शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

गिधाड रेस्तराँ

By admin | Updated: September 9, 2016 16:28 IST

एक आदिवासी पाडा. जो एकदिलानं सरकारी योजनांना प्रतिसाद देतो आणि म्हणता म्हणता गाव बदलतं, आणि आपली नवी ओळख बनवतं..

- अझहर शेखबदल स्वीकारण्याची मानसिकता असेल तर एक आदिवासी पाडाही किती बदलू शकतो याचं एक उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील दुर्गम आदिवासी खोरीपाडा. हा पाडा राज्यात आदर्श आदिवासी पाडा म्हणून ओळखला जातो. २०१५ साली राज्य शासनाने संत तुकाराम वनग्राम योजना पुरस्कार देऊन त्याचा गौरवही केला होता. अलीकडेच साजरा झालेल्या गिधाड दिनानिमित्त त्या पाड्यात जाण्याचा योग आला. गिधाड संवर्धनासाठी या गावात एक ‘रेस्तरॉँ’ सुरू करण्यात आलं आणि गिधाडांची संख्याही वाढली. गिधाड शुभ नाही असं मानणाऱ्या गावानं गिधाडांचं स्वागत किती मायेनं केलं याचं हा पाडा हे एक उदाहरण आहे.खोरीपाडा हा ८६ कुटुंबांचा एक पाडा. वनविभागाचं आवाहन गावानं स्वीकारलं. आज या पाड्यावरच्या सर्व घरांमध्ये वनविभागाच्या मदतीने एलपीजी गॅसवर स्वयंपाक होतो. ‘चूल’ अपवादानंच पेटते. जंगल संरक्षण, वनजमिनींचं संरक्षण, वनसंपदेचे संवर्धन आणि वन्यजिवांविषयीचे प्रेम हे सारं या पाड्यावर गप्पांतून नाहीतर कृतीतून भेटत जातं. आठ ते दहा वर्षांपूर्वी मात्र खोरीपाड्याची स्थिती वेगळी होती. या ठिकाणी वनविभागाच्या जमिनींवर आदिवासींनी अतिक्रमण करत ७० हेक्टर जागेवर शेती सुरू केली होती. खोरीपाड्या-भोवती असणारा संपूर्ण डोंगर ओसाड पडलेला होता. २०१२ साली तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी राजन गायकवाड, वनरक्षक काशीनाथ वाघेरे आदिंनी ग्रामसभा केली. तत्पूर्वी २००५ पासून अस्तिवात असलेल्या मात्र मूर्च्छित अवस्था प्राप्त झालेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीला खऱ्या २०११ पासून ऊर्जितावस्था प्राप्त झाली. एकूण २४ लोक या समितीत कार्यरत आहेत.२०१२ साली पावसाळ्यात वनविभाग व खोरीपाडा येथील रहिवाशांनी एकत्र येऊन निसर्गसंवर्धनासाठी तीस हेक्टर जागेत ३३ हजार भारतीय प्रजातीची रोपांची लागवड केली. आवळा, शिवण, काजू, अर्जुन, सादडा, खैर, शिसू, हिरडा, बेहडा, मोह, करंज, आंबा अशा रोपांची लागवड यावेळी करण्यात आली.खोरीपाडा येथे पाऊस प्रचंड प्रमाणात होतो; मात्र डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी नद्या-नाल्यांमध्ये वाहून जात होते. त्यामुळे उन्हाळ्यात खोरीपाडा येथे पाणीटंचाई असतेच. त्यामुळे वनविभागाने पुढाकार घेत गावकऱ्यांच्या मदतीने डोंगरावरील पावसाचे पाणी अडविण्यासाठी समपातळीवर स्तरावर चर खोदले. या खोदकामातून निघालेल्या मातीच्या भरावावर बांबू, अडुळसा अशी प्रजातीची लागवड केली. चार वर्षांमध्ये संपूर्ण डोंगराला हिरवाईचे कोंदण लाभले असून, वन्यजिवांची संख्याही वाढली आहे. बिबट्या, मोर, ससे, कोल्हे, गिधाड अशा विविध प्रकारच्या वन्यजिवांचे वास्तव्य या भागात आहे. २०१४मध्ये तीस हेक्टर क्षेत्राचे विविध भाग वनविभागाने केले. त्यापैकी ६२ लोकांना रोपवन संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली. प्रतिरोपामागे दरमहा पन्नास पैसेप्रमाणे रक्कम संरक्षणासाठी वनविभागाने निश्चित केली. दरमहा प्रत्येकाला किमान पाचशे रुपये या माध्यमातून मिळत आहे. एकूण ६२ लोक ही वनसंवर्धनाची जबाबदारी पार पाडत आहेत. वन संरक्षणामुळे गवताची चांगली वाढ झाली. कुऱ्हाडबंदी, चराईबंदी असल्यामुळे चाऱ्याचा प्रश्नही सुटला. आदिवासींनी गवत कापणी वेळोवेळी केल्याने उन्हाळ्यात वणव्यापासूनही वन सुरक्षित राहिले. खोरीपाड्यामध्ये ८६ कुटुंबांना एलपीजी गॅस २५ टक्के अनुदानावर गॅस नोंदणी केली. सर्वांच्या घरात सध्या गॅसवर स्वयंपाक होतो. गॅस नोंदणीची ७५ टक्के रकमेचा भार वनविभागाने पेलला. स्वयंपाकासाठी लागणारा लाकुडफाटा जमा करण्याची भ्रांत मिटली आणि पर्यायाने जंगलतोेडीलाही आळा बसला. खोल सलग समपातळी स्तर घेतल्याने पाण्याची पातळी वाढली भूगर्भ पातळी वाढल्याने तीन कूपनलिका केल्या होत्या त्यांना पाणी चांगले लागले. ८६ कुटुंबांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. याबरोबरच येथील डोंगराळ भागामध्ये विविध वनऔषधी वृक्ष, वेली, झुडपे या भागांमध्ये आढळून येतात. हा पाडा क्षयरोगमुक्त व कुपोषणमुक्तही झाला. साऱ्या गावानं पुढं होत एकदिलानं काम केलं तर गाव किती बदलतं याचं हा पाडा हे एक उदाहरण आहे.आंतरराष्ट्रीय गिधाड संरक्षण दिन नुकताच साजरा झाला. जगाच्या पाठीवरून निसर्गातील महत्त्वाचा एक घटक असलेला गिधाड पक्षी नामशेष होत चालला आहे. गिधाडे वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्नही होत आहेत. जगभरात गिधाडाच्या विविध जाती आढळून येतात. भारतात प्रामुख्याने दोन जाती आढळतात. त्यामध्ये पांढऱ्या पाठीचे गिधाड आणि लांब चोचीचे गिधाड. खोरीपाडा या आदिवासी गावालगत डोंगरांच्या पायथ्याशी ‘गिधाड रेस्तराँ’ सुरू करण्याची संकल्पना वनविभागानं मांडली. गावच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. सर्व आदिवासींना विश्वासात घेऊन २०११ साली योग्य जागेचा शोध सुरू झाला. आणि या गावात गिधाडांसाठी रेस्तरॉँ सुरू झालं. आज खोरीपाड्याची ती ओळखच बनली आहे. या गावात गिधाडांच्या संख्येत वाढ होत गेली आणि गेल्या पाच वर्षामध्ये २५० गिधाडांची या ठिकाणी नोंद झाली.(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीमध्ये सहायक उपसंपादक आहेत.)

azharsk62@yahoo.com