शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जल टंचाईच्या भेसूर सावल्या!

By रवी ताले | Updated: November 28, 2017 00:43 IST

डिसेंबर उजाडण्यापूर्वीच, विदर्भाच्या अनेक भागांमध्ये, विशेषत: पश्चिम विदर्भात, जल टंचाईच्या भेसूर सावल्या गडद होऊ लागल्या आहेत. अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमधील पूर्णा नदीच्या खो-यातील खारपाणपट्ट्यात तर परिस्थितीने सध्याच गंभीर स्वरूप धारण केले आहे.

डिसेंबर उजाडण्यापूर्वीच, विदर्भाच्या अनेक भागांमध्ये, विशेषत: पश्चिम विदर्भात, जल टंचाईच्या भेसूर सावल्या गडद होऊ लागल्या आहेत. अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमधील पूर्णा नदीच्या खो-यातील खारपाणपट्ट्यात तर परिस्थितीने सध्याच गंभीर स्वरूप धारण केले आहे. पुढील पावसाळ्यात चांगला पाऊस होऊन जलसाठे भरेपर्यंतचा २०० दिवसांपेक्षाही मोठा कालखंड कसा काढायचा आणि पावसाने पुन्हा एकदा चाट दिल्यास पुढे काय, या विचाराने अंगावर सरसरून काटा उभा राहतो.ही परिस्थिती काही एकाच वर्षात निर्माण झालेली नाही. गत दीड-दोन शतकात मानवजातीने विकासाच्या नावाखाली निसर्गाची प्रचंड अवहेलना केली. जागतिक तापमानवाढ, हवामानातील बदल, बिघडलेले पर्जन्यचक्र हे त्याचे दृश्य परिणाम आहेत. हे आपल्या आवाक्याबाहेरील घटक जसे जल टंचाईसाठी कारणीभूत आहेत, तसाच आपला हव्यासदेखील त्यास जबाबदार आहे. भूगर्भातील जलसाठे हे निसर्गाचे लाखो वर्षांचे संचित आहे. ते उपसण्याचे तंत्रज्ञान काय गवसले, एका शतकापेक्षाही कमी कालखंडात आम्ही भूगर्भातील जलसाठे संपवित आणले. परिणामी, आज एक हजार फूट खोलवर कूपनलिका खोदूनही पुरेसे पाणी मिळत नाही.भारतात जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १६ टक्के लोक राहतात आणि जगातील उपयुक्त जलसाठ्यापैकी अवघा चार टक्के साठा भारतात आहे. दरवर्षी लोकसंख्येत भर पडत चालली आहे आणि पर्जन्यमान रोडावत चालले आहे. त्यामुळे भविष्यात परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाईल. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने काही वर्षांपूर्वी देशातील इतर काही शास्त्रीय संशोधन संस्थांच्या साथीने देशाचा वाळवंटीकरण स्थितीदर्शक नकाशा तयार केला होता. त्या अभ्यासानुसार, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी एकचतुर्थांश जमिनीच्या वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोबतच लागवडीखालील जमिनीपैकी सुमारे ३० टक्के जमिनीचा पोत सातत्याने घसरत आहे. ज्या चार राज्यांमध्ये या प्रक्रियांचा वेग सर्वाधिक आहे, त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रही आहे. हे वास्तव अत्यंत भयावह आहे.दुष्काळ या शब्दाशी अपरिहार्यरीत्या जोडून येणारा शब्द म्हणजे नैसर्गिक आपत्ती! आज ज्या स्थितीचा विदर्भाला सामना करावा लागत आहे, ती मात्र केवळ नैसर्गिक आपत्ती नाही. ती प्रामुख्याने मानवनिर्मित आपत्ती आहे. जलस्रोतांच्या बळकटीकरणाकडे आम्ही वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले आणि उपसा मात्र प्रचंड वेगाने करीत गेलो. जेवढे घेतले, किमान तेवढे तरी परत करायला हवे, ही जाणीवच नाही! त्याचा परिपाक म्हणजे, अपुºया पर्जन्यमानामुळे भूतलावरील जलसाठे कोरडे पडले असतानाच, भूगर्भातील जलसाठेही प्रचंड रोडावले आहेत.वास्तविक महाराष्ट्रातील ३५५ तालुक्यांपैकी फार थोड्या तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमान ४०० मिलीमीटरपेक्षा कमी आहे. एवढा पाऊस आपल्या पाण्याच्या सर्व गरजा भागविण्यासाठी पुरेसा आहे. गरज आहे, ती संवर्धन व योग्य विनियोगाची! दुर्दैवाने त्यासंदर्भातील जागृतीचा धोरणकर्त्यांच्याच पातळीवर अभाव आहे, तर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा करावी?-रवी टाले 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र