शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी यांनी पुतीन यांच्यावर काय जादू केली?

By विजय दर्डा | Updated: November 7, 2022 07:58 IST

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीफ करून जगाला एक महत्त्वाचा संदेशच दिलेला आहे!

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीफ करून जगाला एक महत्त्वाचा संदेशच दिलेला आहे!

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन विनाकारण काही बोलत नाहीत, हे सगळे जग जाणते. ते जे बोलतात त्याच्याशी बांधील राहतात. सुज्ञपणे शब्द वापरतात; कारण एखाद्याविषयी आपण वापरलेला एक शब्दसुद्धा किती महत्त्वाचा असतो, हे त्यांना ठाऊक आहे. म्हणून पुतीन यांनी मॉस्कोमधील ‘वालदायी डिस्कशन क्लब’मध्ये नीतीविषयक जाणकारांच्या बैठकीत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुलेपणाने तारीफ केली, तेव्हा त्यांचे बोलणे संपूर्ण जगाने कान देऊन ऐकले. त्यांना काय म्हणायचे होते, हे समजून घ्यायला सुरुवात केली. पुतीन म्हणाले, ‘नरेंद्र मोदी जगातील निवडक, दुर्मीळ राजनेत्यांपैकी एक आहेत. अनेक प्रकारची दडपणे येऊनही ते आपल्या देशाचे हित डोळ्यांसमोर ठेवून स्वतंत्र परराष्ट्रनीती आखण्याची क्षमता बाळगतात!’ रशिया-भारताची ऐतिहासिक मैत्री आणि एकमेकांवरचा विश्वास यांचा उल्लेख करून पुतीन म्हणाले, ‘भारतावर आंतरराष्ट्रीय प्रतिबंध लावण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यातून मार्ग काढत पुढची वाटचाल चालूच ठेवली. 

भारताचा भविष्यकाळ सोनेरी आहे!’ भारत अमेरिकेच्या जास्त जवळ जाऊ नये आणि रशियाशी त्याची जवळीक टिकून राहावी, या संदर्भात पुतीन यांचे हे विधान पाहिले पाहिजे. जागतिक सत्ताकारणाच्या नव्या मांडणीत  रशिया आणि अमेरिका या दोघांनाही भारताची सारखीच गरज आहे. 

माझ्या मते, पुतीन यांच्या या विधानाला राजकारणापलीकडचा अर्थ आहे. अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लावून फार काळ झालेला नाही. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि निर्बंधांचा अर्थ असा की, ही खरेदी बंद करावी. अन्य एखादा देश अमेरिकेच्या दबावापुढे नरमला असता; परंतु भारताने रशियाकडून तेल खरेदी चालू ठेवली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आकडे समोर ठेवून सांगितले की, रशियाकडून युरोप एका दिवसात जेवढे तेल खरेदी करतो, तेवढे तर भारत एका महिन्यामध्ये घेतो ! 

‘एस ४००’ या क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदीही भारताने बिनधास्तपणे केली. अर्थात, भारताने अमेरिकेचे ऐकले नाही आणि दुसरीकडे, रशियाच्या नाराजीची पर्वा न करता अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानबरोबर ‘क्वाड’मध्ये (क्वाड्रीलॅटरल सिक्युरिटी डायलॉग)  भारत सामील झाला. तालिबानने  अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हा रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पेत्रुसेव आणि अमेरिकन गुप्तहेर संस्था ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांना चर्चेसाठी दिल्लीमध्ये यावे लागले, हे जगाने पाहिले आहे. 

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या बाबतीतही भारताने आपला दृष्टिकोन अत्यंत स्पष्टपणे मांडला. डोळे झाकून रशियाची साथ केली नाही. त्याचबरोबर युरोप किंवा अमेरिकेच्या पारड्यातही भारताने आपले वजन टाकले नाही. 

गरज पडली तेव्हा पुतीन यांच्या नजरेला नजर भिडवून मोदींनी ‘ही वेळ युद्धाची नाही,’ हेही ठणकावले. एका बाजूने भारताने इस्रायलशी असलेले संबंध घट्ट केले आणि दुसरीकडे अरब देशांशीही मैत्री वाढवली. अरब देशांमध्ये आता पाकिस्तानची नव्हे, तर भारताची दखल घेतली जाते. भारताचा दबदबा सगळ्या जगात वाढतो आहे. हा दबदबा वाढविण्यात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठे योगदान आहे, यात शंका नाही. पंतप्रधानांच्या खांद्याला खांदा भिडवून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर काम करीत आहेत. 

पुतीन यांच्या आधी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींची स्तुती केली होती. बराक ओबामा यांनी तर ‘टाइम’ मॅगझिनमध्ये मोदींवर एक लेख लिहिला होता. जगातील सर्वांत प्रभावशाली लोकांची यादी ‘टाइम’ नियतकालिक प्रसिद्ध करीत असते. या यादीत पाचवेळा मोदींचा समावेश झालेला आहे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर मोदी यांचे नाव भारताच्या तीन प्रभावशाली नेत्यांमध्ये घेतले जाते आहे. जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतर अत्यंत कठीण परिस्थिती असताना भारताला कुठल्याही गटात सामील होण्यापासून वाचविले आणि विकासाचा नवा अध्याय लिहिला. इंदिरा गांधी यांनी भारताच्या दृढतेचा परिचय सगळ्या जगाला करून दिला. आता मोदीजींनी भारताची ताकद संपूर्ण जगात एका नव्या टप्प्यावर पोहोचवली आहे.

नेहरूंनी त्यांच्या काळात जगभरातील नेत्यांना आपल्याकडे आकर्षित केले होते. ते त्यांची गळामिठी घेत. खांद्यावर हात ठेवत. केवळ नेहरू आणि जॉन एफ. केनेडी या दोघांनीच ब्रिटनच्या महाराणीसमोर मस्तक न झुकवता हस्तांदोलन केले. नेहरूंच्या वेळी भारताकडे नैतिक आणि वैचारिक ताकद होती आणि आज मोदींच्या काळात नैतिक आणि वैचारिक ताकदीबरोबरच आर्थिक ताकदही जोडली गेली आहे. मोदी या ताकदीचे प्रदर्शन करण्याच्या कलेत प्रसिद्ध आहेत.  

आज प्रत्येकच नेता मोदींना भेटण्याची इच्छा बाळगतो. मग ते बराक ओबामा असोत, जिनपिंग किंवा अन्य कोणी ! मोदी यांनी जगातील सामर्थ्यशील नेत्यांशी बरोबरीच्या पातळीवर संवाद साधला आहे. जगभरातील नेते मोदीजींची तारीफ करतात, त्यात ना आश्चर्य आहे, ना अतिशयोक्ती! महाशक्ती होण्याच्या शर्यतीत भारत सामील झाला आहे. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा....!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिन