शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विश्वस्तवृत्तीचा अभाव का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 06:10 IST

पाच-पाच हजार कोटींच्या आलिशान राजवाड्यामध्ये राहणारे हे देशाचे ‘राजे’ नागरिक, असलेले लोक आपत्तींच्यावेळी काय करतात?

केरळला आपल्या प्राचीन ग्रंथांनी देवभूमी म्हटले आहे. या भूमीवरच आता नियतीचा कोप प्रलयाच्या रूपाने कोसळला असून त्यातली लाखो माणसे बेघर, हजारो बेपत्ता आणि तेवढ्याच घरांची, रस्त्यांची, पुलांची व रेल्वे मार्गाची हानी झाली आहे. आपत्तीने केलेल्या एकूण उत्पाताचा प्राथमिक अंदाज १९ हजार कोटींवर जाणारा आहे. केरळ ही ज्ञानवंतांची, अभ्यासकांची, लेखकांची आणि कर्तृत्वसंपन्नांचीही भूमी आहे. मात्र निसर्गाचा कोप अशा माणसांना व त्यांच्या भूमीला वेगळे करीत नाही हा जगाचा अनुभव आहे. अशा आपत्तीच्या काळात सारा देश एक होतो व आपत्ग्रस्तांना मदतीचा हात देतो हाही आपला इतिहास आहे. केरळचे पिनारायी सरकार त्याच्या सर्वशक्तिनिशी या संकटाशी झुंजत असतानाच त्याला केंद्र सरकारने ६०० कोटींची मदत तत्काळ पुरविली आहे. शिवाय लष्कर, हवाई दल व नौसेना यांचेही साहाय्य त्या राज्यात रवाना केले आहे. महाराष्ट्र सरकारने २५ कोटींचे साहाय्य जाहीर केले व आता काँग्रेससह अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी त्यांचे वेतन या मदत कार्याला पाठविले आहे. मात्र फाटलेले आकाश शिवायला ही मदत पुरेशी नाही. केरळमधील अनेक तरूण व तरूणी युनायटेड, अरब गणराज्यात त्यांची सेवा देत आहेत. त्या देशानेही आपले साहाय्यतेविषयीचे कर्तव्य बजावले आहे. देशातील इतर राज्ये, संघटना आणि सामान्य लोकही या भीषण संकटाने हेलावले आहेत. त्यांच्याकडूनही केरळच्या दिशेने मदतीचा ओघ वाहू लागला आहे. तसा तो राज्याराज्यातून वाहूही लागला आहे. ज्या देशाची वार्षिक योजना काही लक्ष कोटींची असते त्याला १९ हजार कोटींचे नुकसान भरून काढता येणे जमणारेही आहे. मात्र प्रत्येकच नैसर्गिक वा अन्य कोपासाठी केवळ सरकारनेच पुढे येणे व लोकांनीही सरकारवरच अवलंबून राहणे ही वृत्ती फारशी चांगली नाही. सरकार जनतेचे असल्याने ते आपली जबाबदारी पार पाडतच असते. मात्र एवढे सारे नुकसान एकट्याने भरून काढण्याएवढी ऐपत असणारे धनवंत उद्योगपती या देशात फार आहेत. एका आर्थिक सर्वेक्षणात देशातील एक टक्का लोकांकडे त्यातील ७९ टक्के संपत्तीचा संचय असल्याचे आढळले आहे. उरलेली माणसे बाकीच्यात समाधान मानणारी वा कसेबसे जगणारी आहेत. यासंदर्भात देशातील बड्या धनवंतांना गांधीजींचे शब्द आठवत नसतील तर ते देशाचे दुर्दैव आणि या धनवंतांचे करंटेपण आहे. आपली संपत्ती आपली नसून आपण तिचे केवळ विश्वस्त आहोत असे समजण्यात व ती समाजाच्या गरजेच्या वेळी कामी आणता येणे ही विश्वस्तबुद्धी आहे़ गांधींजी वर्गसंघर्षाऐवजी वर्गसमन्वयावरच विश्वास ठेवीत़ केरळातील आपत्तीने सामान्य माणसे द्रवलेली दिसत असली तरी देशातील कोणत्याही मोठ्या उद्योगपतीला तिने अजून पाझर फोडल्याचे दिसत नाही. तीन-तीन अन् चार- चार लक्ष कोटींच्या उद्योगाचे मालक असणारे, दरदिवशी कित्येक लाखांचा खर्च स्वत:वर व आपल्या कुटुुंबावर करणारे आणि पाच-पाच हजार कोटींच्या आलिशान राजवाड्यामध्ये राहणारे हे देशाचे ‘राजे’ नागरिक, असलेले लोक अशावेळी काय करतात? स्वातंत्र्याच्या लढ्याला साहाय्य करणारे सगळेच उद्योगपती व धनवंत आता इतिहासजमा झाले काय? एखादा बिल गेट्स आपल्या संपत्तीचा निम्मा वाटा जगाच्या कामासाठी देतो़ तो गांधींचा खरा अनुयायी असतो त्याला तशी मानसिकता लाभत असते. आपल्या समाजातील अशा वर्गात ही वृत्ती आली तर केवळ केरळसारख्या संकटग्रस्त भागाचेच कल्याण होणार नाही, तर गांधींचा वर्गसमन्वय प्रत्यक्षात येऊन या धनवंताचे भवितव्यही सुरक्षित होईल़

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरbusinessव्यवसाय