शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे जाळायला निघणारा नेता रेल्वेमंत्री होतो तेव्हा काय घडले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 04:21 IST

जॉर्ज फर्नांडिस हे अजब रसायन होते. आक्रमकपणा, धमक आणि धाडसीपणा हे त्यांचे विशेष गुण. ‘जायंट किलर’, ‘बंद सम्राट’, ‘संप सम्राट’ अशी विशेषणे त्यांना कायम लागलेली.

- दिनकर रायकरजॉर्ज फर्नांडिस हे अजब रसायन होते. आक्रमकपणा, धमक आणि धाडसीपणा हे त्यांचे विशेष गुण. ‘जायंट किलर’, ‘बंद सम्राट’, ‘संप सम्राट’ अशी विशेषणे त्यांना कायम लागलेली. त्यातून एक बिनधास्त असे नेतृत्व उभे राहिले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मुंबईत अनेक संप घडवून आणले. मात्र हे संप कधी करावेत आणि ते कधी मागे घ्यावेत याचे एक वेगळे गणित जॉर्जनी स्वत:साठी आखलेले होते. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या कोणत्याची कामगाराचे नुकसान त्यांनी कधी होऊ दिले नाही. राज्य शासन कर्मचाऱ्यांनी ७० च्या दशकात संप केला. जॉर्जनी त्यांना पाठिंबा दिला. त्या वेळी नरेंद्र तिडके कामगार मंत्री होते. मात्र जॉर्ज कायम हिणवणाºया स्वरात तिडके यांचा उल्लेख करायचे. त्या काळात त्यांनी कामगार मंत्री असा कधीही उल्लेख केला नाही, उलट, ‘‘कुठंय तो मजूरमंत्री नरेंद्र महिपती तिडके...?’’ असाच उल्लेख करत जॉर्ज यांनी त्या वेळी तासन् तास भाषणे ठोकली होती. धाडसी स्वभावाला अनुसरूनच जॉर्जनी जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्याची पूर्ण शक्यता असतानाही मुंबई बंद करून दाखवण्याची खुमखुमी आम्हा पत्रकारांना बोलून दाखवली होती.१९७८ ची ही गोष्ट. विधानसभेच्या निवडणुकीत जनता पक्ष सर्वाधिक जागा घेऊन विजयी झाला होता. पण पूर्ण बहुमतासाठी त्यांना काही जागा कमी पडत होत्या. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असल्याने महाराष्ट्रातदेखील जनता पक्षाचे सरकार स्थापन व्हावे म्हणून जॉर्ज फर्नांडिस मुंबईत आले होते. आम्ही काही पत्रकार त्यांना भेटायला गेलो. चौपाटीच्या कठड्यावर खाली पाय सोडून आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. जवळच फिरणाºया चणेवाल्याकडून आम्ही चण्याच्या पुड्या घेतल्या आणि गप्पा रंगल्या. तेव्हा काँग्रेसच्या विचारसरणीचे आणि गांधीवादी नेते सादिक अली हे राज्यपाल होते. ते कोणाला सरकार स्थापन करण्यास बोलावणार याविषयी उत्सुकता होती. रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस वेगवेगळे लढले होते. त्यांनाही सत्ता स्थापन करण्यासाठी जागा कमी पडत होत्या. एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच होते. त्यामुळे राज्यपाल कोणाला बोलावणार हा कळीचा मुद्दा बनला होता. राज्यपालांवर दबाव टाकण्यासाठी तेव्हा केंद्रीय मंत्री असणारे जॉर्ज मुंबईत आले होते. साहजिकच आमच्या चर्चेत हा मुद्दा प्रमुख होता. तेव्हा चणे खाता-खाता जॉर्ज म्हणून गेले, ‘‘जर का आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावले नाही, तर उद्या मुंबई बंद करून दाखवतो की नाही ते पाहाच...’’ मात्र तशी वेळ वसंतदादा पाटील यांनी येऊ दिली नाही. इकडे जॉर्ज बोलत असताना तिकडे वसंतदादांनी दोन्ही काँग्रेस आणि अपक्षांना घेऊन राजभवन गाठले आणि बहुमत सिद्ध करून दाखवत सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळवले. रात्रीतून रेड्डी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस व अपक्षांचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आणि जॉर्जची मुंबई बंदची घोषणा चण्यासोबतच संपून गेली. पुढे तेच सरकार शरद पवार यांनी पाडून याच जनता पक्षाला सोबत घेत पुलोदचे सरकार स्थापन केले. पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा तेव्हापासून आजतागायत सुरू आहे.केंद्रात उद्योगमंत्री झाल्यावर जॉर्ज मुंबईच्या दौºयावर आले. आपला नेता उद्योगमंत्री म्हणून आलेला पाहून कामगार नेते उत्साहाने आपल्या मागण्या घेऊन भेटायला आले. काही उद्योगपतीही त्यांच्या उद्योगांना सवलती द्या म्हणत भेटायला आले. काही अधिकाºयांनी या दोन्ही बाजू ऐकत, आपण एक सेमिनार घेऊन यांचे प्रश्न सोडवू असा सल्ला जॉर्जना दिला. असा सल्ला देणाºया अधिकाºयावर डाफरतच ते म्हणाले होते, सेमिनार हा गुजराती शब्द आहे. सेमी म्हणजे अर्धो आणि नार म्हणजे मुलगी... अशी मुलगी काय निर्माण करणार..? असे म्हणत जॉर्जनी सेमिनारची कल्पना फेटाळून लावली.कायम उत्साही असणाºया जॉर्जचे अनेक किस्से आहेत. असाच एक कामगार नेता ते रेल्वेमंत्री या दोन्ही भूमिकांच्या वेळी घडलेला. कामगार नेता असताना रेल्वे भाडेवाढ झाली की रेल्वे बंद करणे, मोडतोड करणे, रेल्वे जाळण्याची धमकी देणे हे जॉर्जसाठी नित्याचे होते. मात्र ते स्वत:च केंद्रात रेल्वेमंत्री झाले आणि त्यांना रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करताना भाडेवाढ करावी लागली. हा एक अनोखा योगायोग होता. तेव्हा अनेकांनी आता आम्हीसुद्धा रेल्वे जाळायची का? असे म्हणत जॉर्जना भंडावून सोडले होते.काँग्रेसचे बडे प्रस्थ असणारे स.का. पाटील यांना त्या वेळी अनक्राऊन्ड किंग आॅफ मुंबई असे संबोधले जायचे. देशभरात त्यांचा दबदबा होता. आजही त्यांच्या नावाचे उद्यान चर्नी रोडजवळ आहे. त्यांच्या विरोधात जॉर्ज यांनी १९६७ साली लोकसभेची निवडणूक लढवली. आपण यांना हरवू शकतो... असे घोषवाक्य घेऊन जॉर्ज यांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली होती आणि खरोखरीच जॉर्जनी स.का. पाटील यांना पराभूत केले. त्या वेळी ‘जायंट किलर’ ही उपाधी त्यांना मिळाली. ती शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिली. मात्र पुढे केंद्रात गेल्यानंतर जॉर्ज यांचे कार्यक्षेत्र व्यापक झाले आणि ते कायम महाराष्ट्रबाहेरच रमले.बाळासाहेब आणि जॉर्जशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या संघटना वेगळ्या, विचार वेगळे, लढण्याची पद्धती वेगळी, दोघांचे राजकीय मार्गही वेगळे मात्र दोघांची मैत्री अफलातून होती. जॉर्जना सगळेच ‘जॉर्ज’ असे म्हणायचे; पण बाळासाहेबांना ‘बाळ’ अशी एकेरी हाक मारणाºया काही मोजक्या लोकांमध्ये जॉर्ज होते.(लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत)

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिस