शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

फार्स ठरणार काय?

By admin | Updated: January 11, 2016 02:59 IST

राजधानी दिल्लीतील प्रदूषणास अटकाव करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून तेथील राज्य सरकारने जो अभिनव प्रयोग सुरू केला तो एक फार्सच ठरतो की काय

राजधानी दिल्लीतील प्रदूषणास अटकाव करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून तेथील राज्य सरकारने जो अभिनव प्रयोग सुरू केला तो एक फार्सच ठरतो की काय अशी शंका निर्माण होऊ पाहते आहे. स्वयंचलित मोटारी प्रदूषणात भर घालण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करतात म्हणून त्यांच्या रस्त्यावर येण्यावरतीच काही प्रतिबंध घालावा म्हणून सरकारने सम-विषम योजना गेल्या एक तारखेपासून सुरू केली. याचा अर्थ ज्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकाचा शेवटचा अंक सम आहे अशी वाहने केवळ सम तारखांना आणि विषम क्रमांकाची वाहनेच तेवढी विषम तारखांना रस्त्यावर येतील. हा प्रयोग येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार असला तरी प्रयोग सुरू झाल्यापासूनच्या दहा दिवसात त्याचा नेमका काय परिणाम घडून आला हे सरकारच्या लक्षात आलेले दिसत नाही. कारण सरकारच्या या योजनेला विरोध करणाऱ्या ज्या काही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत त्यासंदर्भात सरकारने जो पाहणी अहवाल सादर केला तो न्यायालयाने साफ फेटाळला आहे. कारण त्यात कोणत्याही स्पष्ट निष्कर्षांचा उल्लेख नाही व हा अहवाल तयार करण्यासाठीचे सर्वेक्षण कोणी केले याचाही निर्देश नाही. केवळ तितकेच नव्हे, तर अहवालावर कोणाची स्वाक्षरीही नाही. परंतु सकृतदर्शनी जाणवणारी बाब म्हणजे दिल्लीतीलच सर्वोच्च न्यायालय सदर प्रयोगास अनुकूल तर उच्च न्यायालय प्रतिकूल आहे. प्रयोग पंधरा दिवस सुरू ठेवण्याची गरज काय, तो केवळ आठवडाभरच करा असे याच न्यायालयाने सुचविले होते. तथापि, दिल्ली सरकारचे वकील हरीश साळवे यांनी हा प्रयोग आणखी काही दिवस पुढे सुरू करण्याची विनंती न्यायालयाला केली असता खुद्द दिल्ली सरकारने मात्र असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान, ज्या याचिकाकर्त्यांचा प्रस्तुत योजनेस विरोध आहे त्यांनी प्रदूषणावर काम करणाऱ्या एका अधिकृत संस्थेचा अहवाल सादर करून प्रदूषण रोखणे वा कमी करणे यावर सम-विषम प्रयोगाचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मूलत: डिझेलवर चालणाऱ्या साऱ्या वाहनांना बंदी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे व केवळ दिल्लीच नव्हे तर इतरत्रही रस्त्यावरून धावणाऱ्या आलिशान मोटारी डिझेलवरच चालतात. कदाचित यामुळेच सर्वोच्च न्यायालयानेही एक आदेश बजावून पेट्रोलपेक्षा डिझेल कसे अधिक हानिकारक असते हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारवर टाकली आहे. १५ तारखेनंतर सर्व शाळा सुरू झाल्यानंतर खरे तर या प्रयोगाची कसोटी लागण्याची शक्यता असताना, त्या आधीच तो गुंडाळला गेल्यास हा प्रयोग एक फार्स ठरण्याचीच शक्यता अधिक दिसते.