शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

घड्याळाचा गजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 17:05 IST

जनाधार असलेल्या नेतृत्वाचे खच्चीकरण आणि हुजरेगिरी करणाऱ्यांना पदांची खैरात असे जर होत असेल तर पक्ष रुजणार, वाढणार कसा, हा प्रश्न आहे. रावेरच्या निमित्ताने धोक्याची घंटा वाजली आहे.

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑाच्या राजकारणावर गेल्या ५० वर्षांपासून हुकूमत गाजविणाऱ्या शरद पवार यांना जळगाव जिल्ह्याविषयीचा त्यांचा अंदाज दोनदा चुकल्याची नोंद इतिहासात झाली आहे. प्रचंड अभ्यास, दांडगा जनसंपर्क, अचूक निरीक्षणशक्ती, राजकीय परिस्थितीचे नेमके भान हे पवार यांचे गुण आहेत. त्यांच्या तोडीचा नेता महाराष्टÑात विरळा म्हणावा लागेल. कधीकाळी राजकीय गुरु म्हणून पवारांचा उल्लेख करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्टÑात वर्धा आणि गोंदियात सभा घेताना पवारांना लक्ष्य करावे लागले, यावरुन त्यांचे राजकारणातील महत्त्व अधोरेखित होते.राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर १९९९ मध्ये त्याकाळातील जळगाव लोकसभा मतदारसंघात पवार यांनी जे.टी.महाजन यांना उमेदवारी दिली होती. २००४ मध्ये काँग्रेस पक्षासोबत आघाडी झाल्याने ही जागा काँग्रेसकडे गेली. २००७ मध्ये आघाडीत जागावाटपाविषयी नवा फॉर्म्युला तयार झाला. ज्या जागेवर सलग दोनदा पराभव झाला असेल तर त्या पक्षाने दावा सोडावा आणि दुसºया पक्षाला ती जागा द्यावी, यानुसार २००७ ते २०१४ पर्यंत म्हणजे तीन पंचवार्षिक निवडणुका राष्टÑवादीने ही जागा लढवली. यश एकदाही मिळाले नाही. डॉ.अर्जुन भंगाळे, अ‍ॅड.रवींद्र पाटील, मनीष जैन यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, भाजपाचा बालेकिल्ला अभेद्य राहिला.यंदा तर पक्षाच्या उमेदवारीचा घोळ संपता संपेना. पवारांनी वेगवेगळी नावे चर्चेत आणून जनमताचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, परंतु, तो फारसा यशस्वी ठरला नाही. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे नाव असेच गुगली म्हणून पुढे आले. विधानसभेचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांची नावे चर्चेत होती. परंतु, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि या मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या स्रुषा रक्षा खडसे यांच्यापुढे टिकाव लागू शकेल, असा उमेदवार पक्षाला शोधूनही सापडत नव्हता. काँग्रेसकडे डॉ.उल्हास पाटील यांच्या रुपाने उमेदवार होता. त्यांनाही पाचोरा दौºयात पवार यांनी राष्टÑवादीत येण्याची आॅफर देऊन पाहिली. परवा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिले. पण डॉ.पाटील त्यांना बधले नाही. राष्टÑवादीपुढे पेच निर्माण झाला होता. नगरच्या जागेविषयी प्रचंड आग्रही असणाºया राष्टÑवादीने आढेवेढे घेत अखेर रावेरची जागा ऐनवेळी सोडली. याला दोन कारणे आहेत. जळगाव मतदारसंघात उमेदवार निश्चित झाला होता, रावेरमध्ये मात्र ठरत नव्हता. पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही, असा संदेश त्यातून जाऊ शकतो हे कारण एक आणि दुसरे म्हणजे, भाजपमधील असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांना पवार आणि राष्टÑवादी सहकार्य करीत असल्याचा समज पसरत होता. दोन्ही कारणे ही पक्षाची प्रतिमा आणि विश्वासाला धक्का पोहोचविणारी असल्याने राष्टÑवादीने अखेर हा निर्णय घेतला.उमेदवाराअभावी मतदारसंघ मित्रपक्षाला सोडण्याची वेळ राष्टÑवादीवर आली, असाच एक योगायोग पवार यांच्याविषयी जळगावात झालेला आहे. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निकटवर्तीय मुंबईकर अरुण मेहता यांना उमेदवारी देण्यात आली. स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरील उमेदवार दिल्याने स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. परंतु, पवारांना विरोध कोण करणार? सुरेशदादा जैन यांनी पुढाकार घेतला आणि अ‍ॅड.शरद वाणी यांना उमेदवारी देण्यात आली. मेहता यांना सूचक व अनुमोदक देखील न मिळाल्याने आल्या पावली ते परत गेले.स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेणे, बळ न देणे याचे परिणाम आता राष्टÑवादी काँग्रेस पक्षाला २० वर्षानंतर जाणवू लागले आहेत. माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी परवा महाआघाडीच्या मेळाव्यात धोक्याची घंटा वाजवली आहेच. दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन ही निवडणूक जिंकली नाही, तर पुढे उमेदवार सुध्दा भेटणार नाही, ही भीती त्यांनी व्यक्त केली. हे का घडले, याचा शोध आणि बोध राष्टÑवादी नेतृत्वाने घ्यायला हवा. जनाधार असलेल्या नेतृत्वाचे खच्चीकरण आणि हुजरेगिरी करणाऱ्यांना पदांची खैरात असे जर होत असेल तर पक्ष रुजणार, वाढणार कसा, हा प्रश्न आहे. रावेरच्या निमित्ताने धोक्याची घंटा वाजली आहे. घड्याळातील गजर किती जणांना ऐकू येतो, किती जण ऐकून त्यावर कार्यवाही करतात, किती कानाडोळा करतात, त्यावर पक्षाची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे. 

 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव