शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही संसद जाळली; पण स्वाभिमान नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 07:44 IST

मुद्द्याची गोष्ट : 'जे बांगलादेश, श्रीलंकेत घडले ते आपल्याकडे का घडू शकत नाही?' हा सवाल जेव्हा व्हायरल झाला तेव्हा 'जेन झी'च्या मनात धुमसणाऱ्या संतापात आक्रमकतेचे तेल ओतले गेले. नेतृत्वहीन आंदोलनाचा भडका उडण्याला अनेक कंगोरे आहेत. जगभर जळलेल्या नेपाळची कहाणी ठळक होत असली तरी धुरात 'जेन झी'च्या स्वाभिमानाची, अस्वस्थतेची कथा अस्पष्टच राहिल्याचे जाणवते...

डॉ. अली जफर स्त्री रोग तज्ज्ञ, नेपाळ

आम्ही संसद जाळली; पण स्वाभिमान नाही

मनी मंत्रा

गरिबीच्या छायेत असण्यापेक्षा ही छाया भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अधिक गडद करण्याच्या राजकीय कृतीचा अधिक संताप तरुण पिढीत दिसून येतो. अनेक वर्षापासून मनातील संतापाची दाबलेली स्प्रिंग अचानक उसळण्याला अनेक गोष्टी, निर्णय कारणीभूत ठरले. केवळ संसद, राष्ट्रपती भवन, मंत्र्यांची निवासस्थाने जाळण्यापर्यंत हा संताप मर्यादित राहिला नाही. 'भाट भटनी ' सारखी मोठा रोजगार देणारी सुपर बझारची साखळी असो वा नेपाळमधील सर्वात उंच 'हिल्टन' हॉटेल असो, यांनाही त्याची झळ पोहोचली. 'जेन झी'ने जाळपोळीची जबाबदारी घेताना काही गोष्टींवर प्रकाशझोतही टाकला. माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर त्यांच्या घरात मोठी रोकड सापडली. नेपाळच्या तरुणांनी भ्रष्टाचाराचा पैसा म्हणून तो चक्क जाळला. 'हामीले संसद जलायौं, आफ्नो स्वाभिमान जलाएका छैनौं।', म्हणजेच आम्ही संसद जाळली; पण स्वाभिमान नाही, अशा शब्दांत 'जेन झी'ने संदेश दिला. 'भाट भटनी 'तील बझारमधून काढलेले सामान परत देण्याची कृती त्यांच्या निश्चयाचे प्रमाण देते.

सोशल मीडियावरील बंदीच्या रागाचा गवगवा झाला; पण त्यामागच्या भावनांची कहाणीही दडपली गेली. नेपाळमधील जनता ही तटस्थ व स्वतंत्र विचाराच्या लोकांना पसंत करते. सरकारला थेट सवाल करणाऱ्या माध्यमांना, सडेतोड, परखड व वास्तव मांडणाऱ्या नेत्यांना हिरो केले जाते. रॅपर व काठमांडूचे महापौर बालेन हे त्यापैकी एक. पूर्वाश्रमीचे पत्रकार असलेले रबी लामिछाने हे व्यवसाय सोडून राजकारणात आल्यानंतर पाच वर्षातच त्यांनी सत्तेपर्यंत मजल मारली. यामागेही नेपाळच्या सामान्य माणसांचा स्वभाव दिसून येतो. समाजमाध्यमांवरून सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे यावर सवाल उठू लागल्यानंतर समाजमाध्यमांवर सरकारने निर्बंध लादले. समाजमाध्यमे चालविणाऱ्या कंपन्यांना नोंदणीची अट घातली गेली. 'मेटा'ने नोंदणीचा प्रस्ताव फेटाळला. याच समाजमाध्यमांवर पुन्हा यामागचे राजकारण व्हायरल होत होते. अखेर सरकारने 'मेटा'च्या सर्व प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. मात्र, चीनच्या 'टिकटॉक'वर बंदी घातली नाही. ओली यांचे यामागचे चायनाप्रेम याच 'टीकटॉक' वरून व्हायरल करण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा मुद्दा असताना दुसरा परिणामही महत्त्वाचा आहे.

(शब्दांकन : अविनाश कोळी)

'नेपो किड्स' या हॅशटॅगने उद्रेक

नेपाळमध्ये २००८ नंतर गणराज्य लोकशाही अस्तित्वात आल्यापासून सातत्याने कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ म्हणजेच सीपीएन (माओ), सीपीएन (यूएमएल), नेपाळी काँग्रेस यांची आलटून-पालटून सत्ता येत राहिली. याच काळात तटस्थ विचारांच्या नेत्यांचा उदय झाला. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविषयीची चीड 'नेपो किड्स' या हॅशटॅगमुळे अधिक झाली. सत्ताधारी मंत्र्यांची मुले आलिशान आयुष्य जगत असताना नेपाळच्या सामान्य मुलांची काय अवस्था आहे, हे दाखविणारी छायाचित्रे या हॅशटॅगच्या माध्यमातून व्हायरल झाली.

१५%

नेपाळमधील लोक परदेशात रोजगारासाठी स्थलांतरित

- २७%

नेपाळच्या एकूण 'जीडीपी मध्ये परदेशातून आलेल्या पैशांचा वाटा

रोजगारासाठी परदेशात गेलेल्या तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीही सोशल मीडिया हे संवाद व संपर्काचे महत्त्वाचे साधन होते. ते बंद झाल्याने त्यांच्याही संतापाची भर पडली.

'त्या' दिवशी नेपाळमध्ये नेमके काय घडले?

रीतसर परवानगी काढून मण्डला मैतीघर येथे ८ सप्टेंबरला जमलेला 'जेन झी'चा जमाव सिंह दरबारकडे आला. नेतृत्वहीन आंदोलनावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. सरकारला धोका वाटल्याने त्यांनी गोळीबार केला. त्यात निष्पाप विद्यार्थी मारले गेले. पायाला किंवा हाताला गोळी मारून आंदोलन पांगवता आले असते. मात्र, आंदोलनाला रोखण्यासाठी जहाल प्रतिबंध अंगीकारण्याचा हा निर्णय दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मोठ्या हिंसाचाराला जन्म देणारा ठरला. गोळीबार झाला नसता तर कदाचित हे आंदोलन इतके उग्र झाले नसते, असे येथील सामान्य जनतेला व स्वतंत्र विचारवादी संघटनांना वाटते. जगभर हा हिंसाचार चर्चेत आला.

संसद जाळली गेल्यानंतर त्याची जबाबदारी 'जेन झी'ने घेतली. नेपाळमधील संचारबंदीचा फटका सामान्य लोकांना बसला. खाण्या-पिण्याचे साहित्य मिळत नसल्याच्या अडचणीपासून रोजगाराचा प्रश्नही उभा ठाकला. हे वातावरण लवकरच निवळेल, अशी आशा आहे. 'जेन झी'ला अस्वस्थ करणारे प्रश्न, निर्णय यावर काम करण्याची मोठी जबाबदारी नव्या पंतप्रधानांवर असेल. अस्थिरतेच्या निखाऱ्यावर नेपाळ जळत असला तरी तरुणाईच्या आशावादाची किरणेही येथे सकारात्मक प्रकाश पाडत आहेत.

टॅग्स :Nepalनेपाळ