शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तीचा शाप पुसताना...

By admin | Updated: May 14, 2015 00:48 IST

दुष्काळी जिल्हा’ ह्या आपल्या भाळी असलेल्या शिक्क्याला कायमचे पुसून टाकण्याची धडपड सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.

 राजा माने -

‘दुष्काळी जिल्हा’ ह्या आपल्या भाळी असलेल्या शिक्क्याला कायमचे पुसून टाकण्याची धडपड सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. स्वप्नरंजन आणि हवेतल्या गणितात हरवून न जाता इथला सर्वसामान्य शेतकरी येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाऊन राज्यापुढे वेगळा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. साखर कारखानदारी अडचणीत असताना इथल्या ३२ साखर कारखान्यांनी साखर उत्पादनात देशात अव्वल क्रमांक पटकावला. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने ऊस गाळपात आणि साखर उत्पादनात राज्यात पहिला क्रमांक मिळविला. पाणीप्रश्न आणि अनियमित पावसाने वैतागलेल्या मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी तालुक्यात अंकुश पडवळेसारखे जिद्दी शेतकरी सामूहिक शेततळी आणि नेटशेड शेती यशस्वी करताना दिसतात. नव्या जमान्याची भाषा बोलणारी विषमुक्त अथवा सेंद्रिय शेती असो, ठिबक सिंचन पद्धती असो वा नव्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणारी शेती असो जिल्ह्यातील शेतकरी त्याचा स्वीकार करून पुढे जात असताना दिसतो.दुष्काळग्रस्तीचा शाप कायमचा पुसून टाकणे ही सोपी गोष्ट निश्चितच नाही. त्यासाठी संघर्ष आणि कृती यांचा मेळ फक्त शेतकऱ्यांनी घालून जमणार नाही. त्यासाठी प्रशासन, सहकार क्षेत्र आणि स्वत: शेतकरी यांनीच समन्वयाची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याच भूमिकेत सध्या जिल्हा दिसतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेती आणि विकास यांचा विचार करण्याची प्रक्रियाही जिल्ह्यात गतिमान होताना दिसते. ती अधिक गतिमान करण्याचे काम अधिकारी किती खुबीने करू शकतात याचा अनुभव सध्या येतो आहे. देशात सर्वांत मोठा दहा हजार कोटी रुपयांचा जिल्ह्याचा पतपुरवठा आराखडा तयार करणारे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आराखड्याबरहुकूम कामाला लागल्याचे दिसते. ११ लाख हेक्टर शेतीचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात दोन लाख हेक्टर क्षेत्रात ऊस पीक घेतले जाते. १२३ टीएमसी पाणी क्षमता असलेले उजनी धरण असूनही सिंचन क्षेत्राची व्याप्ती वाढत नाही. जिल्ह्यातील ४३ लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणाऱ्या उजनी धरणावरचे ओझे ठिबक सिंचनाशिवाय हलके होणार नाही. त्याचसाठी मुंढे यांनी ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचे केले आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांनी मनावर घेतले तर जिल्ह्यातील शेतीचे सोने होऊ शकते, याचे भान जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी ठेवल्याचे दिसते. त्यामुळे कृषी क्षेत्रातील योजना थेट शिवारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न दिसतो. जे जिल्ह्यात चांगले चालले आहे ते आत्महत्त्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्याचाच एक भाग ठरावा. परंपरेने दुष्काळग्रस्त असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कृषी आणि दुग्ध विकासासाठी कसे प्रयत्न चालले आहेत हे विदर्भातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवावे यासाठी सुरेश काकाणी व सोलापूरचे विक्रीकर सहआयुक्त पुरुषोत्तम गावंडे यांनी एक चांगला उपक्रम आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राबविला. विदर्भातील ५० शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात कल्याणी दूध प्रकल्प, भंडारकवठे येथील सिद्धानंद कोटगुंडे यांनी नेटशेड शेतीच्या माध्यमातून घेतलेले ढोबळी मिरचीचे उत्पन्न तसेच मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे क्रांती फार्मर्स क्लबच्या माध्यमातून चाललेले सामूहिक शेततळ्यासारखे उपक्रम त्या शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. काकाणी-गावंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी व जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी मदन मुकणे यांच्या मदतीने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा उपक्रमदेखील दुष्काळग्रस्तीचा शाप पुसताना इतरांनाही सोबत घेऊन चालण्याचा संदेश देणारे एक पाऊलच ठरावे.