शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

‘नेहरू नेहरू काय करता?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 05:51 IST

काश्मीरचा प्रश्न जनतेचे सार्वमत घेऊन सोडविण्याची युनोची अट भारताने मान्य केली. मात्र, काश्मीरचा जो भाग पाकिस्तानने ताब्यात घेतला आहे, तो अगोदर मुक्त केला पाहिजे, अशी अट भारत सरकारने घातली. पाकिस्तान आपले सैन्य मागे घेणार नाही, याची पूर्ण कल्पना नेहरू व पटेलांना होती.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काश्मीरचा दौरा केल्यानंतर, संसदेत भाषण करताना त्यांच्या नित्याच्या सवयीप्रमाणे पं. नेहरूंवर काश्मीर प्रश्नासाठी टीका केली. काश्मीरचा प्रश्न आला की, त्यासाठी नेहरूंना जबाबदार धरणे ही गोष्ट रा.स्व.संघ आरंभापासून करीत आला आहे. जनसंघ व भाजप हे त्याने निर्माण केलेले पक्षही तोच वसा त्याची शहानिशा न करता आजही तसाच चालवीत आहे.

वास्तव हे की, देश स्वतंत्र झाला, तेव्हा त्यातील सर्व संस्थानिकांना आपले संस्थान भारत वा पाकिस्तान यापैकी कोणत्याही एका देशात विलीन करण्याचे अधिकार देण्यात आले होते. काश्मीरचे संस्थानिक राजा हरिसिंग हे त्याविषयीचा निर्णय अखेरपर्यंत घेत नव्हते. या काळात जीनांनी त्यांना अनेक सवलती जाहीर केल्या होत्या. काश्मिरातील जनता बहुसंख्येने मुस्लीम असल्यामुळे ते संस्थान पाकिस्तानला मिळावे, या मताचे अनेक नेते भारतात होते. स्वत: सरदार पटेल, डॉ. आंबेडकर व त्यांच्याच तोडीचे अनेक नेते या मताचे होते, परंतु हरिसिंग निर्णय लांबणीवर टाकत होते. पुढे तर त्यांनी भारत व पाकिस्तान यांच्याशी एक वर्षाचा स्टँड स्टील (जैसे थे) करार केला. परिणामी, भारताला आरंभी त्यासाठी काही करता आले नाही. पाकिस्तानने मात्र न थांबता २२ ऑक्टोबर, १९४७ या दिवशी काश्मिरात आपले टोळीवाले घुसविले व पाहता-पाहता ते श्रीनगरपासून १३ कि.मी. अंतरावर येऊन थडकले.

गळ्यापर्यंत असे पाणी आले, तेव्हा हरिसिंगाने भारत सरकारकडे मदत मागितली. तेव्हा ‘आधी विलीनीकरण व मगच सहकार्य’ ही अट नेहरू व पटेलांनी त्याला स्पष्टपणे ऐकविली. कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्याने हरिसिंगाने विलीनीकरणाला मान्यता देऊन त्याच्या जाहीरनाम्यावर सही केली. काश्मीर भारतात असे विलीन झाले. नंतरच्या युद्धाची कहाणी मनस्ताप देणारी आहे. कारण भारत स्वतंत्र झाला, तेव्हा त्याची एकूण सैन्यसंख्या पाच लक्ष होती. त्यातील दोन लक्ष वीस हजार सैनिकांनी पाकिस्तानात जाणे पसंत केले. भारताकडे दोन लक्ष ऐंशी हजारांची फौज शिल्लक राहिली. सारा दारूगोळा व शस्त्रास्त्रे समान वाटली गेली. या स्थितीत पाकिस्तानला त्याचे सारे सैन्य व शस्त्रे काश्मीरच्या सीमेवर एकवटणे शक्य होते. ही स्थिती दोन्ही देशांचे सैन्यबळ व शस्त्रबळ सारखे असल्याचे सांगणारी आहे. हे युद्ध १ जानेवारी, १९४९ पर्यंत, म्हणजे तब्बल १४ महिने चालून थांबले. एवढे दिवस लढाई करूनही भारतीय सैन्याला सारे काश्मीर मुक्त करणे, ते दोन्ही बाजूंच्या सैन्याच्या सारखेपणामुळे शक्य झाले नाही.

काश्मीरचा प्रश्न त्या स्थितीत युनोकडे नेला गेला. पराभव स्वीकारायचा नाही आणि तडजोडही करायची नाही, या भूमिकेतून हा निर्णय घेतला गेला. याच वेळी काश्मीरचा प्रश्न जनतेचे सार्वमत घेऊन सोडविण्याची युनोची अट भारताने मान्य केली. मात्र, ती मान्य करताना काश्मीरचा जो भाग पाकिस्तानने ताब्यात घेतला आहे, तो त्याने अगोदर मुक्त केला पाहिजे, अशी अट भारत सरकारने घातली. पाकिस्तान आपले सैन्य असे मागे घेणार नाही, याची पूर्ण कल्पना नेहरू व पटेलांना होती. आजची युद्धबंदी रेषा अशी निश्चित झाली. काश्मीरबाबतचे तत्कालीन वास्तव असे असताना, काश्मीरचा प्रश्न नेहरूंनी बिघडविला, असे वारंवार खोटे सांगून ते जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न संघाने आजवर केला. ‘हे युद्ध आणखी दोन दिवस चालले असते, तरी सारे काश्मीर मुक्त झाले असते’ असे सांगणाऱ्या शहाण्यांचाही एक वर्ग देशात आहे. जे युद्ध चौदा महिने चालू आहे तेथे थांबले, ते दोन किंवा दहा दिवसांत निकाली निघाले असते, असे म्हणणाऱ्यांच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

काश्मीरवर लिहिल्या गेलेल्या कोणत्याही पुस्तकात हे लष्करी वास्तव सांगितले गेले नाही. ते न सांगण्यावरच नेहरूंच्या टीकाकारांचा भर राहिला. अमित शहा नावाचा माणूस नेहरूंवर तीच टीका करतो व त्याच्या पक्षाला ती खरी वाटते, याचे कारणही हेच आहे. त्यामुळे ‘वास्तव लक्षात घ्या, नुसते नेहरू नेहरू करू नका’ हे त्यांना गुलाम नबी आझादांनी ऐकविले ते सत्य गंभीरपणे घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर