शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

घड्याळाचा गजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 17:05 IST

जनाधार असलेल्या नेतृत्वाचे खच्चीकरण आणि हुजरेगिरी करणाऱ्यांना पदांची खैरात असे जर होत असेल तर पक्ष रुजणार, वाढणार कसा, हा प्रश्न आहे. रावेरच्या निमित्ताने धोक्याची घंटा वाजली आहे.

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑाच्या राजकारणावर गेल्या ५० वर्षांपासून हुकूमत गाजविणाऱ्या शरद पवार यांना जळगाव जिल्ह्याविषयीचा त्यांचा अंदाज दोनदा चुकल्याची नोंद इतिहासात झाली आहे. प्रचंड अभ्यास, दांडगा जनसंपर्क, अचूक निरीक्षणशक्ती, राजकीय परिस्थितीचे नेमके भान हे पवार यांचे गुण आहेत. त्यांच्या तोडीचा नेता महाराष्टÑात विरळा म्हणावा लागेल. कधीकाळी राजकीय गुरु म्हणून पवारांचा उल्लेख करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्टÑात वर्धा आणि गोंदियात सभा घेताना पवारांना लक्ष्य करावे लागले, यावरुन त्यांचे राजकारणातील महत्त्व अधोरेखित होते.राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर १९९९ मध्ये त्याकाळातील जळगाव लोकसभा मतदारसंघात पवार यांनी जे.टी.महाजन यांना उमेदवारी दिली होती. २००४ मध्ये काँग्रेस पक्षासोबत आघाडी झाल्याने ही जागा काँग्रेसकडे गेली. २००७ मध्ये आघाडीत जागावाटपाविषयी नवा फॉर्म्युला तयार झाला. ज्या जागेवर सलग दोनदा पराभव झाला असेल तर त्या पक्षाने दावा सोडावा आणि दुसºया पक्षाला ती जागा द्यावी, यानुसार २००७ ते २०१४ पर्यंत म्हणजे तीन पंचवार्षिक निवडणुका राष्टÑवादीने ही जागा लढवली. यश एकदाही मिळाले नाही. डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड.रवींद्र पाटील, मनीष जैन यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, भाजपाचा बालेकिल्ला अभेद्य राहिला.यंदा तर पक्षाच्या उमेदवारीचा घोळ संपता संपेना. पवारांनी वेगवेगळी नावे चर्चेत आणून जनमताचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, परंतु, तो फारसा यशस्वी ठरला नाही. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे नाव असेच गुगली म्हणून पुढे आले. विधानसभेचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांची नावे चर्चेत होती. परंतु, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि या मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या स्रुषा रक्षा खडसे यांच्यापुढे टिकाव लागू शकेल, असा उमेदवार पक्षाला शोधूनही सापडत नव्हता. काँग्रेसकडे डॉ.उल्हास पाटील यांच्या रुपाने उमेदवार होता. त्यांनाही पाचोरा दौºयात पवार यांनी राष्टÑवादीत येण्याची आॅफर देऊन पाहिली. परवा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिले. पण डॉ.पाटील त्यांना बधले नाही. राष्टÑवादीपुढे पेच निर्माण झाला होता. नगरच्या जागेविषयी प्रचंड आग्रही असणाºया राष्टÑवादीने आढेवेढे घेत अखेर रावेरची जागा ऐनवेळी सोडली. याला दोन कारणे आहेत. जळगाव मतदारसंघात उमेदवार निश्चित झाला होता, रावेरमध्ये मात्र ठरत नव्हता. पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही, असा संदेश त्यातून जाऊ शकतो हे कारण एक आणि दुसरे म्हणजे, भाजपमधील असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांना पवार आणि राष्टÑवादी सहकार्य करीत असल्याचा समज पसरत होता. दोन्ही कारणे ही पक्षाची प्रतिमा आणि विश्वासाला धक्का पोहोचविणारी असल्याने राष्टÑवादीने अखेर हा निर्णय घेतला.उमेदवाराअभावी मतदारसंघ मित्रपक्षाला सोडण्याची वेळ राष्टÑवादीवर आली, असाच एक योगायोग पवार यांच्याविषयी जळगावात झालेला आहे. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निकटवर्तीय मुंबईकर अरुण मेहता यांना उमेदवारी देण्यात आली. स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरील उमेदवार दिल्याने स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. परंतु, पवारांना विरोध कोण करणार? सुरेशदादा जैन यांनी पुढाकार घेतला आणि अ‍ॅड.शरद वाणी यांना उमेदवारी देण्यात आली. मेहता यांना सूचक व अनुमोदक देखील न मिळाल्याने आल्या पावली ते परत गेले.स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेणे, बळ न देणे याचे परिणाम आता राष्टÑवादी काँग्रेस पक्षाला २० वर्षानंतर जाणवू लागले आहेत. माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी परवा महाआघाडीच्या मेळाव्यात धोक्याची घंटा वाजवली आहेच. दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन ही निवडणूक जिंकली नाही, तर पुढे उमेदवार सुध्दा भेटणार नाही, ही भीती त्यांनी व्यक्त केली. हे का घडले, याचा शोध आणि बोध राष्टÑवादी नेतृत्वाने घ्यायला हवा. जनाधार असलेल्या नेतृत्वाचे खच्चीकरण आणि हुजरेगिरी करणाऱ्यांना पदांची खैरात असे जर होत असेल तर पक्ष रुजणार, वाढणार कसा, हा प्रश्न आहे. रावेरच्या निमित्ताने धोक्याची घंटा वाजली आहे. घड्याळातील गजर किती जणांना ऐकू येतो, किती जण ऐकून त्यावर कार्यवाही करतात, किती कानाडोळा करतात, त्यावर पक्षाची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे. 

 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव