शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
5
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
6
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
7
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
9
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
10
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
11
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
12
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
13
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
14
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
15
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
17
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
19
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
20
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

त्यासाठी संघालाच बदलावे लागेल

By admin | Updated: February 17, 2015 23:17 IST

भारतात हिंदूंची संख्या ८८ टक्क्यांएवढी असून, त्या साऱ्यांना संघटित करणे हे संघाचे ध्येय असल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे

भारतात हिंदूंची संख्या ८८ टक्क्यांएवढी असून, त्या साऱ्यांना संघटित करणे हे संघाचे ध्येय असल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. खरे तर गेली नऊ दशके संघाने एवढेच एक काम केले आहे आणि तरीही त्या समाजाला संघटित करण्यात त्याच्या पदरी अपयश आले आहे. हा समाज नुसता जातीपंथातच विभागला नाही तर राजकीय पक्षात व विचारसरणीतही त्याचे विभाजन झाले आहे. काँग्रेस, भाजपा, कम्युनिस्ट, समाजवादी, बहुजन समाजवादी इथपासून तर थेट लहानसहान स्थानिक पक्षांत तो विभागला गेला आहे. १९६७पर्यंत या साऱ्यांत काँग्रेस पक्षाला असलेला हिंदूंचा पाठिंबा सर्वाधिक मोठा होता. संघाची स्थापना १९२५ची असली तरी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला जनतेचा मोठा वर्ग काँग्रेसच्या म्हणजे म. गांधींच्या मागे होता. १९६७पर्यंत संघाला व हिंदुत्वाला मानणाऱ्या पक्षाला देशात कधी साडेसहा टक्क्यांवर मते मिळाली नाहीत. नरहर कुरुंदकरांसारखा ज्येष्ठ विचारवंत काँग्रेस हीच देशातली हिंदूंची सर्वात मोठी संघटना आहे असे म्हणायचा. वर तुम्ही तसे समजणार नसाल तर बहुजन समाजाला तुम्ही हिंदू मानत नाही असे म्हणावे लागेल असेही बजावायचा. ज्या डॉ. लोहियांचे वचन भागवतांनी आपल्या भाषणात उद्घृत केले ते लोहिया संघाला ‘हिंदू विरोधी, पाकिस्तान समर्थक व फॅसिस्ट’ संघटना म्हणायचे. शिवाय माणसे काँग्रेस वा कम्युनिस्ट पक्षात असली की हिंदू राहत नाहीत आणि संघात आली म्हणजेच ती हिंदू होतात असाही हा प्रश्न नाही. नाहीतर परवापर्यंत काँग्रेसमध्ये असलेले सगळे ‘अहिंदू’ २०१४च्या निवडणुकीत भाजपात आले म्हणूनच हिंदू झाले असेच म्हणावे लागेल. हिंदूंचे संघटन अशक्य नाही. २०१४च्या निवडणुकीत भाजपाला ३० टक्के मते मिळाली तेव्हा त्याच्या शक्यताही उघड झाल्या. या स्थितीत सगळ्या हिंदूंचे संघटन करण्याचे आपले स्वप्न संघाला पूर्ण करायचे असेल तर त्याने स्वत:ला केवळ सामाजिक व सांस्कृतिक संघटनच राखले पाहिजे. आम्ही राजकारणात राहू, भाजपाच्या वतीने निवडणुकीत