शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
3
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
4
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
5
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
8
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
9
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
10
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
11
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
12
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
13
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
14
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
15
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
16
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
17
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
18
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
19
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
20
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या भूमिकेमागे लोकमत हवे

By admin | Updated: July 26, 2016 02:25 IST

काश्मीरातील जनतेशी भावनिक नाते निर्माण करण्याबाबतच्या केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या इराद्यावर दुमत होण्याचे कारण नाही. प्रश्न ते कसे निर्माण करणार हा आहे.

काश्मीरातील जनतेशी भावनिक नाते निर्माण करण्याबाबतच्या केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या इराद्यावर दुमत होण्याचे कारण नाही. प्रश्न ते कसे निर्माण करणार हा आहे. तो बंदुकीच्या गोळ्यांच्या माध्यमातून होऊ शकत नाही हे उशिराने का होईना ओळखून सुरक्षा दलांनी बंदुकीचा वापर न करण्याच्या त्यांनी दिलेल्या आदेशाचेही स्वागतच होईल. पण ही विधाने करण्यापूर्वी काश्मीरातील हिंसाचारास पाकिस्तान आणि त्याचे घुसखोर हस्तक जबाबदार आहेत हा स्वत:चे दुबळेपण उघड करणारा पवित्रा सरकारने घेतला होता हेही नजरेआड करता येत नाही. पाकिस्तानची काश्मीरवर असलेली नजर साऱ्या जगाला ठाऊक आहे. आपले घुसखोर आणि त्यांच्या वेशातील सैनिक त्या प्रदेशात पाठविणे आणि त्यात अशांतता माजविणे हा त्या देशाचा उद्योगही साठ वर्षांएवढा जुना आहे. या घुसखोरांना सीमेवर अडविणे, त्यांना मारणे, ते करताना आपल्या सैनिकांना शहिदी मरण येणे आणि एक चकमक संपल्यानंतर काही काळातच तेथे दुसरी सुरू होणे हा प्रकारही आता नित्याचा झाला आहे. भारताने बचावाचा पवित्रा टाकून आक्रमक बनावे आणि आपले सैन्य किमान पाकिस्तानव्याप्त काश्मीरात घुसवून तेथील घुसखोरांचे अड्डे नाहीसे करावे असे वीरश्रीयुक्त आवाहन सरकारला करणारे भोळसट देशभक्त भारतातही आता बरेच झाले आहेत. पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याची जराही जाणीव नसणाऱ्या अशा माणसांची दखल सरकार घेत नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. भारताच्या शस्त्रागारात ११० तर पाकिस्तानच्या शस्त्रागारात ३७६ अणुबॉम्ब आहेत. भारताचा आजवरचा सारा भर लोककल्याणावर तर पाकिस्तानचा त्याचे लष्करी सामर्थ्य वाढविण्यावर राहिला आहे. शिवाय त्याच्या शेजारचा शक्तिशाली चीन हा त्याचा मित्र आहे आणि भारताचा एकही शेजारी त्याचा मित्र नाही. असलाच तर तो सामर्थ्यवान नाही. ‘पाच मिनिटांच्या आत दिल्लीची राखरांगोळी करू’ ही पाकच्या लष्करी अधिकाऱ्याची भाषा कवितेतली नाही, वास्तवातली आहे. त्यामुळे येथे आक्रमकतेचा उपदेश वा कांगावा करणाऱ्यांनाच जास्तीचे शहाणे होण्याची गरज आहे. भारतापुढचा खरा प्रश्न काश्मीरातील ७२ लक्ष नागरिकांना आपलेसे करून घेण्याचा आहे. हा वर्ग भारताविरुद्ध दर महिन्यात उठून उभा होत असलेला आणि भारताच्या पोलिसांशी व सुरक्षा व्यवस्थेशी लढत देतानाच एवढ्यात दिसला आहे. काश्मीरात निवडणुका होतात, विविध पक्षांची सरकारे तेथे सत्तेवर येतात. ती बहुदा सगळीच कमालीची दुबळी आणि भ्रष्ट असतात हाही इतिहास आहे. पूर्वीची काँग्रेसानुकूल सरकारे जाऊन आता तिथे भाजपा व पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीचे मेहबूबा मुफ्ती सरकार सत्तेवर आले आहे. केंद्रात मोदींचे भाजपा सरकार आहे. मात्र जे पूर्वीच्या सरकारांना जमले नाही ते याही सरकारला जमत नसल्याचे जगाला दिसत आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर राजकारणाहून अन्यत्र शोधण्याची गरज आहे. सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्ष राजकारण ही काश्मीरातील आताच्या अशांततेवरची खरी उत्तरे आहेत. मात्र या उत्तरांची नुसतीच राजकीय ओढाताण करणारे राजकारण देशात आहे. काश्मीरच्या जनतेला जास्तीची स्वायत्तता हवी आहे तर केंद्रातील भाजपा सरकारला ३७० वे कलम लादून तिथे असलेली स्वायत्तता नाहीशी करायची आहे. ते करण्याच्या कामी संघातून भाजपात गेलेले त्या पक्षाचे राममाधव नावाचे नको तेव्हा नको ते बोलणारे पुढारी लागले आहेत. काँग्रेसला धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने हा प्रश्न निकालात निघेल असे वाटते. मात्र तशी धर्मनिरपेक्षता त्या पक्षालाही, नेहरूंच्या काळाचा अपवाद वगळला तर काश्मीरबाबत कधी दाखविता आलेली नाही. सरकार आणि लोक तसेच नेते आणि अनुयायी यांच्यातले सामंजस्य व ऐक्य हेच राज्य यंत्रणेचा खरा आधार असते. त्यांच्यात विसंवाद असेल तर कोणतेही सरकार स्थिर होत नाही आणि जनताही कधी शांत राहात नाही. एकेकाळी असा लोकविरोध मणीपूर या राज्यात होता. तो शमवायला इंदिरा गांधींनी मणीपुरातली लाल डेंगा या बंडखोर पुढाऱ्यालाच हाताशी धरले व त्याच्या हाती त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवून त्याच्यावर तेथील शांततेची जबाबदारी टाकली. इंदिरा गांधींनी मणिपुरात चोखाळलेला हा मार्ग कधी तरी काश्मीरातही अवलंबावा असा आहे. दुर्दैव हे की तेथील जनतेतही सर्वमान्य होणारे नेतृत्व आज नाही. शेख अब्दुल्लांचा अपवाद वगळता त्या संबंध राज्याचे नेतृत्व व प्रवक्तेपण करणारा दुसरा नेता तेथे झाला नाही. नेतृत्व नसते तेव्हा लोक असतात आणि विकासाच्या मार्गाने त्यांना आपलेसे करून घेता येणे शक्य होते. केंद्र व काश्मीरचे सरकार यांच्यासमोर आज तोच एकमेव मोकळा मार्ग आहे. ते तो चोखाळत नाहीत आणि लोक आपल्या बाजूने आणणे त्यांना जमत नाही. पोलिसांवर आणि लष्कराच्या पथकांवर दगडफेक करणारे काश्मीरातील शेकडो स्त्रीपुरुष ही भारतासमोरची व काश्मीरातली सर्वात मोठी समस्या आहे. काश्मीर भारताचे आहे हे सांगण्यासाठी सारा इतिहास व कायदे पुढे करता येतील. मात्र ‘तुमचे लोकच तुमच्याशी का लढतात’ या प्रश्नाचे उत्तर दिल्याखेरीज आपले म्हणणे कोणी खरेही मानणार नाही.