शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

भांडण असले म्हणून काय झाले? भेटायला हवेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 08:45 IST

जागतिक परिषदांत अनेकदा खडाजंगी होते; पण जगात शांतता नांदावी यासाठी अगदी शत्रू राष्ट्रांतही अशा परिषदा अधूनमधून होणे चांगलेच आहे.

वप्पाला बालचंद्रन, माजी विशेष सचिव, कॅबिनेट सचिवालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ फेब्रुवारी २३ रोजी नवी दिल्लीत ‘रायसीना डायलॉग’चे उद्घाटन केले. ग्रीसच्या हेलेनिक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोताकी यावेळी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याआधी काही दिवस १६ ते १८ फेब्रुवारीला म्युनीचमध्ये वार्षिक जागतिक सुरक्षा परिषद झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यासह जगातील अनेक नेते या परिषदेला उपस्थित होते. जयशंकर यांनी यावेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकेन आणि जर्मनीचे परराष्ट्रमंत्री अनालेना बरबॉक् यांच्याशी १७ फेब्रुवारी २४ रोजी संवाद साधला. 

शांग्रीला डायलॉग, शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन, निमरण डायलॉग अशा अनेक जागतिक किंवा प्रादेशिक परिषदा जगात ठिकठिकाणी होत आहेत. या परिषदा काय आहेत? आणि त्या काय साधू पाहतात? दुसऱ्या महायुद्धात जर्मन नाझी, इटॅलियन फॅसिस्ट आणि जपानी लष्कराचा प्रभाव झाल्यानंतर अशी अपेक्षा होती की, शांतता प्रस्थापित होईल; परंतु ती झाली नाही. रशियाने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केल्यानंतर शीतयुद्धाची सुरुवात झाली. विन्स्टन चर्चिल यांनी अमेरिकेतील मिसौरी परगण्यातील फुल्टन येथे ५ मार्च १९४६ रोजी अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांच्या उपस्थितीत ज्याला ‘पोलादी पडद्याचे भाषण’ असे संबोधले जाते ते दिले. ती पश्चिमी प्रतिकाराची सुरुवात होती.

नाटो (१९४९), सेंटो (१९५५) आणि सीएतो (१९५५) अशा लष्करी बांधणीतून अमेरिकेने नेतृत्व घेतले. ‘अटकाव सिद्धांत’ असे ज्याचे वर्णन केले जाते तो हा प्रयत्न होता. स्पेनमध्ये इटॅलियन गुन्हेगारीविषयक शास्त्रज्ञ सीजर बकारिया याने गुन्हे नियंत्रणासाठी हा सिद्धांत पुढे आणला. नंतर अमेरिकन संरक्षण रणनीतिकार बरनर ब्रोडी यांनी तो स्वीकारला. भारताने मात्र या कोणत्याच प्रयत्नात सहभागी व्हायला नकार दिला. दरम्यान, १९४५ साली हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बमुळे जवळपास २ लाख लोग मरण पावले. या भयाच्या सावटाखाली अमेरिकेत शांततावादीही वाढू लागले. ‘सॅटर्डे रिव्यू’चे प्रभावशाली संपादक नॉर्मल कझिन्स यांचा शांतता प्रयत्नात मोठा पुढाकार होता. हिरोशिमा, नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बमुळे मानवी इतिहासातील मृत्यूच्या तांडवाचे एक पर्व सुरु झाले आणि दुसरे शांतता प्रयत्नाचेही असे त्यांनी लिहिले होते.१९६० मध्ये कझिन्स यांनी डार्टमाउथ परिषद घेतली. 

आयसेनहॉवर आणि रशियाचे नेते निकिता क्रुश्चेव्ह यांची त्याला मान्यता होती. रशियन नागरिक आणि अमेरिका यांच्यातील या ना त्या स्वरूपात औपचारिकरीत्या झालेल्या संवादाची ही पुढे चालू राहिलेली सर्वांत मोठी फेरी होती. १९६२ मध्ये क्युबन क्षेपणास्त्र प्रकरण उद्भवल्यावर प्रावदाचे संपादक युरी झुको यांच्यामार्फत क्रुश्चेव्ह यांचे मन वळविण्याचा प्रयत्न कझिन्स यांनी केला. रशियन अधिकाऱ्यांच्या सल्ल्याविरुद्ध क्रुश्चेव्ह यांनी जहाल भूमिकेत बदल करावा यासाठी हे प्रयत्न होते. दरम्यान, भविष्यातील युद्ध टाळावे त्यासाठी स्टफेनबर्ग मंडळाने १९६३ साली म्यूनिक सुरक्षा परिषदेची सुरुवात केली. स्टफेनबर्ग हे बवेरियन होते. हिटलरविरुद्ध वल्किरी कट रचल्याबद्दल १९४४ मध्ये त्यांना फासावर लटकविण्यात आले होते. भविष्यामध्ये सशस्त्र संघर्ष कसे टाळावेत यासाठी अमेरिका आणि जर्मन अधिकाऱ्यांमध्ये सुरळीत बोलणी होण्यासाठी एकत्र यावे ही यामागची कल्पना होती. नंतर इतर काही देश त्यात सामील झाले. ‘इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या लंडनस्थित संस्थेने आशिया पॅसिफिक संरक्षणमंत्र्यांची परिषद २००१ साली सिंगापूरमधील हॉटेल शांग्रीलामध्ये सुरू केली. शांग्रीला डायलॉग या नावाने ती ओळखली जाते. अमेरिकेचे संरक्षणमंत्री विल्यम पेरी यांनी १९९६ मध्ये मुळात ही कल्पना मांडली होती.

‘शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ चीन आणि रशियाने २००१ साली सुरू केली. ती सर्वांत मोठी प्रादेशिक संस्था ठरते. आधी ‘शांघाय ५’ म्हणून ती सुरू झाली. त्यात चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिझस्तान आणि ताजिकिस्तान हे देश होते. २०२३ साली भारत सदस्य झाला. अशा परिषदांमध्ये कधी कधी खडाजंगी होते हे खरे असले तरी कट्टर शत्रूंच्या अशा परिषदा अधूनमधून होणे शांततेसाठी केव्हाही चांगलेच आहे.