शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

आता तरी जागे व्हा..!

By admin | Updated: March 13, 2017 23:35 IST

चार राज्यांनी त्यांच्या विद्यमान सरकारांच्या विरोधात कौल दिला. याचा फायदा महाराष्ट्रात घ्यायचा की नाही हे सर्वस्वी विरोधकांच्या हाती आहे.

चार राज्यांनी त्यांच्या विद्यमान सरकारांच्या विरोधात कौल दिला. याचा फायदा महाराष्ट्रात घ्यायचा की नाही हे सर्वस्वी विरोधकांच्या हाती आहे.पाच राज्यांच्या विधानसभेचे निकाल जाहीर झाले. त्या निकालांचे त्या त्या राज्यात जे काय परिणाम व्हायचे ते होतील. पण हे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथीची नांदी ठरणार आहेत. भाजपाला या निकालाने बूस्टर डोस मिळाला आहे, तर शिवसेना सत्तेत राहणार की नाही यापेक्षा ती स्वत: एकजीव राहणार की नाही हा प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचा बनलाय. राज्यातल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला चेहराच उरलेला नाही. काँग्रेसकडे लढण्याची जिद्द उरलेली नाही. राष्ट्रवादी पुणे, पिंपरी चिंचवडच्या पराभवातून बाहेर पडलेली नाही. २८८च्या विधानसभेत दोन्ही काँग्रेसचे ८३ सदस्य असूनही सक्षम विरोधी चेहरा यांना उभा करता आलेला नाही. कागदावर मोठमोठी नावे दोन्ही काँग्रेसमध्ये असूनही परफॉरमन्सची दोन पाने भरणेही या सगळ्यांना अशक्य झाले आहे. त्याउलट विधान परिषदेत धनंजय मुंडेंची कामगिरी सातत्याने लक्षणीय राहिलेली आहे. दोन्ही काँग्रेस आजमितीला अस्तित्वाच्या शोधात धडपडत आहेत. या परिस्थितीत येणाऱ्या काळात राज्यात मोठी राजकीय गणिते मांडली जातील आणि प्रत्येकजण आपापल्या ताकदीने ती सोडवतानाही दिसेल.भाजपा सरकार नोटीस पिरीएडवर आहे, आमच्या मंत्र्यांचे राजीनामे त्यांच्या खिशात आहेत, असे सांगणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांनी जुन्या मंत्र्यांना काढून नवीन चेहऱ्यांना संधी द्या अशी मागणी केली आहे. भाजपाने शिवसेनेत लावून दिलेली ही सोनेरी काडी आहे. सत्तेतच राहणार नाही म्हणणारी शिवसेना आता जुने मंत्री बदलून नव्यांना संधी द्या म्हणत सत्तेत राहण्याचा कसा आटोकाट प्रयत्न करत आहेत, हे पद्धतशीरपणे भाजपाने दाखवून दिले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुफ्तगू करतात, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे स्वत:च्या मतदारसंघात मंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी हातमिळवणी करत जालना नगराध्यक्षासाठी उमेदवारच देऊ देत नाहीत. शिवसेनेचे आमदार बंदखोलीत स्वत:च्याच मंत्र्यांना अरे-तुरे करत उद्धार करतात. अशा स्थितीत शिवसेना भाजपाशी लढणार कशी? उद्या जर शिवसेनेचेच मंत्री आणि आमदार वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर शिवसेनेची अवस्था काय होईल? भाजपाने मुंबई महापालिकेत कोणतेही पद न घेता शिवसेनेला महापालिका देऊन मोठा ट्रॅप लावला आहे. त्या सापळ्यात सेनेचा वाघ अलगद सापडला तर तो भाजपाला हवाच आहे. आम्ही शिवसेनेला संपवले नाही, तेच त्यांच्या कर्माने संपले असे म्हणायला पुन्हा भाजपावाले मोकळे होतील. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था शिवसेनेची आहे. २५ वर्षे युतीत सडली असे म्हणणाऱ्या शिवसेनेवर कोणत्या तोंडाने राज्याच्या सत्तेत कायम रहायचे हा यक्ष प्रश्न उभा आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीने पुकारलेल्या कर्जमाफीच्या मागणीत उडी घेतली आहे. मात्र जर भाजपाने राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर या तिघांनाही तोंड दाखवायला जागा रहाणार नाही.अशावेळी नेमके करायचे तरी काय, असा यक्ष प्रश्न दोन्ही काँग्रेसपुढे आहे. भाजपा कशी वागते किंवा त्यांच्या वागण्याचे फायदे तोटे हा फार पुढचा विषय आहे. मुळात दोन्ही काँग्रेसची विश्वासार्हताच पूर्णपणे लयाला गेली आहे. लोकांचा या दोन्ही पक्षावरचा उडालेला विश्वास काही केल्या त्यांना परत मिळवता येईनासा झाला आहे. त्यासाठी अधिवेशनासारख्या संधी चालून आल्या तरी त्याचा त्यांना वापर करता येत नाही. राज्यातले शेकडो प्रश्न असे आहेत की ज्यातून सरकारला वारंवार अडचणीत आणता येऊ शकेल; पण त्यासाठी अभ्यास करून दोन्ही काँग्रेसना सभागृहात यावे लागेल. कामकाज चालवावे लागेल. पदोपदी सरकारला, मंत्र्यांना सळो की पळो करून सोडावे लागेल. त्यासाठी खूप मोठी इच्छाशक्ती आणि अभ्यासू टीम उभी करावी लागेल. पण वर्तमानपत्रात छापून आलेले विषयच आमदार सभागृहात मांडणार असतील तर त्यातून काही साध्य होणार नाही. दोन्ही काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आपापल्या भांडणांचे गाठोडे बांधून टाकले आणि एकदिलाने मैदानात उतरायचे ठरवले तरच येणारा काळ त्यांचा असेल अन्यथा या अ‍ॅन्टीइन्क्मबन्सीचा फायदा अशक्य आहे..! - अतुल कुलकर्णी