शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

दुष्काळग्रस्तीचा शाप पुसताना...

By admin | Updated: May 14, 2015 00:48 IST

दुष्काळी जिल्हा’ ह्या आपल्या भाळी असलेल्या शिक्क्याला कायमचे पुसून टाकण्याची धडपड सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.

 राजा माने -

‘दुष्काळी जिल्हा’ ह्या आपल्या भाळी असलेल्या शिक्क्याला कायमचे पुसून टाकण्याची धडपड सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. स्वप्नरंजन आणि हवेतल्या गणितात हरवून न जाता इथला सर्वसामान्य शेतकरी येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाऊन राज्यापुढे वेगळा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. साखर कारखानदारी अडचणीत असताना इथल्या ३२ साखर कारखान्यांनी साखर उत्पादनात देशात अव्वल क्रमांक पटकावला. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने ऊस गाळपात आणि साखर उत्पादनात राज्यात पहिला क्रमांक मिळविला. पाणीप्रश्न आणि अनियमित पावसाने वैतागलेल्या मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी तालुक्यात अंकुश पडवळेसारखे जिद्दी शेतकरी सामूहिक शेततळी आणि नेटशेड शेती यशस्वी करताना दिसतात. नव्या जमान्याची भाषा बोलणारी विषमुक्त अथवा सेंद्रिय शेती असो, ठिबक सिंचन पद्धती असो वा नव्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणारी शेती असो जिल्ह्यातील शेतकरी त्याचा स्वीकार करून पुढे जात असताना दिसतो.दुष्काळग्रस्तीचा शाप कायमचा पुसून टाकणे ही सोपी गोष्ट निश्चितच नाही. त्यासाठी संघर्ष आणि कृती यांचा मेळ फक्त शेतकऱ्यांनी घालून जमणार नाही. त्यासाठी प्रशासन, सहकार क्षेत्र आणि स्वत: शेतकरी यांनीच समन्वयाची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याच भूमिकेत सध्या जिल्हा दिसतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेती आणि विकास यांचा विचार करण्याची प्रक्रियाही जिल्ह्यात गतिमान होताना दिसते. ती अधिक गतिमान करण्याचे काम अधिकारी किती खुबीने करू शकतात याचा अनुभव सध्या येतो आहे. देशात सर्वांत मोठा दहा हजार कोटी रुपयांचा जिल्ह्याचा पतपुरवठा आराखडा तयार करणारे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आराखड्याबरहुकूम कामाला लागल्याचे दिसते. ११ लाख हेक्टर शेतीचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात दोन लाख हेक्टर क्षेत्रात ऊस पीक घेतले जाते. १२३ टीएमसी पाणी क्षमता असलेले उजनी धरण असूनही सिंचन क्षेत्राची व्याप्ती वाढत नाही. जिल्ह्यातील ४३ लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणाऱ्या उजनी धरणावरचे ओझे ठिबक सिंचनाशिवाय हलके होणार नाही. त्याचसाठी मुंढे यांनी ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचे केले आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांनी मनावर घेतले तर जिल्ह्यातील शेतीचे सोने होऊ शकते, याचे भान जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी ठेवल्याचे दिसते. त्यामुळे कृषी क्षेत्रातील योजना थेट शिवारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न दिसतो. जे जिल्ह्यात चांगले चालले आहे ते आत्महत्त्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्याचाच एक भाग ठरावा. परंपरेने दुष्काळग्रस्त असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कृषी आणि दुग्ध विकासासाठी कसे प्रयत्न चालले आहेत हे विदर्भातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवावे यासाठी सुरेश काकाणी व सोलापूरचे विक्रीकर सहआयुक्त पुरुषोत्तम गावंडे यांनी एक चांगला उपक्रम आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राबविला. विदर्भातील ५० शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात कल्याणी दूध प्रकल्प, भंडारकवठे येथील सिद्धानंद कोटगुंडे यांनी नेटशेड शेतीच्या माध्यमातून घेतलेले ढोबळी मिरचीचे उत्पन्न तसेच मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे क्रांती फार्मर्स क्लबच्या माध्यमातून चाललेले सामूहिक शेततळ्यासारखे उपक्रम त्या शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. काकाणी-गावंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी व जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी मदन मुकणे यांच्या मदतीने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा उपक्रमदेखील दुष्काळग्रस्तीचा शाप पुसताना इतरांनाही सोबत घेऊन चालण्याचा संदेश देणारे एक पाऊलच ठरावे.