शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

विश्वस्तवृत्तीचा अभाव का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 06:10 IST

पाच-पाच हजार कोटींच्या आलिशान राजवाड्यामध्ये राहणारे हे देशाचे ‘राजे’ नागरिक, असलेले लोक आपत्तींच्यावेळी काय करतात?

केरळला आपल्या प्राचीन ग्रंथांनी देवभूमी म्हटले आहे. या भूमीवरच आता नियतीचा कोप प्रलयाच्या रूपाने कोसळला असून त्यातली लाखो माणसे बेघर, हजारो बेपत्ता आणि तेवढ्याच घरांची, रस्त्यांची, पुलांची व रेल्वे मार्गाची हानी झाली आहे. आपत्तीने केलेल्या एकूण उत्पाताचा प्राथमिक अंदाज १९ हजार कोटींवर जाणारा आहे. केरळ ही ज्ञानवंतांची, अभ्यासकांची, लेखकांची आणि कर्तृत्वसंपन्नांचीही भूमी आहे. मात्र निसर्गाचा कोप अशा माणसांना व त्यांच्या भूमीला वेगळे करीत नाही हा जगाचा अनुभव आहे. अशा आपत्तीच्या काळात सारा देश एक होतो व आपत्ग्रस्तांना मदतीचा हात देतो हाही आपला इतिहास आहे. केरळचे पिनारायी सरकार त्याच्या सर्वशक्तिनिशी या संकटाशी झुंजत असतानाच त्याला केंद्र सरकारने ६०० कोटींची मदत तत्काळ पुरविली आहे. शिवाय लष्कर, हवाई दल व नौसेना यांचेही साहाय्य त्या राज्यात रवाना केले आहे. महाराष्ट्र सरकारने २५ कोटींचे साहाय्य जाहीर केले व आता काँग्रेससह अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी त्यांचे वेतन या मदत कार्याला पाठविले आहे. मात्र फाटलेले आकाश शिवायला ही मदत पुरेशी नाही. केरळमधील अनेक तरूण व तरूणी युनायटेड, अरब गणराज्यात त्यांची सेवा देत आहेत. त्या देशानेही आपले साहाय्यतेविषयीचे कर्तव्य बजावले आहे. देशातील इतर राज्ये, संघटना आणि सामान्य लोकही या भीषण संकटाने हेलावले आहेत. त्यांच्याकडूनही केरळच्या दिशेने मदतीचा ओघ वाहू लागला आहे. तसा तो राज्याराज्यातून वाहूही लागला आहे. ज्या देशाची वार्षिक योजना काही लक्ष कोटींची असते त्याला १९ हजार कोटींचे नुकसान भरून काढता येणे जमणारेही आहे. मात्र प्रत्येकच नैसर्गिक वा अन्य कोपासाठी केवळ सरकारनेच पुढे येणे व लोकांनीही सरकारवरच अवलंबून राहणे ही वृत्ती फारशी चांगली नाही. सरकार जनतेचे असल्याने ते आपली जबाबदारी पार पाडतच असते. मात्र एवढे सारे नुकसान एकट्याने भरून काढण्याएवढी ऐपत असणारे धनवंत उद्योगपती या देशात फार आहेत. एका आर्थिक सर्वेक्षणात देशातील एक टक्का लोकांकडे त्यातील ७९ टक्के संपत्तीचा संचय असल्याचे आढळले आहे. उरलेली माणसे बाकीच्यात समाधान मानणारी वा कसेबसे जगणारी आहेत. यासंदर्भात देशातील बड्या धनवंतांना गांधीजींचे शब्द आठवत नसतील तर ते देशाचे दुर्दैव आणि या धनवंतांचे करंटेपण आहे. आपली संपत्ती आपली नसून आपण तिचे केवळ विश्वस्त आहोत असे समजण्यात व ती समाजाच्या गरजेच्या वेळी कामी आणता येणे ही विश्वस्तबुद्धी आहे़ गांधींजी वर्गसंघर्षाऐवजी वर्गसमन्वयावरच विश्वास ठेवीत़ केरळातील आपत्तीने सामान्य माणसे द्रवलेली दिसत असली तरी देशातील कोणत्याही मोठ्या उद्योगपतीला तिने अजून पाझर फोडल्याचे दिसत नाही. तीन-तीन अन् चार- चार लक्ष कोटींच्या उद्योगाचे मालक असणारे, दरदिवशी कित्येक लाखांचा खर्च स्वत:वर व आपल्या कुटुुंबावर करणारे आणि पाच-पाच हजार कोटींच्या आलिशान राजवाड्यामध्ये राहणारे हे देशाचे ‘राजे’ नागरिक, असलेले लोक अशावेळी काय करतात? स्वातंत्र्याच्या लढ्याला साहाय्य करणारे सगळेच उद्योगपती व धनवंत आता इतिहासजमा झाले काय? एखादा बिल गेट्स आपल्या संपत्तीचा निम्मा वाटा जगाच्या कामासाठी देतो़ तो गांधींचा खरा अनुयायी असतो त्याला तशी मानसिकता लाभत असते. आपल्या समाजातील अशा वर्गात ही वृत्ती आली तर केवळ केरळसारख्या संकटग्रस्त भागाचेच कल्याण होणार नाही, तर गांधींचा वर्गसमन्वय प्रत्यक्षात येऊन या धनवंताचे भवितव्यही सुरक्षित होईल़

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरbusinessव्यवसाय