शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आम्ही सोलापुरी साखरेच्या पट्ट्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 04:19 IST

पाऊस चांगला झाला म्हणून आम्ही उसाचे उत्पादन जास्त घेतले आणि राज्याला साखर उत्पादनात देशात आघाडीवर नेले. त्यात सोलापूरचा वाटा मोठा आहे.

पाऊस चांगला झाला म्हणून आम्ही उसाचे उत्पादन जास्त घेतले आणि राज्याला साखर उत्पादनात देशात आघाडीवर नेले. त्यात सोलापूरचा वाटा मोठा आहे. उसासाठी ठिबकचा वापर केला तर तिप्पट क्षेत्र ओलिताखाली येईल. सरकारने ठिबक अनुदान देऊन उस उत्पादकांना पाणीबचतीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे.गतवर्षी झालेल्या पुरेशा पावसामुळे यंदा देशाच्या साखरेच्या उत्पादनात चक्क ४५ टक्के वाढ दिसत असून, देशातील साखरेचे उत्पादन सुमारे २९५ लाख टनापर्यंत जाईल, असा अंदाज आहे. यंदा साखर उत्पादनात महाराष्टÑाने उत्तर प्रदेशालाही मागे टाकून देशात अव्वल स्थान मिळवले आहे. तर राज्यात सोलापूर जिल्ह्याने साखर उत्पादनात राज्यात आघाडी घेतली आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात १७ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशातील ५२३ साखर कारखान्यांपैकी सर्वात जास्त १८७ साखर कारखाने महाराष्टÑात चालू होते, तर उत्तर प्रदेशातील केवळ ११९ साखर कारखाने चालू होते. अद्यापही महाराष्टÑातील १५० साखर कारखाने चालूू आहेत. मुबलक उत्पादन झाले तर साखरेचे काय करायचे ही चिंता सरकारबरोबरच साखर उत्पादकांनाही पडणे साहजिक आहे. साखर महागल्याने महागाईविरुद्ध बोलणाऱ्यांना ‘साखर खाल्ली नाही तर मरत नाही’, या एका दिग्गज नेत्याच्या सडेतोड शेरेबाजीची आजही आठवण येते. साखर उत्पादनात वाढ होणार असल्याने साखर अतिरिक्त होणार आणि साखर स्वस्त होणार, असे अंदाज येऊ लागले असले तरी साखर स्वस्त झाली तर शेतकरी आणि उत्पादकांना मोडीत काढल्यासारखे होणार आहे. साखरेचा भाव स्थिर ठेवून उर्वरित साखर निर्यात केल्यास साखरेचे दर उत्पादक आणि उपभोक्ता यांना परवडणार आहेत. देशाची गरज पाहता यंदा आपल्याकडे ३० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. त्यामुळे उर्वरित साखर निर्यात करून साखरेचे दर नियंत्रित ठेवता येणे शक्य आहे. केवळ मुबलक पाऊस झाला, धरणे भरली म्हणून आपण साखर उत्पादनात यंदा अग्रेसर राहू शकलो. पण कधी दुष्काळ आला तर आपण आपली साखर उत्पादनातील मिरासदारी कायम ठेवूू काय? असा प्रश्न स्वत:ला आजच विचारला पाहिजे. धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले तर याच पाण्यात आणखी किती शेती ओलिताखाली येऊ शकते, याचा विचार केला पाहिजे. साखर कारखानदारी ही प्रचंड रोजगार निर्मिती करणारी इंडस्ट्री आहे. आपण किती साखर उत्पादन करू शकतो आणि महाराष्टÑातील किती लोकांना रोजगार देऊ शकतो याचा अंदाज येतो. साखर कारखानदारीचा संबंध थेट शेतकºयांशी येतो. वाढते साखर कारखाने थेट व शेतीपूरक रोजगार निर्मिती करत असले तरी उसासाठी मुबलक पाणी लागते हे विसरून चालत नाही. महाराष्टÑात २०० च्यावर साखर कारखाने आहेत. यंदा मात्र १८७ कारखान्यांनी गाळप सुरू केले. पण उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला तर तिप्पट क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. म्हणजे उसासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला तर उसाच्या क्षेत्रात तिप्पट वाढ होऊ शकते. आणि देशाच्या साखर उत्पादनातील एक मोठे राज्य म्हणून महाराष्टÑाला कायम मान मिळू शकतो. याशिवाय रोजगार निर्मितीमध्येही प्रचंड वाढ होऊ शकते. आजच्या घडीला ठिबक संच वापरून ऊस शेती केली तर मोठ्या अर्थकारणाला वाव आहे. एक तर ठिबकमुळे मजुरांची व मजुरीची बचत होते. शिवाय पाण्यातून द्रव्य खते देता येतात, आणि पाण्याचे योग्य संतुलन होते. खर्चातही बचत होते. शेतीसाठी ठिबक संच देण्याचे सरकारचे धोरण आहे. पण ते ऊस उत्पादकांना प्राधान्याने दिले तर अधिक लाभदायी अणि परिणामकारक होणार आहे. पाणी बचतीला आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.- बाळासाहेब बोचरे