शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

वीरश्रीची इतिश्री!

By admin | Updated: January 6, 2016 23:18 IST

आपल्या अंगावर येणारा प्रत्येक वार झेलण्याची आणि त्यात आपला हुतात्मा झाला तरी ते हौतात्म्य पत्करण्याची राणा भीमदेवी थाटातील गर्जना करणाऱ्या श्रीपाल सबनीस

आपल्या अंगावर येणारा प्रत्येक वार झेलण्याची आणि त्यात आपला हुतात्मा झाला तरी ते हौतात्म्य पत्करण्याची राणा भीमदेवी थाटातील गर्जना करणाऱ्या श्रीपाल सबनीस यांच्यातील या वीरश्रीची (अरेरे) अवघ्या काही तासातच इतिश्री झाल्याने साऱ्या सारस्वतपुत्रांना मोठा धक्का बसला असण्याची शक्यता आहे. आपल्याती वीरश्रीचा लोप पावल्यामुळेच की काय सबनीसांनी पुणे पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आणि पोलिसांनीही ती मोठ्या उदार अंत:करणाने मान्य केली. तसे करताना पोलिसांनी सुरÞक्षा व्यवस्थेचा कोणता दर्जा सबनीसांना देऊ केला हे मात्र कळावयास मार्ग नसल्याने पिंपरी-चिंचवडातील साहित्य संमेलनप्रसंगी संमेलनाध्यक्षांच्या पाठीमागे भिरभिरत्या नजरेचे ‘कॅलिश्नोव्ह’धारी उभे राहातात की कार्बाईनधारी उभे राहातात की चुरगळलेल्या ‘युनिफार्मात’ले मरगळलेले साधे छडीधारी उभे राहातात याचे दर्शन योग्य वेळ येईल तेव्हांच होईल. नरेन्द्र मोदी आज भले देशाचे पंतप्रधान असले तरी कोणे एकेकाळी ते आणि श्रीपाल सबनीस गोट्या, विटीदांडू, आट्यापाट्या आणि तत्सम खेळ खेळत असत याची भाजपावाल्यांना कल्पना नसल्याने श्रीपालांनी नरेन्द्राविषयी एकेरीतले जे उद्गार काढले त्यामागे अनादराची नव्हे तर मित्रत्वाची आणि याच मित्रत्वातून उपजलेल्या आपल्या सवंगड्याच्या प्राण रक्षणाच्या चिंतेची भावना होती हे तरी त्या बिचाऱ्यांना काय ठाऊक असणार? त्यामुळे त्यांना सबनीसांचा बरीक झणका आला आणि त्यांनी त्यांचे चरण कलम करण्याची धमकी दिली. खरे तर त्यात या चरणांचा काय दोष? आक्षेप नरेन्द्रभाईंबद्दल काढलेल्या लागट उद्गारांना होता ना, मग हे उद्गार ज्या जिव्हेतून बाहेर पडले ती जीभ हासडण्याची वगैरे धमकी दिली असती तर जरा मित्रपक्षालाही बरे वाटून गेले असते. पण येताजाता ‘पाय लागू’ संस्कृतीचा भाजपात प्रादुर्भाव झालेला असल्याने लक्ष जिभेकडे न जाता ते पायांकडे गेले असावे. तसेही त्या ऱ्हाळातले भाजपाचे नवजात खासदार अमर साबळे यांच्या मनीध्यानी नसताना त्यांच्या हाती पक्षाने खासदारकीचे घबाड ठेवल्याने अचानकपणे व अनपेक्षितपणे केल्या गेलेल्या या उपकाराची परतफेड करण्यासाठी किंवा गेला बाजार तसे करतो आहोत असे दाखविण्यासाठी अमरभाऊंना ज्या संधीचा शोध होता ती अनायसेच सापडून गेली. पण त्यांच्या या संधीवर आता त्यांच्याच पक्षाचे सरकार विरजण टाकील असा रंग आहे. तथापि सबनीसांचे एकूण रंग बघितल्यानंतर पाव शतकांपूर्वी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी जे म्हणून ठेवले, त्याची सय येते. पोषाखी साहित्य संमेलने नष्ट होतील वा व्हावीत असे ते म्हणाले होते. रोख त्यांचा उधळपट्टीवर होता. पण सालागणिक अध्यक्षपदाची रया संपत जाईल व त्या पदाचे पोतेरे करणारे लोक उदयास येतील असेही काही तर त्यांना अभिप्रेत नव्हते?