शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी जागे व्हा..!

By admin | Updated: March 13, 2017 23:35 IST

चार राज्यांनी त्यांच्या विद्यमान सरकारांच्या विरोधात कौल दिला. याचा फायदा महाराष्ट्रात घ्यायचा की नाही हे सर्वस्वी विरोधकांच्या हाती आहे.

चार राज्यांनी त्यांच्या विद्यमान सरकारांच्या विरोधात कौल दिला. याचा फायदा महाराष्ट्रात घ्यायचा की नाही हे सर्वस्वी विरोधकांच्या हाती आहे.पाच राज्यांच्या विधानसभेचे निकाल जाहीर झाले. त्या निकालांचे त्या त्या राज्यात जे काय परिणाम व्हायचे ते होतील. पण हे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथीची नांदी ठरणार आहेत. भाजपाला या निकालाने बूस्टर डोस मिळाला आहे, तर शिवसेना सत्तेत राहणार की नाही यापेक्षा ती स्वत: एकजीव राहणार की नाही हा प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचा बनलाय. राज्यातल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला चेहराच उरलेला नाही. काँग्रेसकडे लढण्याची जिद्द उरलेली नाही. राष्ट्रवादी पुणे, पिंपरी चिंचवडच्या पराभवातून बाहेर पडलेली नाही. २८८च्या विधानसभेत दोन्ही काँग्रेसचे ८३ सदस्य असूनही सक्षम विरोधी चेहरा यांना उभा करता आलेला नाही. कागदावर मोठमोठी नावे दोन्ही काँग्रेसमध्ये असूनही परफॉरमन्सची दोन पाने भरणेही या सगळ्यांना अशक्य झाले आहे. त्याउलट विधान परिषदेत धनंजय मुंडेंची कामगिरी सातत्याने लक्षणीय राहिलेली आहे. दोन्ही काँग्रेस आजमितीला अस्तित्वाच्या शोधात धडपडत आहेत. या परिस्थितीत येणाऱ्या काळात राज्यात मोठी राजकीय गणिते मांडली जातील आणि प्रत्येकजण आपापल्या ताकदीने ती सोडवतानाही दिसेल.भाजपा सरकार नोटीस पिरीएडवर आहे, आमच्या मंत्र्यांचे राजीनामे त्यांच्या खिशात आहेत, असे सांगणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांनी जुन्या मंत्र्यांना काढून नवीन चेहऱ्यांना संधी द्या अशी मागणी केली आहे. भाजपाने शिवसेनेत लावून दिलेली ही सोनेरी काडी आहे. सत्तेतच राहणार नाही म्हणणारी शिवसेना आता जुने मंत्री बदलून नव्यांना संधी द्या म्हणत सत्तेत राहण्याचा कसा आटोकाट प्रयत्न करत आहेत, हे पद्धतशीरपणे भाजपाने दाखवून दिले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुफ्तगू करतात, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे स्वत:च्या मतदारसंघात मंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी हातमिळवणी करत जालना नगराध्यक्षासाठी उमेदवारच देऊ देत नाहीत. शिवसेनेचे आमदार बंदखोलीत स्वत:च्याच मंत्र्यांना अरे-तुरे करत उद्धार करतात. अशा स्थितीत शिवसेना भाजपाशी लढणार कशी? उद्या जर शिवसेनेचेच मंत्री आणि आमदार वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर शिवसेनेची अवस्था काय होईल? भाजपाने मुंबई महापालिकेत कोणतेही पद न घेता शिवसेनेला महापालिका देऊन मोठा ट्रॅप लावला आहे. त्या सापळ्यात सेनेचा वाघ अलगद सापडला तर तो भाजपाला हवाच आहे. आम्ही शिवसेनेला संपवले नाही, तेच त्यांच्या कर्माने संपले असे म्हणायला पुन्हा भाजपावाले मोकळे होतील. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था शिवसेनेची आहे. २५ वर्षे युतीत सडली असे म्हणणाऱ्या शिवसेनेवर कोणत्या तोंडाने राज्याच्या सत्तेत कायम रहायचे हा यक्ष प्रश्न उभा आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीने पुकारलेल्या कर्जमाफीच्या मागणीत उडी घेतली आहे. मात्र जर भाजपाने राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर या तिघांनाही तोंड दाखवायला जागा रहाणार नाही.अशावेळी नेमके करायचे तरी काय, असा यक्ष प्रश्न दोन्ही काँग्रेसपुढे आहे. भाजपा कशी वागते किंवा त्यांच्या वागण्याचे फायदे तोटे हा फार पुढचा विषय आहे. मुळात दोन्ही काँग्रेसची विश्वासार्हताच पूर्णपणे लयाला गेली आहे. लोकांचा या दोन्ही पक्षावरचा उडालेला विश्वास काही केल्या त्यांना परत मिळवता येईनासा झाला आहे. त्यासाठी अधिवेशनासारख्या संधी चालून आल्या तरी त्याचा त्यांना वापर करता येत नाही. राज्यातले शेकडो प्रश्न असे आहेत की ज्यातून सरकारला वारंवार अडचणीत आणता येऊ शकेल; पण त्यासाठी अभ्यास करून दोन्ही काँग्रेसना सभागृहात यावे लागेल. कामकाज चालवावे लागेल. पदोपदी सरकारला, मंत्र्यांना सळो की पळो करून सोडावे लागेल. त्यासाठी खूप मोठी इच्छाशक्ती आणि अभ्यासू टीम उभी करावी लागेल. पण वर्तमानपत्रात छापून आलेले विषयच आमदार सभागृहात मांडणार असतील तर त्यातून काही साध्य होणार नाही. दोन्ही काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आपापल्या भांडणांचे गाठोडे बांधून टाकले आणि एकदिलाने मैदानात उतरायचे ठरवले तरच येणारा काळ त्यांचा असेल अन्यथा या अ‍ॅन्टीइन्क्मबन्सीचा फायदा अशक्य आहे..! - अतुल कुलकर्णी