शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राहुल गांधींवर टीका करण्याशिवाय जेटलींनी काय करायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 03:35 IST

रुपया मातीमोल झाला आणि तेलाचे भाव आकाशाला भिडले. अनेक धनवंत हजारो कोटींचा पैसा लंपास करून, हा देश सोडून पळाले आहेत आणि देशाचे अर्थमंत्री मात्र राहुल गांधींना शिवीगाळ करून आपला टीकेचा सूर बदलू पाहात आहेत.

रुपया मातीमोल झाला आणि तेलाचे भाव आकाशाला भिडले. अनेक धनवंत हजारो कोटींचा पैसा लंपास करून, हा देश सोडून पळाले आहेत आणि देशाचे अर्थमंत्री मात्र राहुल गांधींना शिवीगाळ करून आपला टीकेचा सूर बदलू पाहात आहेत. अरुण जेटली हे पंजाबच्या अमृतसर मतदारसंघात सपशेल आपटी खाल्लेले व केवळ मोदीकृपेने केंद्रात अर्थमंत्र्याच्या पदावर बसलेले गृहस्थ, राहुल गांधींना ‘विदूषक’ किंवा ‘विदूषकांचा राजपुत्र’ म्हणत असतील, तर तसे म्हणण्याएवढी त्यांची राजकीय औकात नाही आणि देशाला अर्थक्षेत्रातील प्रत्येक आघाडीवर अपयशी करणाऱ्या या माणसाचा तो अधिकारही नाही. राफेल विमानांच्या सौद्यात प्रचंड घोटाळा झाला असल्याचे व त्यात अनिल अंबानी या अपयशी उद्योगपतीला चाळीस हजार कोटींचा फायदा करून देण्याचे मोदी सरकारचे कृत्य, थेट फ्रान्सच्या सरकारनीच उघड केल्यानंतर, राहुल गांधींनी मोदींचे सरकार देशाचे चौकीदार नसून भागीदार आहेत आणि त्या भागीदारीत आता अंबानीही सामील आहेत, असे म्हटले. त्या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयानेही आता घेतली आहे. तरीही त्या आरोपाला सरळ उत्तर देण्याऐवजी अरुण जेटली राहुल गांधींवर नुसतीच चिखलफेक करीत असतील, तर त्यांच्याजवळ या आरोपाचे उत्तर नाही, असेच म्हटले पाहिजे. जरा आक्रमक पवित्रा घेतला की, विरोधक थंड होतात, हा राजकारणाचा अनुभव आहे, पण जेटलींजवळ आक्रमक होता येण्याएवढा जनाधार नाही आणि ते ज्या सरकारात मंत्री आहेत, त्यातील कोणताही मंत्री, खुद्द पंतप्रधानांसह त्याविषयी बोलताना दिसत नाहीत. तरीही जेटलींचे बोलणे सुरू राहते, याचे कारण आर्थिक आघाडीवर त्यांना येत असलेले देशबुडवे अपयश हे आहे. रुपया मातीमोल झाला आणि तेलाचे भाव आकाशाला भिडले. महागाई थांबत नाही आणि रोजगार उपलब्ध होत नाहीत. देशातील अनेक धनवंत हजारो कोटींचा पैसा लंपास करून, हा देश सोडून पळाले आहेत आणि देशाचे अर्थमंत्री मात्र राहुल गांधींना शिवीगाळ करून आपला टीकेचा सूर बदलत आहेत. त्यांचे दुर्दैव हे की, त्यांच्या मंत्रालयाजवळ देशाला सांगण्यासारखे काही राहिले नाही. त्यांना महागाईविषयी बोलता येत नाही, रुपया राखता येत नाही, बँका तारता येत नाही आणि सरकारची आर्थिक घसरणही थांबविता येत नाही. अडचण ही आहे की, मोदी विरोधकांना उत्तरे देत नाहीत आणि बाकीच्या मंत्र्यांचे कुणी ऐकून घेत नाहीत. एके काळी सुषमा स्वराज बोलायच्या, पण आता त्यांचा आवाज गेला आहे. निर्मला सीतारामन राफेलमध्ये अडकल्या आहेत. राजनाथ सिंगांना माध्यमात भाव नाही आणि अमित शहा काय बोलतील, याचा आगाऊ अंदाज साºयांनाच आला आहे. मग ती जबाबदारी आपली आहे, असे वाटून जेटली बोलतात, पण त्यांच्याजवळ विधायक असे काही नसते. मग ते विदूषकी आरोप करून विरोधकांना उत्तरे देताना दिसतात. मात्र, हे किती काळ कोण ऐकून घेईल आणि ऐकले, तरी त्यावर विश्वास कोण ठेवील. ते संबित पात्रा बिचारे उत्तरे देण्याची शर्थ करतात, पण मुळातच उत्तर नसेल, तर त्यांचे तरी कसे निभावणार. मग बाकीचे नुसत्याच गमती करतात. ‘अलाहाबाद’चे ‘प्रयागराज’ करतात. उद्या ‘हैदराबाद’चे ‘भागानगरी’ केले जाईल. पण हा सारा लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा बालिश प्रकार आहे. म्हणून जेटली अद्वातद्वा बोलतात. बँका बुडाल्याच्या बातम्यांहून त्यात थोड्यांना पकडले, त्यांच्या बातम्यांना महत्त्व देतात. मग एम. जे. अकबर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो. महिलांनी आक्रमक भूमिका घेतली की, मग मात्र आम्ही त्यापासून नामानिराळे आहोत, असे म्हटले जाते. मात्र, यातला खरा प्रश्न ज्या राहुल गांधींची आजवर ‘पप्पू’ म्हणून ज्या लोकांनी टिंगल केली, त्याची एवढी गंभीर दखल घेण्याची गरज या लोकांना तेव्हापासून वाटू लागली हा आहे. त्यांना गुजरातेत अपेक्षेहून मोठे यश मिळाले. शिलाँगचे बहुमत मिळाले. कर्नाटकात सरकार आणता आले आणि आता ते राजस्थानसह मध्य प्रदेश व छत्तीसगडही जिंकतील, असा अंदाज सर्वेक्षणांनी उघड केला आहे. जेटलींसह अनेकांना झालेला हा साक्षात्कार असे बोलायला लावीत असेल काय की, आता बोलण्याजोगे काही असेल, तर ते राहुल गांधींकडेच आहे आणि आपल्याजवळ त्यांना द्यायला उत्तरेही नाहीत, म्हणून हे बरळणे असे? काही का असेना, पण जेटलींसारख्या ज्येष्ठ वकिलाला व देशाच्या अर्थमंत्र्याला एवढ्या खालच्या पातळीवर येऊन बोलणे शोभत नाही, हे मात्र त्यांना सांगितलेच पाहिजे.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली