शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

वेलकम, राहुल गांधी! ‘सब का साथ, सब का विकास’ संकल्पना केवळ राजकीय लाभासाठी होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 05:42 IST

राजकीय सत्ता, आर्थिक विकासाची घोडदौड, लोककल्याणकारी योजना आदींपासून वंचित राहिलेला मोठा वर्ग आज राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला प्रतिसाद देतो आहे, असे दिसते आहे.

खंडप्राय भारतात उत्तरेच्या दिल्लीच्या तख्तावरून राज्यकर्ते राज्य करायचे. ज्या राज्यकर्त्याकडे  अधिकाधिक भूभाग, तो राजा अधिक प्रभावी मानला जात असे. यासाठी हे राजे मग दिल्लीचे तख्त सोडून दक्षिणेवर स्वारी करायला बाहेर पडत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे दिल्लीचे तख्त मिळविण्यासाठी, दक्षिणेकडून उत्तरेवर स्वार होण्यासाठी पायी निघाले आहेत. गेले साठ दिवस दक्षिणेच्या प्रांतातून भ्रमण करीत सोमवारी त्यांनी महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात प्रवेश केला, तेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते आणि जनतेने त्यांचे जोरदार स्वागत करताना ‘वेलकम, राहुल गांधी’ असा नारा दिला.

लोकशाही राज्यव्यवस्थेत अंकित प्रदेशावरून राज्यकर्त्यांचा प्रभाव मोजला जात नाही. लोकमताचा प्रभाव, लोकांचे मत महत्त्वाचे असते. ज्या नेत्याकडे किंबहुना राजकीय पक्षाकडे लोकांच्या मतांचा, बहुमताचा कौल असेल, तो नेता किंवा राजकीय पक्ष जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र चालविण्यास पात्र ठरतो. भारतीय लोकशाही व्यवस्थेत २०१४ मध्ये लोकमताने एक मोठे वळण घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला प्रथमच बहुमत दिले. तेव्हापासून काँग्रेस पक्ष आपल्या राजकीय विचारशक्तीची लढाई लढतो आहे. भाजपने  नव्या राष्ट्रवादाची भूमिका मांडली असली तरी ती सर्वसमावेशक नक्कीच नाही. बहुमताच्या जोरावर बहुसंख्याकवादाला यश आले असले तरी, ‘सब का साथ, सब का विकास’ ही संकल्पना केवळ राजकीय लाभासाठी होती, हे आता स्पष्ट झाले आहे. परिणामी, राजकीय सत्ता, आर्थिक विकासाची घोडदौड, लोककल्याणकारी योजना आदींपासून वंचित राहिलेला मोठा वर्ग आज राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला प्रतिसाद देतो आहे, असे दिसते आहे.

राहुल गांधी यांच्या यात्रेचे नियोजन करणाऱ्यांनी ही यात्रा केवळ मोठमाेठ्या शहरांतून न जाता ग्रामीण आणि निमशहरी भागांतूनच कशी जाईल, याची दक्षता घेतली आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक किंवा औरंगाबाद, कोल्हापूर वगळूनच ती पुढे मध्य प्रदेशात जाणार आहे. ज्यांचा आवाज आज कोणी ऐकत नाही, अशा उपेक्षित समाजातील माणसांशी संवाद करीत ही यात्रा जाणार आहे. लोकांचा या यात्रेला प्रतिसाद मिळतो आहे. श्रीनगर येथे या यात्रेचा समारोप होईल. तसे पाहिले तर भारतीय राजकारणाच्या इतिहासात अनेक यात्रा- पदयात्रांची नोंद आहे.

स्वातंत्र्योत्तर काळातही माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी यात्रा काढली होती. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी रामरथ यात्रा काढली होती. व्यापक भारतीय समाजाच्या सर्व समस्यांना स्पर्श करणारी चंद्रशेखर यांच्या यात्रेनंतरची ‘भारत जोडो’ ही पहिली यात्रा आहे. देशात भाजपची भरभक्कम सत्ता असल्याचा दावा केला जात असताना राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचललेले हे पाऊल धाडसाचे आहे. भारताने विविध आघाड्यांवर उत्तम प्रगती केलेली असली तरी नव्या रचनेतून अनेक समस्याही तयार झाल्या आहेत.  विशेषत: शेती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामीण विकासाचे प्रश्न गंभीर होत आहेत. शिक्षण, आरोग्य, हवामान, पर्यावरण आदी प्रश्नांची गुंतागुंत वाढते आहे. त्यात सापडलेल्या बहुसंख्याकांचे राजकारण कोणी करू पाहत नाही. याउलट धार्मिक, जातीय भावनांचा आधार घेणारे राजकारण प्रभावी झाले आहे. त्यास ठाम विरोध करणारी स्पष्ट भूमिका राहुल गांधी मांडताना दिसतात. भारताला अशाच भूमिकेतून स्वत:च्या समस्यांकडे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी लढणारा राजकीय विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे.

सद्य:स्थितीत राष्ट्रीय पातळीवर सत्तारूढ भाजप आणि विरोधक काँग्रेस या दोनच पर्यायांचा विचार आहे. अनेक प्रादेशिक पक्ष त्या- त्या प्रांतांत प्रभावी असले तरी ते राष्ट्रीय पर्याय ठरत नाहीत. काँग्रेसने जरूर त्यांची मदत घेतली पाहिजे, त्याचवेळी देशव्यापी भारत जोडो यात्रेतून स्वत:ची राजकीय ताकदही उभी केली पाहिजे. राहुल गांधी यांनी याच उद्देशाने आयोजित केलेल्या पदयात्रेतून नवा आशेचा किरण दिसतो आहे. म्हणून तर भाजप आणि त्यांचे समविचारी राजकीय पक्ष त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.  महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या यात्रेत सहभागाचा निर्णय घेऊन सकारात्मक विरोधी आघाडी भक्कम करण्याच्या बाजूने भूमिका घेतलेली दिसते. अशा पार्श्वभूमीवर या यात्रेचे महाराष्ट्रात पहिले पाऊल पडताच ‘वेलकम, राहुल गांधी!’ ही सामान्य जनतेची घोषणा आश्वासक आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी