शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
6
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
7
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
8
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
9
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
10
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
11
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
12
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
13
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
14
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
15
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
16
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
17
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
18
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
19
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
20
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  

रेल्वे जाळायला निघणारा नेता रेल्वेमंत्री होतो तेव्हा काय घडले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 04:21 IST

जॉर्ज फर्नांडिस हे अजब रसायन होते. आक्रमकपणा, धमक आणि धाडसीपणा हे त्यांचे विशेष गुण. ‘जायंट किलर’, ‘बंद सम्राट’, ‘संप सम्राट’ अशी विशेषणे त्यांना कायम लागलेली.

- दिनकर रायकरजॉर्ज फर्नांडिस हे अजब रसायन होते. आक्रमकपणा, धमक आणि धाडसीपणा हे त्यांचे विशेष गुण. ‘जायंट किलर’, ‘बंद सम्राट’, ‘संप सम्राट’ अशी विशेषणे त्यांना कायम लागलेली. त्यातून एक बिनधास्त असे नेतृत्व उभे राहिले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मुंबईत अनेक संप घडवून आणले. मात्र हे संप कधी करावेत आणि ते कधी मागे घ्यावेत याचे एक वेगळे गणित जॉर्जनी स्वत:साठी आखलेले होते. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या कोणत्याची कामगाराचे नुकसान त्यांनी कधी होऊ दिले नाही. राज्य शासन कर्मचाऱ्यांनी ७० च्या दशकात संप केला. जॉर्जनी त्यांना पाठिंबा दिला. त्या वेळी नरेंद्र तिडके कामगार मंत्री होते. मात्र जॉर्ज कायम हिणवणाºया स्वरात तिडके यांचा उल्लेख करायचे. त्या काळात त्यांनी कामगार मंत्री असा कधीही उल्लेख केला नाही, उलट, ‘‘कुठंय तो मजूरमंत्री नरेंद्र महिपती तिडके...?’’ असाच उल्लेख करत जॉर्ज यांनी त्या वेळी तासन् तास भाषणे ठोकली होती. धाडसी स्वभावाला अनुसरूनच जॉर्जनी जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्याची पूर्ण शक्यता असतानाही मुंबई बंद करून दाखवण्याची खुमखुमी आम्हा पत्रकारांना बोलून दाखवली होती.१९७८ ची ही गोष्ट. विधानसभेच्या निवडणुकीत जनता पक्ष सर्वाधिक जागा घेऊन विजयी झाला होता. पण पूर्ण बहुमतासाठी त्यांना काही जागा कमी पडत होत्या. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असल्याने महाराष्ट्रातदेखील जनता पक्षाचे सरकार स्थापन व्हावे म्हणून जॉर्ज फर्नांडिस मुंबईत आले होते. आम्ही काही पत्रकार त्यांना भेटायला गेलो. चौपाटीच्या कठड्यावर खाली पाय सोडून आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. जवळच फिरणाºया चणेवाल्याकडून आम्ही चण्याच्या पुड्या घेतल्या आणि गप्पा रंगल्या. तेव्हा काँग्रेसच्या विचारसरणीचे आणि गांधीवादी नेते सादिक अली हे राज्यपाल होते. ते कोणाला सरकार स्थापन करण्यास बोलावणार याविषयी उत्सुकता होती. रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस वेगवेगळे लढले होते. त्यांनाही सत्ता स्थापन करण्यासाठी जागा कमी पडत होत्या. एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच होते. त्यामुळे राज्यपाल कोणाला बोलावणार हा कळीचा मुद्दा बनला होता. राज्यपालांवर दबाव टाकण्यासाठी तेव्हा केंद्रीय मंत्री असणारे जॉर्ज मुंबईत आले होते. साहजिकच आमच्या चर्चेत हा मुद्दा प्रमुख होता. तेव्हा चणे खाता-खाता जॉर्ज म्हणून गेले, ‘‘जर का आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावले नाही, तर उद्या मुंबई बंद करून दाखवतो की नाही ते पाहाच...’’ मात्र तशी वेळ वसंतदादा पाटील यांनी येऊ दिली नाही. इकडे जॉर्ज बोलत असताना तिकडे वसंतदादांनी दोन्ही काँग्रेस आणि अपक्षांना घेऊन राजभवन गाठले आणि बहुमत सिद्ध करून दाखवत सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळवले. रात्रीतून रेड्डी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस व अपक्षांचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आणि जॉर्जची मुंबई बंदची घोषणा चण्यासोबतच संपून गेली. पुढे तेच सरकार शरद पवार यांनी पाडून याच जनता पक्षाला सोबत घेत पुलोदचे सरकार स्थापन केले. पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा तेव्हापासून आजतागायत सुरू आहे.केंद्रात उद्योगमंत्री झाल्यावर जॉर्ज मुंबईच्या दौºयावर आले. आपला नेता उद्योगमंत्री म्हणून आलेला पाहून कामगार नेते उत्साहाने आपल्या मागण्या घेऊन भेटायला आले. काही उद्योगपतीही त्यांच्या उद्योगांना सवलती द्या म्हणत भेटायला आले. काही अधिकाºयांनी या दोन्ही बाजू ऐकत, आपण एक सेमिनार घेऊन यांचे प्रश्न सोडवू असा सल्ला जॉर्जना दिला. असा सल्ला देणाºया अधिकाºयावर डाफरतच ते म्हणाले होते, सेमिनार हा गुजराती शब्द आहे. सेमी म्हणजे अर्धो आणि नार म्हणजे मुलगी... अशी मुलगी काय निर्माण करणार..? असे म्हणत जॉर्जनी सेमिनारची कल्पना फेटाळून लावली.कायम उत्साही असणाºया जॉर्जचे अनेक किस्से आहेत. असाच एक कामगार नेता ते रेल्वेमंत्री या दोन्ही भूमिकांच्या वेळी घडलेला. कामगार नेता असताना रेल्वे भाडेवाढ झाली की रेल्वे बंद करणे, मोडतोड करणे, रेल्वे जाळण्याची धमकी देणे हे जॉर्जसाठी नित्याचे होते. मात्र ते स्वत:च केंद्रात रेल्वेमंत्री झाले आणि त्यांना रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करताना भाडेवाढ करावी लागली. हा एक अनोखा योगायोग होता. तेव्हा अनेकांनी आता आम्हीसुद्धा रेल्वे जाळायची का? असे म्हणत जॉर्जना भंडावून सोडले होते.काँग्रेसचे बडे प्रस्थ असणारे स.का. पाटील यांना त्या वेळी अनक्राऊन्ड किंग आॅफ मुंबई असे संबोधले जायचे. देशभरात त्यांचा दबदबा होता. आजही त्यांच्या नावाचे उद्यान चर्नी रोडजवळ आहे. त्यांच्या विरोधात जॉर्ज यांनी १९६७ साली लोकसभेची निवडणूक लढवली. आपण यांना हरवू शकतो... असे घोषवाक्य घेऊन जॉर्ज यांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली होती आणि खरोखरीच जॉर्जनी स.का. पाटील यांना पराभूत केले. त्या वेळी ‘जायंट किलर’ ही उपाधी त्यांना मिळाली. ती शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिली. मात्र पुढे केंद्रात गेल्यानंतर जॉर्ज यांचे कार्यक्षेत्र व्यापक झाले आणि ते कायम महाराष्ट्रबाहेरच रमले.बाळासाहेब आणि जॉर्जशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या संघटना वेगळ्या, विचार वेगळे, लढण्याची पद्धती वेगळी, दोघांचे राजकीय मार्गही वेगळे मात्र दोघांची मैत्री अफलातून होती. जॉर्जना सगळेच ‘जॉर्ज’ असे म्हणायचे; पण बाळासाहेबांना ‘बाळ’ अशी एकेरी हाक मारणाºया काही मोजक्या लोकांमध्ये जॉर्ज होते.(लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत)

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिस