शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
3
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
4
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
5
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
6
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
7
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
8
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
9
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
10
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
11
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
12
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
13
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
14
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
15
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
16
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
17
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
18
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
19
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
20
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...

मतदारांनी मोदींकडे पाहून भरघोस मते दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 04:50 IST

युवा पिढीने मोदींमध्ये एक खंबीर नेतृत्व पाहिले व त्यांनी हे मतदान केले आहे. स्वच्छ भारतसारखे कार्यक्रम व गरिबांना आधार देणाऱ्या योजनांना मिळालेली ही पसंती आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्याची ठाम भूमिका घेतल्याने, काश्मीरच्या संदर्भात मोदी काही तरी नवे करतील, याचीही मोठी अपेक्षा मतदारांनी बाळगलेली दिसते.

माझ्या मते यावेळची लोकसभा निवडणूक ही नरेंद्र मोदी ही एक व्यक्ती व तिच्याविरुद्ध एकवटलेले सर्व विरोधक यांच्यातील लढाई होती. मला वाटते की, उमेदवार कोण आहे हे न पाहता, मतदारांनी मोदींना भरभरून मते दिली आहेत. मोदींवर संपूर्ण देशाने व्यक्त केलेला हा दृढविश्वास ही विकासाभिमुख राजकारणास दिलेली पसंतीची थाप आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रबळ होईल व जगात ताठ मानेने उभा राहील, याविषयी त्यांनी व्यक्त केलेली खात्रीही यातून दिसते. जनतेने दहशतवाद व भ्रष्टाचार यांच्या विरोधात दिलेला हा कौल आहे. संपूर्ण देशात ‘जीएसटी’सारखा एकच कर व नोटाबंदीवर जनतेने केलेले हे शिक्कामोर्तब आहे. मोदींच्या या दोन्ही निर्णयांविरुद्ध विरोधकांनी केलेला विरोध सपशेल फोेल ठरला.

भारताच्या युवा पिढीने मोदींमध्ये एक खंबीर नेतृत्व पाहिले व आपल्या आकांक्षा तेच पूर्ण करतील, या खात्रीने त्यांनी हे मतदान केले आहे. स्वच्छ भारतसारखे कार्यक्रम व गरिबांना आधार देणाºया योजनांना मिळालेली ही पसंती आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्याची ठाम भूमिका घेतल्याने काश्मीरच्या संदर्भात मोदी काही तरी नवे करतील, याचीही मोठी अपेक्षा मतदारांनी बाळगलेली दिसते.गेली ७० वर्षे नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या ईशान्येकडील राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांनाही मतदारांनी या निकालाने पाठिंबा दिला आहे. नेहमीच शत्रुत्व बाळगणाºया पाकिस्तानसारख्या शेजारी देशाची व दहशतवाद्यांची यापुढे जराही गय केली जाणार नाही, हे बालाकोट येथील हवाई हल्ल्यांतून ठणकावून सांगण्याचे हे यश आहे. चीन या दुसºया शेजाºयाने कुरापती काढल्या, तेव्हा मोदींनी आपल्या ५६ इंची छातीने दमदार मुकाबला केला, हे डोकलाम तिढ्याच्या वेळी पाहणाºया लोकांनी या मतदानातून त्याबद्दल दमदार समर्थन दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोदींच्या स्वच्छ व निष्कलंक चारित्र्यावर देशवासी लुब्ध झाल्याचे हे प्रतीक आहे.

विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये मतदार पूर्णपणे वेगळी गणिते मांडून मतदान करतात, हेही या निकालांचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. ओडिशामध्ये हे स्पष्ट दिसले. विधानसभेसाठी तेथील मतदारांनी नवीन पटनाईक यांना पसंती दिली, पण लोकसभेसाठी मात्र त्यांच्या बिजू जनता दलाला तेवढी मते दिली नाहीत. मोदींनी ज्याला ‘महामिलावट’ म्हटले, त्या विरोधी पक्षांच्या तत्त्वशून्य युतीला या निवडणुकांनी जोरदार थप्पड दिली आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण निवडणूक जिंकण्याची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर घेऊन ती यशस्वीपणे पार पाडणारे मोदी हे या देशाने पूर्वी कधीही न पाहिलेले नवे, अनोखे नेतृत्व आहे. विरोधकांनी धोरणे व कार्यक्रम सोडून व्यक्तिश: मोदींचा दुस्वास केला. विरोधाचे राजकारण कसे करू नये, याचाही धडा या निवडणुकीने दिला आहे.

भविष्यात अनेक वर्षे देशाचे अशाच एकनिष्ठेने नेतृत्व करण्यासाठी मोदींना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.- मुकुल रोहटगी(माजी अ‍ॅटर्नी जनरल )