भाग घेऊ, इतर पक्षांवर (तेही हिंदू असताना) टीका करू आणि हिंदूंचे राष्ट्रीय संघटन करू असे ते म्हणत असतील तर त्यातील दुबळेपणाच नव्हे तर खोटेपणाही उघड आहे. हिंदुत्वाची सर्टिफिकिटे देण्याचा अधिकार संघाला कुणी दिला नाही. ममता बॅनर्जी संघाला मानत नाहीत आणि करुणानिधीही त्याला जुमानत नाहीत. म्हणून ते हिंदू नाहीत असे संघ म्हणणार आहे काय? आणि ‘ईश्वर-अल्ला’ अशी आळवणी करून साऱ्या देशवासीयांना कवेत घेऊ पाहणाऱ्या म. गांधींचे हिंदुत्व ते नाकारणार आहेत काय? लोकशाहीत निवडणुका होतात. त्यात पक्षोपक्ष आपापल्या सामर्थ्यानुसार जागा लढवितात. एखादा पक्ष सत्तेत येतो बाकीचे विरोधात बसतात. परवाच्या निवडणुकीत भाजपाच्या मोदींचे संघाला मानणारे सरकार सत्तेवर आले म्हणून ते हिंदूंचे झाले आणि विरोधी बाकावर बसणारे सगळे अहिंदू झाले असे होत नाही. इंग्लंडमध्ये सरकार पक्षातले जसे सगळे प्रोटेस्टंट असतात तर विरोधी बाकावरचेही सारे प्रोटेस्टंटच असतात. बराक ओबामा ख्रिश्चन असतात आणि त्यांचे विरोधकही त्याच धर्माचे असतात. पक्ष आणि धर्म किंवा राजकारण आणि धर्म यांच्यातला संबंध फक्त मागे राहिलेल्या देशातच गृहीत धरला जातो व तो निवडणुकांत वापरला जातो. हिंदू धर्मात जात अजून मजबूत राहिली आहे. त्यातल्या एकेका जातीचे पक्ष देशात आहेत. विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग आणल्यापासून अशा पक्षांची संख्या वाढलीही आहे. त्यांची अवस्था ही की पक्ष टिकवायचा तर त्यांना जात टिकवावी लागते आणि जात टिकवायची तर राष्ट्रीयता सोडावी लागते. (आपल्या शरद पवारांच्या राजकारणाचे जे भजे झालेले आपण पाहतो त्याचेही महत्त्वाचे कारण हेच आहे) जात धरून राष्ट्रीय होता येत नाही तसे धर्म धरून राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय होता येत नाही. भारताने सेक्युलॅरिझमचे तत्त्व स्वीकारण्यामागे त्याचे सर्वसमावेशक स्वरूप कायम राखणे हाही एक हेतू त्याचमुळे राहिला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही वैदिकांची प्रार्थना आहे. तिथपर्यंत पोहोचायचे तर संघाला भाजपाशीच नव्हे तर सगळ्या राजकारणाशी आपले संबंध तोडावे लागणार आहेत आणि त्याही पुढे जाऊन कोणत्याही पक्षाचे राजकारण न करण्याची व केवळ सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिका घेण्याची तयारी करावी लागेल. एकारलेल्या संघटनांभोवती कुंपणे असतात. त्यातली माणसे मग बाहेर जात नाहीत आणि बाहेरची माणसेही त्यात येत नाहीत. भाजपाचे दार खुले असल्याने व त्याने आपल्या सभासदत्वाची दुकाने गल्लोगल्ली उघडल्याने त्यात जास्तीची माणसे आली. तसे संघाचे झाले नाही. त्याच्या शाखा बेटांसारख्या मुख्य समाजापासून दूर राहिल्या. झालेच तर त्यातील अनेकींना वृद्धाश्रमांचीही कळा आली. नवी माणसे येत नाहीत, दुसरे विचार चालत नाहीत, आम्ही सांगू तेच खरे आणि इतरांचे सारे तुच्छ अशी मानसिकता एकांगीपण वाढविते व ती संघटनेत बहुविधता येऊ देत नाही. भारत मात्र भाषाबहुल, धर्मबहुल, संस्कृतीबहुल आणि पक्षबहुल लोकांचा देश आहे. तरीही भागवतांना शुभेच्छा. त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे मात्र त्यासाठी त्यांना त्यांची संघटना राजकारणापासून अलिप्त राखण्याचे बळ प्राप्त व्हावे.