शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘आम्ही सारे गलिच्छ’

By admin | Updated: November 23, 2015 21:44 IST

नरेन्द्र मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून ज्या मोजक्या गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे त्यातीलच एक बाब म्हणजे स्वच्छ भारत अभियान.

नरेन्द्र मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून ज्या मोजक्या गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे त्यातीलच एक बाब म्हणजे स्वच्छ भारत अभियान. संपूर्ण देश स्वच्छ व्हावा आणि जनसामान्यांना आरोग्यदायी जीवनाचा व निर्मळ वातावरणाचा अनुभव घेता यावा म्हणून आधीची सरकारेदेखील काही योजना राबवीतच होती. खुद्द महाराष्ट्रातही अशा काही योजना अस्तित्वात आहेत. पण मोदींनी आपल्या स्वच्छ भारत अभियानाला थेट राष्ट्रीय कार्यक्रमात स्थान दिले. पण त्यांच्या या अभियानाला जनतेचा मिळालेला आणि मिळत असलेला प्रतिसाद केवळ विषण्ण करणारा आहे. केन्द्र सरकारने वर्षभराच्या कालावधीत तब्बल एक कोटींहून अधिक स्वच्छतागृहे निर्माण केली असली तरी त्यातील निम्म्याहून अधिक स्वच्छतागृहांचा वापरच केला जात नसल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका राष्ट्रीय नमुना पाहणीच्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल सरकारला नामुष्की आणणारा असल्याने सरकारने तो जाहीर न करण्याची दक्षता घेतली असली तरी वास्तव मात्र सरकारलाही लपवता आलेले नाही. जेमतेम पन्नास टक्क््यांच्याही खाली स्वच्छतागृहे वापरणारे लोक जसे ग्रामीण भागातले आहेत तसेच ते शहरी भागातलेही आहेत. नमुना तपासणी करणाऱ्यांना असे आढळून आले की, पन्नास टक्क््यांपेक्षा जास्त स्वच्छतागृहांचा वापर धान्य किंवा तत्सम बाबी साठवून ठेवण्याच्या गोदामासारखा केला जातो आणि लोक मात्र सकाळ-संध्याकाळ शेतात वा उघड्यावरच जाऊन आपले विधी उरकत असतात. यातील एक अत्यंत आश्चर्यकारक आणि सुखद बाब म्हणजे ईशान्येकडील राज्यांमध्ये मात्र स्वच्छतागृहांचा वापर अगदी शंभर टक्के आहे. स्वच्छतागृहांच्या निर्मितीनंतर त्यांची पाहणी करण्यामागील एक हेतू लोकांच्या मानसिकतेमध्ये काही बदल घडून आला आहे का, याची तपासणी करण्याचाही होता. पण तसा फारसा बदल झालेला दिसून आलेला नाही. ‘आम्ही सारे गलिच्छ’ ही आणि अशीच मानसिकता असेल तर त्याला सरकार तरी काय करणार?