शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

याचा अर्थ काय?

By admin | Updated: December 29, 2016 03:37 IST

आपण नेमके काय बोलतो आणि त्याचा काय अर्थ निघू शकतो याचा काहीही विचार न करता स्वत:ची कातडी बचावण्यासाठी प्रसंगी लोक कसे बेलगाम बोलतात याचा जणू वस्तुपाठच

आपण नेमके काय बोलतो आणि त्याचा काय अर्थ निघू शकतो याचा काहीही विचार न करता स्वत:ची कातडी बचावण्यासाठी प्रसंगी लोक कसे बेलगाम बोलतात याचा जणू वस्तुपाठच तामिळनाडूचे माजी मुख्य सचिव पी. राम मोहन राव यांनी घालून दिला आहे. त्यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे मारुन नव्या चलनातील ३० लाख रुपये व पाच किलो सोने जप्त केल्याचे आयकर विभागाने जाहीर केल्यानंतर राव यांना मुख्य सचिव पदावरुन राज्य सरकारने तत्काळ दूर केले (निलंबित नव्हे) आपल्या विरुद्ध झालेल्या या कारवाईबद्दल माध्यमांशी बोलताना राव यांनी म्हटले आहे की जर जयललिता हयात असत्या तर आयकर विभागाने आपल्या घर आणि कार्र्यालयावर धाड मारण्याची हिंमतच केली नसती. याचा एक अर्थ असा निघतो की, आपण जो कारभार करीत होतो त्या कारभाराला सर्वार्थाने जयललिता यांचा पाठिंबा आणि समर्थन होते. थोडक्यात त्या भ्रष्टाचार्यांच्या पाठीराख्या होत्या. आयकर विभागाने राव यांच्याशी संबंधित एकूण अकरा जागी छापे मारले. पण मोठे घबाड राव यांचे पुत्र विवेक याच्यापाशी सापडल्याचे व आपण पाच कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचे मालक असल्याचे त्यानेच कबूल केल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. या सर्व धाडसत्राचे मूळ त्या राज्यातील वाळू माफिया शेखर रेड्डी याच्या उद्योगांशी आहे. त्याच्याकडे आयकर विभागाने धाड मारली असता तब्बल १३५कोटींची रोकड आणि १७७ किलो सोने आयकर अधिकाऱ्यांच्या हाती लागले होते. त्याशिवाय जी कागदपत्रे हाती लागली त्यांच्याच आधारे नंतर राम मोहन राव आणि पुत्र विवेक यांच्याकडे धाडी टाकण्यात आल्या. माध्यमांशी बोलताना राव यांनी एकाच वेळी केन्द्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांवर आरोप केले आहेत. केन्द्र सरकारला राज्यांच्या अधिकारांची जराही तमा नाही आणि म्हणूनच केन्द्राने तामिळनाडू राज्यावर असा हल्ला केला आणि राज्य सरकारदेखील आपले म्हणजे त्याच सरकारच्या एका अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याचे रक्षण करु शकले नाही असा दुहेरी आरोप त्यांनी केला आहे. हा दुसरा आरोप सरळ सरळ त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्व्हम यांच्यावरच आहे. पण तो करतानाच त्यांच्याकडे केन्द्राने या धाडीसाठी अनुमती मागितली होती का आणि मागितली असल्यास त्यांनी ती दिली होती का, याविषयी आपणास काही ठाऊक नाही असेही त्यांनी म्हटले आहे. आपला आणि आपल्या मुलाचा व त्याच्या व्यवहारांचा काहीही संबंध नाही असा नेहमीचाच खुलासादेखील त्यांनी केला आहे. राम मोहन राव यांनी जयललिता यांच्या संदर्भात जे विधान केले आहे तो त्यांचा केवळ एक बचाव नसून वास्तव आहे असे गृहीत धरले तरी त्यातही काही आश्चर्य नाही. कारण स्वच्छ कारभारासाठी जयललिता कधीच ख्यातकीर्त नव्हत्या.