शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वडाळी बुद्रुकचा धडा घ्यावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:04 IST

एकीकडे प्रत्येक गाव हगणदारीमुक्त व्हावे आणि गावोगावी शौचालये बांधली जावीत यासाठी राज्य सरकारकडून अनुदान दिले जात असताना दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेतीलच एक घटक असलेल्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हगणदारीमुक्तीच्या कामात बाधा आणत असतील, तर ही बाब निश्चितच अशोभनीय म्हणायला हवी.

एकीकडे प्रत्येक गाव हगणदारीमुक्त व्हावे आणि गावोगावी शौचालये बांधली जावीत यासाठी राज्य सरकारकडून अनुदान दिले जात असताना दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेतीलच एक घटक असलेल्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हगणदारीमुक्तीच्या कामात बाधा आणत असतील, तर ही बाब निश्चितच अशोभनीय म्हणायला हवी. वडाळी बुद्रुक हे नांदगाव तालुक्यातील नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे गाव! या ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरताना नऊ सदस्यांनी त्यांच्याकडे शौचालये वापरात असल्याचे प्रमाणपत्र जोडलेले नव्हते; मात्र शंभर रुपयांच्या हमीपत्रावर शौचालये बांधू असे लिहून दिले होते. परंतु ठरावीक मुदतीच्या आत तसेच ग्रामस्थांनी दोन ग्रामसभा घेऊन सूचित केल्यानंतरही संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी शौचालये बांधण्याकडे कानाडोळा केला. अखेरीस जिल्हाधिकाºयांकडे दाद मागण्यात आल्यानंतर त्यांनी सरपंच, उपसरपंचासह नऊ सदस्यांना अपात्र ठरवीत ग्रामपंचायत बरखास्त केली. केवळ शौचालयाअभावी एखादी ग्रामपंचायत बरखास्त होण्याचा हा बहुधा राज्यातील पहिलाच प्रकार असावा.जिल्हाधिकाºयांच्या या निर्णयाचे स्वागत होत असले तरी तो निर्णय इतर ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आणि सावधानतेचा इशारा देणाराही म्हणावा लागेल. या निर्णयामुळे प्रत्येकाच्या मनात शौचालये आणि हगणदारीमुक्तीचे महत्त्व अधोरेखित झाल्यावाचून राहणार नाही. शासनाच्या बहुतांशी योजना जनसामान्यांसाठी हिताच्या असतात, परंतु त्यांचा योग्य प्रचार-प्रसार होत नाही आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत पुरेशी आस्थाही दाखविली जात नसल्यानेच कित्येकदा त्या योजना फसल्याचे निदर्शनास आले आहे. लोकप्रतिनिधी किंवा शासनाच्या प्रतिनिधींनी गांभीर्य बाळगून शासन उद्देशाला बळकटी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास समाजाकडूनही सकारात्मक प्रतिसाद लाभू शकेल. महाराष्टÑ हगणदारीमुक्त व्हावे यासाठी शासनस्तरावरून लाखो रुपये खर्चून या योजनेचा प्रचार, प्रसार केला जात आहे. या योजनेला प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविलेही जात आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला शौचालयांच्या बांधकामासाठी अनुदानदेखील दिले जात आहे. असे असताना ग्रामपंचायतींनी स्वत:च्या नावलौकिकासाठी याकामी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.ज्यांचा आदर्श गावकºयांनी घ्यायला हवा त्या ग्रामपंचायतीचे कारभारीच जर का योजनेला अनास्थेची पाने पुसत असतील तर जिल्हाधिकाºयांनी उगारलेला बरखास्तीचा बडगा उचितच म्हणायला हवा. वडाळी बुद्रुक हे महाराष्टÑातील इतर सर्वसामान्य गावांसारखेच एक खेडेवजा गाव आहे. त्या गावात जर का शौचालयांअभावी पदाधिकारी अपात्र ठरविण्यासोबतच ग्रामपंचायत बरखास्त होण्याची वेळ येत असेल तर राज्यातील अन्य ग्रामपंचायतींसाठी हा सूचक इशाराच म्हणावा लागेल. ही नामुष्की टाळायची असेल तर वडाळी बुद्रुकच्या प्रकारापासून धडा घ्यायला हवा.