शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही सारे गलिच्छ’

By admin | Updated: November 23, 2015 21:44 IST

नरेन्द्र मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून ज्या मोजक्या गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे त्यातीलच एक बाब म्हणजे स्वच्छ भारत अभियान.

नरेन्द्र मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून ज्या मोजक्या गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे त्यातीलच एक बाब म्हणजे स्वच्छ भारत अभियान. संपूर्ण देश स्वच्छ व्हावा आणि जनसामान्यांना आरोग्यदायी जीवनाचा व निर्मळ वातावरणाचा अनुभव घेता यावा म्हणून आधीची सरकारेदेखील काही योजना राबवीतच होती. खुद्द महाराष्ट्रातही अशा काही योजना अस्तित्वात आहेत. पण मोदींनी आपल्या स्वच्छ भारत अभियानाला थेट राष्ट्रीय कार्यक्रमात स्थान दिले. पण त्यांच्या या अभियानाला जनतेचा मिळालेला आणि मिळत असलेला प्रतिसाद केवळ विषण्ण करणारा आहे. केन्द्र सरकारने वर्षभराच्या कालावधीत तब्बल एक कोटींहून अधिक स्वच्छतागृहे निर्माण केली असली तरी त्यातील निम्म्याहून अधिक स्वच्छतागृहांचा वापरच केला जात नसल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका राष्ट्रीय नमुना पाहणीच्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल सरकारला नामुष्की आणणारा असल्याने सरकारने तो जाहीर न करण्याची दक्षता घेतली असली तरी वास्तव मात्र सरकारलाही लपवता आलेले नाही. जेमतेम पन्नास टक्क््यांच्याही खाली स्वच्छतागृहे वापरणारे लोक जसे ग्रामीण भागातले आहेत तसेच ते शहरी भागातलेही आहेत. नमुना तपासणी करणाऱ्यांना असे आढळून आले की, पन्नास टक्क््यांपेक्षा जास्त स्वच्छतागृहांचा वापर धान्य किंवा तत्सम बाबी साठवून ठेवण्याच्या गोदामासारखा केला जातो आणि लोक मात्र सकाळ-संध्याकाळ शेतात वा उघड्यावरच जाऊन आपले विधी उरकत असतात. यातील एक अत्यंत आश्चर्यकारक आणि सुखद बाब म्हणजे ईशान्येकडील राज्यांमध्ये मात्र स्वच्छतागृहांचा वापर अगदी शंभर टक्के आहे. स्वच्छतागृहांच्या निर्मितीनंतर त्यांची पाहणी करण्यामागील एक हेतू लोकांच्या मानसिकतेमध्ये काही बदल घडून आला आहे का, याची तपासणी करण्याचाही होता. पण तसा फारसा बदल झालेला दिसून आलेला नाही. ‘आम्ही सारे गलिच्छ’ ही आणि अशीच मानसिकता असेल तर त्याला सरकार तरी काय करणार?