शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सोलापुरी साखरेच्या पट्ट्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 04:19 IST

पाऊस चांगला झाला म्हणून आम्ही उसाचे उत्पादन जास्त घेतले आणि राज्याला साखर उत्पादनात देशात आघाडीवर नेले. त्यात सोलापूरचा वाटा मोठा आहे.

पाऊस चांगला झाला म्हणून आम्ही उसाचे उत्पादन जास्त घेतले आणि राज्याला साखर उत्पादनात देशात आघाडीवर नेले. त्यात सोलापूरचा वाटा मोठा आहे. उसासाठी ठिबकचा वापर केला तर तिप्पट क्षेत्र ओलिताखाली येईल. सरकारने ठिबक अनुदान देऊन उस उत्पादकांना पाणीबचतीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे.गतवर्षी झालेल्या पुरेशा पावसामुळे यंदा देशाच्या साखरेच्या उत्पादनात चक्क ४५ टक्के वाढ दिसत असून, देशातील साखरेचे उत्पादन सुमारे २९५ लाख टनापर्यंत जाईल, असा अंदाज आहे. यंदा साखर उत्पादनात महाराष्टÑाने उत्तर प्रदेशालाही मागे टाकून देशात अव्वल स्थान मिळवले आहे. तर राज्यात सोलापूर जिल्ह्याने साखर उत्पादनात राज्यात आघाडी घेतली आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात १७ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशातील ५२३ साखर कारखान्यांपैकी सर्वात जास्त १८७ साखर कारखाने महाराष्टÑात चालू होते, तर उत्तर प्रदेशातील केवळ ११९ साखर कारखाने चालू होते. अद्यापही महाराष्टÑातील १५० साखर कारखाने चालूू आहेत. मुबलक उत्पादन झाले तर साखरेचे काय करायचे ही चिंता सरकारबरोबरच साखर उत्पादकांनाही पडणे साहजिक आहे. साखर महागल्याने महागाईविरुद्ध बोलणाऱ्यांना ‘साखर खाल्ली नाही तर मरत नाही’, या एका दिग्गज नेत्याच्या सडेतोड शेरेबाजीची आजही आठवण येते. साखर उत्पादनात वाढ होणार असल्याने साखर अतिरिक्त होणार आणि साखर स्वस्त होणार, असे अंदाज येऊ लागले असले तरी साखर स्वस्त झाली तर शेतकरी आणि उत्पादकांना मोडीत काढल्यासारखे होणार आहे. साखरेचा भाव स्थिर ठेवून उर्वरित साखर निर्यात केल्यास साखरेचे दर उत्पादक आणि उपभोक्ता यांना परवडणार आहेत. देशाची गरज पाहता यंदा आपल्याकडे ३० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. त्यामुळे उर्वरित साखर निर्यात करून साखरेचे दर नियंत्रित ठेवता येणे शक्य आहे. केवळ मुबलक पाऊस झाला, धरणे भरली म्हणून आपण साखर उत्पादनात यंदा अग्रेसर राहू शकलो. पण कधी दुष्काळ आला तर आपण आपली साखर उत्पादनातील मिरासदारी कायम ठेवूू काय? असा प्रश्न स्वत:ला आजच विचारला पाहिजे. धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले तर याच पाण्यात आणखी किती शेती ओलिताखाली येऊ शकते, याचा विचार केला पाहिजे. साखर कारखानदारी ही प्रचंड रोजगार निर्मिती करणारी इंडस्ट्री आहे. आपण किती साखर उत्पादन करू शकतो आणि महाराष्टÑातील किती लोकांना रोजगार देऊ शकतो याचा अंदाज येतो. साखर कारखानदारीचा संबंध थेट शेतकºयांशी येतो. वाढते साखर कारखाने थेट व शेतीपूरक रोजगार निर्मिती करत असले तरी उसासाठी मुबलक पाणी लागते हे विसरून चालत नाही. महाराष्टÑात २०० च्यावर साखर कारखाने आहेत. यंदा मात्र १८७ कारखान्यांनी गाळप सुरू केले. पण उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला तर तिप्पट क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. म्हणजे उसासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला तर उसाच्या क्षेत्रात तिप्पट वाढ होऊ शकते. आणि देशाच्या साखर उत्पादनातील एक मोठे राज्य म्हणून महाराष्टÑाला कायम मान मिळू शकतो. याशिवाय रोजगार निर्मितीमध्येही प्रचंड वाढ होऊ शकते. आजच्या घडीला ठिबक संच वापरून ऊस शेती केली तर मोठ्या अर्थकारणाला वाव आहे. एक तर ठिबकमुळे मजुरांची व मजुरीची बचत होते. शिवाय पाण्यातून द्रव्य खते देता येतात, आणि पाण्याचे योग्य संतुलन होते. खर्चातही बचत होते. शेतीसाठी ठिबक संच देण्याचे सरकारचे धोरण आहे. पण ते ऊस उत्पादकांना प्राधान्याने दिले तर अधिक लाभदायी अणि परिणामकारक होणार आहे. पाणी बचतीला आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.- बाळासाहेब बोचरे