शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ कोणती शिक्षा द्यायची?

By admin | Updated: September 20, 2016 05:31 IST

पाकिस्तानने स्वत: वा आपल्या हस्तकांकरवी भारतावर हल्ला केला की भारत सरकार काही कर्मकांडे नित्यनेमाने पार पाडत असते.

पाकिस्तानने स्वत: वा आपल्या हस्तकांकरवी भारतावर हल्ला केला की भारत सरकार काही कर्मकांडे नित्यनेमाने पार पाडत असते. ‘हा हल्ला शिक्षेवाचून राहाणार नाही’ असे पंतप्रधानांनी म्हणायचे. ‘पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे’ हे घासून गुळगुळीत झालेले विधान गृहमंत्र्याने उच्चारायचे. ‘योग्य वेळ येताच पाकिस्तानला धडा शिकवू’ हे संरक्षण व्यवस्थेने सांगायचे. सेनाप्रमुखांनी घटनास्थळाला भेट द्यायची. संरक्षणमंत्र्यांनी श्रीनगरला जाऊन यायचे. ‘दातांच्या चाव्याला जबड्याच्या चाव्याने उत्तर मिळेल’ असे सत्ताधारी पक्षाच्या एका हलक्या पुढाऱ्याने जाहीर करायचे. हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शहिदांवर पुरस्कार, देणग्या, भेटी, सन्मान आदिंची कृतज्ञ उधळण करायची आणि संरक्षण विभागाचे सल्लागार अजित डोवाल यांनी बैठकीमागून बैठकी घेत ‘पुढल्या’ योजना आखायच्या. खरे तर देश या साऱ्याला आता कंटाळला आहे. लाल बहादूर शास्त्रींचे बळ आणि इंदिरा गांधींचे सामर्थ्य इतक्या हल्ल्यांनंतरही देशाच्या सरकारला एकवटता येऊ नये याचा अर्थ जनतेला कळतो. आपण पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना आणि क्षेपणास्त्रांना भितो काय? त्याच्या बाजूने चीन आपले शस्त्रागार घेऊन उभा राहील ही शंका आपल्याला भेडसावते काय? रशिया हा आपला एकेकाळचा मित्र देश स्वत:च तुटल्यामुळे आपली होणारी पाठराखण संपली काय? आणि अमेरिका हा देश त्यात एवढे दिवस पाणी भरल्यानंतरही पाकिस्तानवर निर्बंध घालायला नकार देत असेल तर त्याचे व आपले खरे नाते काय? संरक्षण मंत्री पर्रिकर दर दिवशी देशाची वाढलेली लष्करी ताकद सांगतात. डोवाल यांना संरक्षणाचे सगळे डावपेच समजतात असे सरकार सांगते आणि मोदींच्या प्रत्येक भाषणातला स्वर जास्तीचा चढा असतो. सरकारातली माणसे जळत्या प्रश्नांविषयी न बोलता नुसतीच विकासाचे न दिसणारे फुगे हवेत सोडताना दिसतात. गेली साठ वर्षे पाकिस्तान सीमेवर भांडण करीत आहे आणि गेल्या दोन अडीच वर्षात त्याची तीव्रता वाढली आहे. त्याचे घुसखोर पूर्वी एखाद दुसऱ्या सैनिकाला अडवायचे वा एखाद्या पलटणीवर गोळीबार करायचे. आता ते थेट पोलीस ठाण्यांवर आणि भारताच्या लष्करी तळांवर हल्ले करतात. त्यांना सहजपणे सीमा ओलांडता येते. हल्लेखोरी करून परतही जाता येते. आम्ही मात्र सीमेचा आदर सांभाळत आपली कुंपणे आतूनच मजबूत बनविण्याच्या प्रयत्नात असतो. झालेच तर आमचे सैनिक आणि पोलीस आमच्याच नागरिकांवर छऱ्यांच्या बंदुका चालवतात. शहरातली आणि ग्रामीण भागातली अल्पवयीन मुले मारतात. मात्र या सैनिकांना १४ कि.मी. अंतरावर असलेला रावळपिंडीचा पाकिस्तानी लष्करी तळ दिसत नाही आणि तेवढ्या अंतरातल्या त्याच्या हालचालींची माहिती आपल्या गुप्तचर यंत्रणांनाही कधी मिळत नाही. दहशतीला व दहशतखोरांना सात्विक वा बचावात्मक उत्तरे समजत नाहीत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरे द्यावी लागतात. ती नेहरू-पटेलांनी दिली. तशी शास्त्री व इंदिराजी यांनीही दिली. नंतरचा काळ मिठायांच्या देवाणघेवाणीचा. बसयात्रा आणि समझोता एक्स्प्रेस यांच्या दौडण्याचा. कारगील युद्धानंतरही हे दौडणे आणि मिठायांची देवाणघेवाण यात फरक पडलेला कुणाला दिसला नाही. आताचा काळ पंतप्रधानांच्या वारंवार होणाऱ्या पाक दौऱ्यांचा आणि त्यातही अकस्मात दिलेल्या खासगी भेटींचा. त्याही प्रयत्नांना महत्त्व आहे. त्यातून सद््भाव निर्माण होतो अशी अनेकांची धारणा आहे. पण शत्रू यालाच दुबळेपण समजत असेल तर काय? पाकिस्तानातून येणारे हल्लेखोर स्वत:ला जैश व अन्य कोणत्या संघटनेचे सभासद म्हणवितात. पण त्यांच्या हातची शस्त्रे पाकिस्तानची असतात ही गोष्ट अनेकदा सिद्ध झाली. त्याचे किती पुरावे आपण पाकिस्तानला पेश केले. पण नाठाळांवर चांगुलपणाचा वा सत्याचा प्रभाव पडत नाही. त्यांच्या माथ्यावरच हाणावे लागत असते. त्यातून पाकिस्तानचा इतिहासच मुजोर, नाठाळ व हल्लेखोरीचा आहे. भारतानेही गेली साठ वर्षे संरक्षणाच्या क्षेत्रात बऱ्याच दंडबैठका मारल्या. अण्वस्त्रांपासून शक्तिशाली शस्त्रांपर्यंतचे उत्पादन त्यानेही केले. शक्तिशाली क्षेपणास्त्रे त्याच्याजवळही आहेत. पाकिस्तान छोट्याशाही निमित्ताने अणुयुद्धाला आरंभ करील व ते युद्ध कमालीचे विनाशकारी असेल हे वास्तव आपल्या कारवाईच्या आड येत असते काय? पण मग ते पाकिस्तानच्या कारवायांनाही प्रतिबंध करीतच असणार. पाकिस्तान काहीही म्हणत असला तरी अणुयुद्धांचा काळ आता इतिहासजमा झाला आहे. अण्वस्त्रांची ताकद त्याच्या वापरात नसून त्याच्या दहशतीतच तेवढी उरली आहे. पाकिस्तानजवळ ते कळण्याएवढेही शहाणपण नसेल तर गोष्ट वेगळी. आपली अणुविषयक दहशत पाकिस्तानला समजून देण्यात आपले राजकारण अपयशी झाले आहे काय? १७ जवानांची परवाची शहादत आपल्या या अपयशातून आली काय? हुतात्म्यांना अमरपण लाभत असते. पाकिस्तानी हल्ल्यात बळी पडलेले भारतीय जवान अमर झाले आहेत. त्यांना हा देश कायमची मानवंदना देत राहील. पण त्यांच्या हौतात्म्याला आमचे राजकारण कारणीभूत झाले असेल तर त्याचे काय करायचे? आणि ते करणाऱ्यांना कोणती शिक्षा द्यायची?