शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना गृहित धरणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:02 IST

सत्तेमुळे, पदामुळे डोक्यात हवा शिरते आणि जमिनीपासून चार वीत रथ उंचावर धावू लागला की, समजावे आत्मघात हमखास होणार आहे. त्याची प्रचिती या निकालाने आणून दिली आहे.

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजप-शिवसेनेसह सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे. सत्तेमुळे, पदामुळे डोक्यात हवा शिरते आणि जमिनीपासून चार वीत रथ उंचावर धावू लागला की, समजावे आत्मघात हमखास होणार आहे. त्याची प्रचिती या निकालाने आणून दिली आहे.संकटमोचक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या गिरीश महाजन यांना आता भाजपच्या खान्देशातील अपयशाचे धनी समजले जाणे अगदी स्वाभाविक आहे. नगर, नाशिक, जळगाव आणि धुळे महपालिका ताब्यात घेण्याचे यश जसे सर्वस्वी त्यांचे होते, तसे विधानसभा निवडणुकीत खान्देशचे निर्णय हे त्यांच्या कलानेच पक्षश्रेष्ठींनी घेतले होते. उत्तर महाराष्टÑातील ४७ पैकी ३५ जागा निवडून येतील, हा अंदाज त्यांचा आत्मविश्वास दर्शविणारा होता. आता असे का घडले नाही, याचेही उत्तर त्यांनी मतदारांना द्यायला हवे.महाजन असो की, राज्यातील भाजपचे नेतृत्व असो, लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्टÑ ही आपली जहागिरी आहे, आपण म्हणू तसेच घडेल, अशा पध्दतीच्या मानसिकतेने काम आणि विचार करु लागले होते. क्रिकेटच्या मैदानावर जसे एखादा कप्तान फलंदाज आणि गोलंदाजांच्या शैलीचा विचार करुन क्षेत्ररचना करतो, अगदी त्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न भाजप श्रेष्ठींनी या निवडणुकीत केला. आमचे उमेदवार आम्हीच ठरवू आणि तुमचे उमेदवारदेखील पळवून नेऊ, असा हेका ठेवल्याने नव्या दमाचे, उमेदीचे उमेदवार विरोधकांनी उभे केले आणि भाजपच्या पैलवानांना भूईसपाट व्हावे लागले. सन्माननीय अपवाद वगळता इतरांना जिंकण्यासाठी बराच घाम गाळावा लागला. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वाटेतही काटे रचण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट आला. ‘आयारामां’ना महत्त्व देण्याचा प्रयत्नात निष्ठावंतांवर अन्याय झाला, पण सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नेते आणि पक्षाविषयी वेगळी धारणा तयार झाली.एकनाथराव खडसे, अनिल गोटे, उदेसिंग पाडवी या विद्यमान आमदारांविषयी पक्षाने कठोर भूमिका घेतली. परिणामी शहादा वगळता भाजपने दोन हक्काच्या जागा गमावल्या. मंजुळा गावीत, डॉ.जितेंद्र ठाकूर, नागेश पाडवी हे पक्षाच्या पडत्या काळात निवडणुका लढवत होते. पक्ष सत्तेत आल्यानंतर अनेक पर्याय तयार झाल्यावर निष्ठावंतांना डावलण्यात आले. गावीत तरीही निवडून आल्या, पण ठाकूर आणि पाडवी यांचे अपयश आणि अन्याय सामान्य कार्यकर्त्यांना वेदना देणाऱ्या ठरल्या.माझे ते माझे आणि तुझे तेही माझे ही भाजपची हाव पक्षाला खड्डयात घालणारी आहे. ही चूक भाजपने लवकर सुधारायला हवी. अन्यथा हा मुद्दा युतीमधील तणावात भर घालू शकतो. प्रभाकर सोनवणे, अमोल शिंदे, चंद्रशेखर अत्तरदे, राजवर्धन कदमबांडे, गोविंद शिरोळे यांना निवडणुकीत भाजपने केलेली मदत सेना उमेदवारांना अडचणीची ठरली. एवढे करुनही सेनेचे चार आमदार निवडून आले. हिलाल माळी आणि आमशा पाडवी हे दोन्ही कडवे शिवसैनिक पराभूत झाले. सेना हा त्रास विसरेल, असे मानण्याचे काही कारण नाही. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता चंद्रकांत सोनवणे हे आमदार आता भाजपला मतदारसंघात वरचढ राहतील.भाजपमधील अंतर्गत बंडाळीचा त्रास झाल्याने दोनदा आमदारकी हुकलेल्या अमळनेरच्या अनिल भाईदास पाटील यांना राष्टÑवादीकडून आमदारकी मिळाली. ‘भूमिपूत्र’ या मुद्यावरुन भाजपच्या काही मंडळींनी उघड तर काहींनी छुपी मदत केली. रावेरात अनिल चौधरींना छुपी मदत, खडसे यांच्या तिकीट कापण्याचा प्रकार याचा फटका हरिभाऊ जावळे यांना बसला. संयमित प्रचार करणाºया शिरीष चौधरींना पुन्हा एकदा विधानसभेचे दार उघडले.मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटील यांना गेल्यावेळेप्रमाणे ज्ञात-अज्ञात व्यक्ती, पक्षांकडून मदत झाली आणि त्यांनी खडसे यांच्या साम्राज्याला यंदा यशस्वी धडक दिली. गेल्यावेळी शिवसेना पक्षाची उमेदवारी असतानाही अपयश मिळाले, यंदा अपक्ष उमेदवारी त्यांना सोयीची आणि फायद्याची ठरली. मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर तालुक्याचा काही भाग असा मतदारसंघ असलेले खडसे यांचे प्राबल्य पाटील यांनी संपविले. विधिमंडळात केवळ खडसेच नाही तर त्यांचे वारसदारदेखील पोहोचले नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले.मतदारांना कोणीही गृहित धरु नये, हा संदेश या निवडणुकीने सगळ्यांनाच दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव