शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना गृहित धरणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:02 IST

सत्तेमुळे, पदामुळे डोक्यात हवा शिरते आणि जमिनीपासून चार वीत रथ उंचावर धावू लागला की, समजावे आत्मघात हमखास होणार आहे. त्याची प्रचिती या निकालाने आणून दिली आहे.

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजप-शिवसेनेसह सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे. सत्तेमुळे, पदामुळे डोक्यात हवा शिरते आणि जमिनीपासून चार वीत रथ उंचावर धावू लागला की, समजावे आत्मघात हमखास होणार आहे. त्याची प्रचिती या निकालाने आणून दिली आहे.संकटमोचक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या गिरीश महाजन यांना आता भाजपच्या खान्देशातील अपयशाचे धनी समजले जाणे अगदी स्वाभाविक आहे. नगर, नाशिक, जळगाव आणि धुळे महपालिका ताब्यात घेण्याचे यश जसे सर्वस्वी त्यांचे होते, तसे विधानसभा निवडणुकीत खान्देशचे निर्णय हे त्यांच्या कलानेच पक्षश्रेष्ठींनी घेतले होते. उत्तर महाराष्टÑातील ४७ पैकी ३५ जागा निवडून येतील, हा अंदाज त्यांचा आत्मविश्वास दर्शविणारा होता. आता असे का घडले नाही, याचेही उत्तर त्यांनी मतदारांना द्यायला हवे.महाजन असो की, राज्यातील भाजपचे नेतृत्व असो, लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्टÑ ही आपली जहागिरी आहे, आपण म्हणू तसेच घडेल, अशा पध्दतीच्या मानसिकतेने काम आणि विचार करु लागले होते. क्रिकेटच्या मैदानावर जसे एखादा कप्तान फलंदाज आणि गोलंदाजांच्या शैलीचा विचार करुन क्षेत्ररचना करतो, अगदी त्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न भाजप श्रेष्ठींनी या निवडणुकीत केला. आमचे उमेदवार आम्हीच ठरवू आणि तुमचे उमेदवारदेखील पळवून नेऊ, असा हेका ठेवल्याने नव्या दमाचे, उमेदीचे उमेदवार विरोधकांनी उभे केले आणि भाजपच्या पैलवानांना भूईसपाट व्हावे लागले. सन्माननीय अपवाद वगळता इतरांना जिंकण्यासाठी बराच घाम गाळावा लागला. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वाटेतही काटे रचण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट आला. ‘आयारामां’ना महत्त्व देण्याचा प्रयत्नात निष्ठावंतांवर अन्याय झाला, पण सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नेते आणि पक्षाविषयी वेगळी धारणा तयार झाली.एकनाथराव खडसे, अनिल गोटे, उदेसिंग पाडवी या विद्यमान आमदारांविषयी पक्षाने कठोर भूमिका घेतली. परिणामी शहादा वगळता भाजपने दोन हक्काच्या जागा गमावल्या. मंजुळा गावीत, डॉ.जितेंद्र ठाकूर, नागेश पाडवी हे पक्षाच्या पडत्या काळात निवडणुका लढवत होते. पक्ष सत्तेत आल्यानंतर अनेक पर्याय तयार झाल्यावर निष्ठावंतांना डावलण्यात आले. गावीत तरीही निवडून आल्या, पण ठाकूर आणि पाडवी यांचे अपयश आणि अन्याय सामान्य कार्यकर्त्यांना वेदना देणाऱ्या ठरल्या.माझे ते माझे आणि तुझे तेही माझे ही भाजपची हाव पक्षाला खड्डयात घालणारी आहे. ही चूक भाजपने लवकर सुधारायला हवी. अन्यथा हा मुद्दा युतीमधील तणावात भर घालू शकतो. प्रभाकर सोनवणे, अमोल शिंदे, चंद्रशेखर अत्तरदे, राजवर्धन कदमबांडे, गोविंद शिरोळे यांना निवडणुकीत भाजपने केलेली मदत सेना उमेदवारांना अडचणीची ठरली. एवढे करुनही सेनेचे चार आमदार निवडून आले. हिलाल माळी आणि आमशा पाडवी हे दोन्ही कडवे शिवसैनिक पराभूत झाले. सेना हा त्रास विसरेल, असे मानण्याचे काही कारण नाही. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता चंद्रकांत सोनवणे हे आमदार आता भाजपला मतदारसंघात वरचढ राहतील.भाजपमधील अंतर्गत बंडाळीचा त्रास झाल्याने दोनदा आमदारकी हुकलेल्या अमळनेरच्या अनिल भाईदास पाटील यांना राष्टÑवादीकडून आमदारकी मिळाली. ‘भूमिपूत्र’ या मुद्यावरुन भाजपच्या काही मंडळींनी उघड तर काहींनी छुपी मदत केली. रावेरात अनिल चौधरींना छुपी मदत, खडसे यांच्या तिकीट कापण्याचा प्रकार याचा फटका हरिभाऊ जावळे यांना बसला. संयमित प्रचार करणाºया शिरीष चौधरींना पुन्हा एकदा विधानसभेचे दार उघडले.मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटील यांना गेल्यावेळेप्रमाणे ज्ञात-अज्ञात व्यक्ती, पक्षांकडून मदत झाली आणि त्यांनी खडसे यांच्या साम्राज्याला यंदा यशस्वी धडक दिली. गेल्यावेळी शिवसेना पक्षाची उमेदवारी असतानाही अपयश मिळाले, यंदा अपक्ष उमेदवारी त्यांना सोयीची आणि फायद्याची ठरली. मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर तालुक्याचा काही भाग असा मतदारसंघ असलेले खडसे यांचे प्राबल्य पाटील यांनी संपविले. विधिमंडळात केवळ खडसेच नाही तर त्यांचे वारसदारदेखील पोहोचले नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले.मतदारांना कोणीही गृहित धरु नये, हा संदेश या निवडणुकीने सगळ्यांनाच दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव