे  असतात, अधिकारी असतात. समित्या असतात. नाहीतर न्यायालयाचा देखील पर्याय असतोच शेवटचा! पण, हे सारे न जुमानता, ‘हम करे सो कायदा’, बेकायदा मागण्यांसाठी आग्रह, गुणवत्ता, दर्जा यांची तमा न बाळगता बेकायदा सवलतीसाठी दुराग्रह हे सारे वाढत चालले आहे.

नापास झालेल्या विद्यार्थ्याची पुढच्या वर्गात प्रमोशनची नियमात न बसणारी मागणी, ग्रेस गुण देऊन पास करण्याची मागणी, सायन्स, इंजिनियरिंगसारख्या विषयांत आवश्यक ती हजेरी नसतानाही परीक्षेला बसू देण्याची मागणी किंवा गुणवत्ता नसताना, नियमात बसत नसताना प्रमोशनचा अट्टहास!  एकदा सवलत मिळाली की, मग तेच उदाहरण वापरून पुन्हा-पुन्हा नियमभंग करून आपली मागणी पुढे रेटण्याचाच नियम होतो. हे प्रेशर फक्त संघटनांचेच नसते, वेगवेगळ्या प्राधिकरणांवर निवडून आलेल्या प्रतिनिधींचेही असते. विद्यापीठातील प्राधिकरणासाठीच्या निवडणुका माझ्या माहितीप्रमाणे फक्त महाराष्ट्रातील विद्यापीठांतच होतात. दक्षिणेकडे किंवा इतर विद्यापीठांत ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे कुलगुरूच नियुक्त्या करतात. त्याही  नियमित प्राध्यापकांच्या. आपल्या विद्यापीठ कायद्यात २०१६ साली काही चांगले बदल झाले खरे; पण परिस्थिती फारशी बदलली नाही. लोकशाही व्यवस्थेत सर्वांना प्रतिनिधित्व मिळायलाच हवे; पण या निवडणुकादेखील पक्षीय, राजकीय पातळीवरच लढल्या जातात. 

ज्याच्यावर आमदार, खासदार यांचा वरदहस्त तेच निवडून येतात. काही सन्माननीय अपवाद सोडले तर इथेही गुणवत्तेशी तडजोड केली जाते. निवडणुकीदरम्यान सुशिक्षित प्राध्यापक मंडळी एकमेकांशी ज्या पद्धतीने भांडतात, ते चित्र अनेकदा किळसवाणे असते. दक्षिणेकडे विद्यापीठांत अशा निवडणुका नसूनही कारभार तुलनेत अधिक चांगला चालतो. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी प्रशासनावर अंकुश ठेवण्यात, विद्यार्थी, प्राध्यापक यांचे न्याय्य प्रश्न कायदेशीर मार्गाने पुढे रेटण्यात गैर काहीच नाही; पण या प्राधिकरणाच्या बैठकांमधला गोंधळ मोठा तापदायक! इथेही कुलगुरूंना धारेवर धरण्याची प्रथा पाळली जाते. शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थी हिताचे निर्णय घेणे, नवे उपक्रम राबविणे हे सारे राहते बाजूला. कुलगुरूंना अडचणीत कसे आणता येईल, प्रशासनात अडथळे कसे निर्माण होतील, स्वतःचा, राजकारणी पक्षाचा, संघटनेचा अजेंडा कसा पुढे रेटता येईल, असाच प्रयत्न असतो. याचा अर्थ सगळा दोष संघटनांचा अन् कुलगुरू मात्र निर्दोष असे मुळीच नाही. काही कुलगुरूदेखील चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. खरे तर कुलगुरू या पदावरील व्यक्तीचे काम स्वतःच आदर्श घालून देण्याचे; पण प्रत्येक क्षेत्रात अपवाद असतात, हेही मान्यच! खरे तर विद्यापीठ संघटनांनी निर्दोष, प्रामाणिक व्यक्तीला त्रास देण्याऐवजी अशा भ्रष्ट मंडळींना शिक्षा होईल, यासाठी संघर्ष करायला हवा. त्यामुळे शिक्षणक्षेत्र काही प्रमाणात का होईना, स्वच्छ होईल!     

(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू,  आहेत)

vijaympande@yahoo.com

टॅग्स :universityविद्यापीठMumbaiमुंबई