शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
3
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
4
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
5
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
6
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
7
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
8
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
9
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
10
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
11
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
12
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
13
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
14
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
15
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
16
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
17
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
18
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
19
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
20
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

मतदारांना गृहित धरणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:02 IST

सत्तेमुळे, पदामुळे डोक्यात हवा शिरते आणि जमिनीपासून चार वीत रथ उंचावर धावू लागला की, समजावे आत्मघात हमखास होणार आहे. त्याची प्रचिती या निकालाने आणून दिली आहे.

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजप-शिवसेनेसह सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे. सत्तेमुळे, पदामुळे डोक्यात हवा शिरते आणि जमिनीपासून चार वीत रथ उंचावर धावू लागला की, समजावे आत्मघात हमखास होणार आहे. त्याची प्रचिती या निकालाने आणून दिली आहे.संकटमोचक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या गिरीश महाजन यांना आता भाजपच्या खान्देशातील अपयशाचे धनी समजले जाणे अगदी स्वाभाविक आहे. नगर, नाशिक, जळगाव आणि धुळे महपालिका ताब्यात घेण्याचे यश जसे सर्वस्वी त्यांचे होते, तसे विधानसभा निवडणुकीत खान्देशचे निर्णय हे त्यांच्या कलानेच पक्षश्रेष्ठींनी घेतले होते. उत्तर महाराष्टÑातील ४७ पैकी ३५ जागा निवडून येतील, हा अंदाज त्यांचा आत्मविश्वास दर्शविणारा होता. आता असे का घडले नाही, याचेही उत्तर त्यांनी मतदारांना द्यायला हवे.महाजन असो की, राज्यातील भाजपचे नेतृत्व असो, लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्टÑ ही आपली जहागिरी आहे, आपण म्हणू तसेच घडेल, अशा पध्दतीच्या मानसिकतेने काम आणि विचार करु लागले होते. क्रिकेटच्या मैदानावर जसे एखादा कप्तान फलंदाज आणि गोलंदाजांच्या शैलीचा विचार करुन क्षेत्ररचना करतो, अगदी त्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न भाजप श्रेष्ठींनी या निवडणुकीत केला. आमचे उमेदवार आम्हीच ठरवू आणि तुमचे उमेदवारदेखील पळवून नेऊ, असा हेका ठेवल्याने नव्या दमाचे, उमेदीचे उमेदवार विरोधकांनी उभे केले आणि भाजपच्या पैलवानांना भूईसपाट व्हावे लागले. सन्माननीय अपवाद वगळता इतरांना जिंकण्यासाठी बराच घाम गाळावा लागला. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वाटेतही काटे रचण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट आला. ‘आयारामां’ना महत्त्व देण्याचा प्रयत्नात निष्ठावंतांवर अन्याय झाला, पण सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नेते आणि पक्षाविषयी वेगळी धारणा तयार झाली.एकनाथराव खडसे, अनिल गोटे, उदेसिंग पाडवी या विद्यमान आमदारांविषयी पक्षाने कठोर भूमिका घेतली. परिणामी शहादा वगळता भाजपने दोन हक्काच्या जागा गमावल्या. मंजुळा गावीत, डॉ.जितेंद्र ठाकूर, नागेश पाडवी हे पक्षाच्या पडत्या काळात निवडणुका लढवत होते. पक्ष सत्तेत आल्यानंतर अनेक पर्याय तयार झाल्यावर निष्ठावंतांना डावलण्यात आले. गावीत तरीही निवडून आल्या, पण ठाकूर आणि पाडवी यांचे अपयश आणि अन्याय सामान्य कार्यकर्त्यांना वेदना देणाऱ्या ठरल्या.माझे ते माझे आणि तुझे तेही माझे ही भाजपची हाव पक्षाला खड्डयात घालणारी आहे. ही चूक भाजपने लवकर सुधारायला हवी. अन्यथा हा मुद्दा युतीमधील तणावात भर घालू शकतो. प्रभाकर सोनवणे, अमोल शिंदे, चंद्रशेखर अत्तरदे, राजवर्धन कदमबांडे, गोविंद शिरोळे यांना निवडणुकीत भाजपने केलेली मदत सेना उमेदवारांना अडचणीची ठरली. एवढे करुनही सेनेचे चार आमदार निवडून आले. हिलाल माळी आणि आमशा पाडवी हे दोन्ही कडवे शिवसैनिक पराभूत झाले. सेना हा त्रास विसरेल, असे मानण्याचे काही कारण नाही. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता चंद्रकांत सोनवणे हे आमदार आता भाजपला मतदारसंघात वरचढ राहतील.भाजपमधील अंतर्गत बंडाळीचा त्रास झाल्याने दोनदा आमदारकी हुकलेल्या अमळनेरच्या अनिल भाईदास पाटील यांना राष्टÑवादीकडून आमदारकी मिळाली. ‘भूमिपूत्र’ या मुद्यावरुन भाजपच्या काही मंडळींनी उघड तर काहींनी छुपी मदत केली. रावेरात अनिल चौधरींना छुपी मदत, खडसे यांच्या तिकीट कापण्याचा प्रकार याचा फटका हरिभाऊ जावळे यांना बसला. संयमित प्रचार करणाºया शिरीष चौधरींना पुन्हा एकदा विधानसभेचे दार उघडले.मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटील यांना गेल्यावेळेप्रमाणे ज्ञात-अज्ञात व्यक्ती, पक्षांकडून मदत झाली आणि त्यांनी खडसे यांच्या साम्राज्याला यंदा यशस्वी धडक दिली. गेल्यावेळी शिवसेना पक्षाची उमेदवारी असतानाही अपयश मिळाले, यंदा अपक्ष उमेदवारी त्यांना सोयीची आणि फायद्याची ठरली. मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर तालुक्याचा काही भाग असा मतदारसंघ असलेले खडसे यांचे प्राबल्य पाटील यांनी संपविले. विधिमंडळात केवळ खडसेच नाही तर त्यांचे वारसदारदेखील पोहोचले नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले.मतदारांना कोणीही गृहित धरु नये, हा संदेश या निवडणुकीने सगळ्यांनाच दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव