शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विनोदरंगात रंगला...

By admin | Updated: November 21, 2014 00:46 IST

श्रीरंग गोडबोले माझ्या आयुष्यात कसा आला, कधी आला, हे मला तपशीलवार सांगता येईल.

संजय मोने(प्रसिद्ध अभिनेते व लेखक)श्रीरंग गोडबोले माझ्या आयुष्यात कसा आला, कधी आला, हे मला तपशीलवार सांगता येईल. अगदी तारीख, वार, दिवस, महिना आणि सन यांसकट सांगता येईल. निर्णयसागर पंचांग आणि टिळक पंचांग यातल्या भिन्न तिथींनुसार सांगता येईल. शिवाय, विक्रम संवत् आणि बनिया लोकांच्या चोपडीपूजनानुसार जे काही वर्ष असेल तेही मी सांगू शकेन; पण आधी म्हटलं तसं तो फक्त तपशील होईल. अर्थात, एखाद्या माणसाचे जर व्यक्तिरेखन करायचं असेल तर हा तपशील सगळेच सांगतात. कारण त्यानं तो लेख फुगतो आणि लेखकाची स्मरणशक्ती किती तीव्र आहे, हे जाताजाता सुचवता येते. याला कारणीभूत आपला इतिहास आहे. इतिहास म्हणजे शाळेतला इतिहास हा विषय. आपण इतिहास तब्बल शंभर मार्कांचा विषय म्हणून शिकतो आणि नंतरच्या आयुष्यात इतिहासापासून आपण काहीच शिकलो नाही, अशी खंत व्यक्त करणारा, पाच-दहा हजार रुपयांच्या नुकसानभरपाईवर बोलणारा एखादा वक्ता आपल्या सगळ्या अभ्यासावर बोळा फिरवून जातो. (माफ करा! नुकसानभरपाई हा शब्द चुकून वापरला.. मानधन असं म्हणायचं होतं.) आणि मग आपल्याला प्रश्न पडतो आपण का शिकत होतो?श्रीरंग ऊर्फ रंगा हा पुढे प्रसिद्ध होणार, हे फार लहानपणीच ठरलं होतं कारण त्याच्या श्रीरंग या नावापुढे ऊ र्फ या संबोधनानं जोडणारं रंगा किंवा रंग्या हे अजून एक नाव होतं. जसं विश्वनाथ ऊर्फ नाना पाटेकर किंवा सी. ऊर्फ अण्णा रामचंद्र किंवा.. सुधीर फडके ऊ र्फ बाबुजी. इथून पुढची यादी प्रत्येकानं आपापल्या मगदुराप्रमाणे वाढवावी. तो आणि मी शाळेत होतो तेव्हा आम्ही प्रथम भेटलो. माझा पार लहानपणापासूनचा आणि आजही मित्र असलेला धनंजय गोरे याचा तो मामेभाऊ (मी आणि धनंजय याची मैत्री आजही टिकून आहे, याचं श्रेय संपूर्णपणे त्याला.) पहिल्याच भेटीत तो माझ्या स्मरणात राहिला वगैरे काही झालं नाही. नंतर एकदोनदा मी पुण्याला गेलो होतो, तेव्हा तो मला खडकीला त्याच्या कॉलेजात भेटला. तिथं त्यानं खडकीची एक वेगळी भाषा कशी बोलली जाते, हे मला दाखवलं होतं. तिथं पहिल्यांदा त्याची विनोदाची जात मला आवडली. त्याच्याकडे आज असे अनेक किस्से आहेत; पण तिथे कदाचित त्याची सुरुवात झाली असावी. तो तसा इंजिनिअर आहे, अशी त्याला अंधूक शंका आहे, कारण ते शिक्षण त्यानं घेतलं आहे म्हणून. तो वारंवार भेटत राहतो ते त्याच्या अफाट विनोदामुळे, त्याच्या हुशारीमुळे. त्याच्या विनोदाचा म्हणून एक ठसा आहे. आपल्याकडे गंभीर विषयाला न वाहिलेली किंवा ज्यांचं लेखन कुणी गंभीरपणे घेत नाही (बहुतेक वेळा ते त्याच लायकीचं असतं) त्याला विनोदी लेखक म्हणतात. साधारण ‘चिंतोपंत स्वर्गात जातात’ किंवा ‘भाल्याची भंबेरी’ छापाचे लेख किंवा पुस्तक तुमच्या नावावर असले, की तुम्ही ते तसे लेखक बनता. रंग्याचा विनोद हा अत्यंत तिरकस, पण कुणालाही न दुखावणारा आणि त्याची असामान्य हुशारी ठायीठायी दाखविणारा असतो. त्याची नाटकं, एकांकिका त्याच्या मालिका हे वारंवार सिद्ध करीत आल्या आहेत. साहित्याच्या माफिया टोळ्या आहेत त्यातल्या कुठल्याही टोळीत तो सहभागी नाही, म्हणूनच त्याला आज जितकी मान्यता मिळायला हवी, तितकी मिळालेली नाही. त्याच्या मालिका आणि नाटकं लोकप्रियतेच्या लाटेवर असून, आज एक लेखक म्हणून त्याला लेखणीनंच नव्हे तर चेहऱ्यानं ओळखतात, हे माहीत असून मी हे विधान करतोय, कारण आपण ‘लेखक’ आहोत ‘लेखक’! असा आविर्भाव त्याच्याकडे नाही. जाणिवा, नेणिवा, मांदियाळी वगैरे शब्द न वापरता तो फार उत्तम मांडत आला आहे. फार पूर्वी त्यानं काही मित्रांसोबत मिळून ‘कट्टा’ नावाचं एक अनियतकालिक प्रकाशित केलं होतं. एका अंकानंतर सहा महिन्यांनी दुसरा अंक, तर तिसरा लगेच त्याच दिवशी काढायचा हे सुचायलाच एक वेगळी वृत्ती लागते. जी आज महाराष्ट्रात उरली नाही. पूर्वी ललित मासिक जसं होतं त्या तोडीचा ‘कट्टा’ होता. आता साहित्यावर काही लिहिण्यासारखं उरलं नाही, कारण सर्वसामान्य लोकांचा त्यातला रस उडाला आहे. पण, जर ‘ठणठणपाळ’सारखं सदर आज लिहायचं झालं, तर माझ्या दृष्टीनं रंगा हा एकमेव आहे, जो ते लिहू शकेल, कारण असूया हा गुण(?) त्याच्यात नाही. या पूर्ण लेखात मी रंगाच्या साहित्यिक कर्तृत्वाचा तपशील दिला नाही, कारण तो तुम्ही शोधून काढा, आज विनोदाची गरज आपल्याला आहे.थोडक्यात सांगायचं, तर मी पाहिलेल्या, शब्द लिहताना अत्यंत वेदना होत आहेत पण तरी लिहितो, मला ‘भावलेल्या’ काही अत्यंत हुषार व्यक्तींपैकी रंगा गोडबोले आहे हे निर्विवाद. (यावर वाद करायला अनेक लोक उत्सुक असतील; पण माझं आधीच ठरलेलं आहे त्यात बदल होणार नाही. धन्यवाद!)