शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

मतदारांनी मोदींकडे पाहून भरघोस मते दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 04:50 IST

युवा पिढीने मोदींमध्ये एक खंबीर नेतृत्व पाहिले व त्यांनी हे मतदान केले आहे. स्वच्छ भारतसारखे कार्यक्रम व गरिबांना आधार देणाऱ्या योजनांना मिळालेली ही पसंती आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्याची ठाम भूमिका घेतल्याने, काश्मीरच्या संदर्भात मोदी काही तरी नवे करतील, याचीही मोठी अपेक्षा मतदारांनी बाळगलेली दिसते.

माझ्या मते यावेळची लोकसभा निवडणूक ही नरेंद्र मोदी ही एक व्यक्ती व तिच्याविरुद्ध एकवटलेले सर्व विरोधक यांच्यातील लढाई होती. मला वाटते की, उमेदवार कोण आहे हे न पाहता, मतदारांनी मोदींना भरभरून मते दिली आहेत. मोदींवर संपूर्ण देशाने व्यक्त केलेला हा दृढविश्वास ही विकासाभिमुख राजकारणास दिलेली पसंतीची थाप आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रबळ होईल व जगात ताठ मानेने उभा राहील, याविषयी त्यांनी व्यक्त केलेली खात्रीही यातून दिसते. जनतेने दहशतवाद व भ्रष्टाचार यांच्या विरोधात दिलेला हा कौल आहे. संपूर्ण देशात ‘जीएसटी’सारखा एकच कर व नोटाबंदीवर जनतेने केलेले हे शिक्कामोर्तब आहे. मोदींच्या या दोन्ही निर्णयांविरुद्ध विरोधकांनी केलेला विरोध सपशेल फोेल ठरला.

भारताच्या युवा पिढीने मोदींमध्ये एक खंबीर नेतृत्व पाहिले व आपल्या आकांक्षा तेच पूर्ण करतील, या खात्रीने त्यांनी हे मतदान केले आहे. स्वच्छ भारतसारखे कार्यक्रम व गरिबांना आधार देणाºया योजनांना मिळालेली ही पसंती आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्याची ठाम भूमिका घेतल्याने काश्मीरच्या संदर्भात मोदी काही तरी नवे करतील, याचीही मोठी अपेक्षा मतदारांनी बाळगलेली दिसते.गेली ७० वर्षे नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या ईशान्येकडील राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांनाही मतदारांनी या निकालाने पाठिंबा दिला आहे. नेहमीच शत्रुत्व बाळगणाºया पाकिस्तानसारख्या शेजारी देशाची व दहशतवाद्यांची यापुढे जराही गय केली जाणार नाही, हे बालाकोट येथील हवाई हल्ल्यांतून ठणकावून सांगण्याचे हे यश आहे. चीन या दुसºया शेजाºयाने कुरापती काढल्या, तेव्हा मोदींनी आपल्या ५६ इंची छातीने दमदार मुकाबला केला, हे डोकलाम तिढ्याच्या वेळी पाहणाºया लोकांनी या मतदानातून त्याबद्दल दमदार समर्थन दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोदींच्या स्वच्छ व निष्कलंक चारित्र्यावर देशवासी लुब्ध झाल्याचे हे प्रतीक आहे.

विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये मतदार पूर्णपणे वेगळी गणिते मांडून मतदान करतात, हेही या निकालांचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. ओडिशामध्ये हे स्पष्ट दिसले. विधानसभेसाठी तेथील मतदारांनी नवीन पटनाईक यांना पसंती दिली, पण लोकसभेसाठी मात्र त्यांच्या बिजू जनता दलाला तेवढी मते दिली नाहीत. मोदींनी ज्याला ‘महामिलावट’ म्हटले, त्या विरोधी पक्षांच्या तत्त्वशून्य युतीला या निवडणुकांनी जोरदार थप्पड दिली आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण निवडणूक जिंकण्याची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर घेऊन ती यशस्वीपणे पार पाडणारे मोदी हे या देशाने पूर्वी कधीही न पाहिलेले नवे, अनोखे नेतृत्व आहे. विरोधकांनी धोरणे व कार्यक्रम सोडून व्यक्तिश: मोदींचा दुस्वास केला. विरोधाचे राजकारण कसे करू नये, याचाही धडा या निवडणुकीने दिला आहे.

भविष्यात अनेक वर्षे देशाचे अशाच एकनिष्ठेने नेतृत्व करण्यासाठी मोदींना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.- मुकुल रोहटगी(माजी अ‍ॅटर्नी जनरल )