शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

माणुसकीच्या गावात

By admin | Updated: February 28, 2017 23:54 IST

खळेगाव या छोट्याशा गावाने अनाथालयासाठी प्रत्येक घरातून एक रुपया आणि थोडे-थोडे धान्य जमा केले.

खळेगाव या छोट्याशा गावाने अनाथालयासाठी प्रत्येक घरातून एक रुपया आणि थोडे-थोडे धान्य जमा केले. प्रत्येक हाताने दिलेला रुपया आणि प्रत्येक उंबरठ्यावरून किमान मूठभर मिळालेले धान्य हेच त्याचे मूल्य. ते पैशांत थोडेच मोजता येणार?ओंकार म्हणतो, मला पोलीस व्हायचंय... पायल म्हणते, मला डॉक्टर होऊन आजारी लोकांना बरं करायचं आहे... शुभम म्हणतो, मिलिट्रीमध्ये जाऊन देशाची सेवा करायची आहे... ही स्वप्ने आहेत सहारा अनाथालय परिवारातील मुलांची. चिमुकल्यांचे कुठलेही स्वप्न पूर्ण करण्याचे बळ त्यांना त्यांचे आई-बाप देतात. कुटुंबीय देत असतात. यांना तर आई ठाऊक नाही अन् बापही माहीत नाही. मग त्यांच्या स्वप्नांचे काय? बीड जिल्ह्यातील संतोष आणि प्रीती गर्जे या दांपत्याने अशा ८५ बालकांच्या पंखांना बळ दिले. या बालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच १३ वर्षांपासून हे दांपत्य धडपडत आहे. गेवराई तालुक्यातील ‘बालग्राम’ हे माणुसकीचे गाव गेल्या आठवड्यात जवळून अनुभवता आले. बीड जिल्ह्यातील पाटसरा या खेड्यातील गरीब मजूर ऊसतोड शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या संतोषला मोठ्या बहिणीचा बाळंतपणात झालेला मृत्यू अस्वस्थ करून गेला. तिच्या लहान मुलीचा सांभाळ मी करेन. पण इतरांचे काय? बहिणीच्या मुलीवर अचानक कोसळले तसे आभाळ इतर कोणावर कोसळू नये, त्यांच्या आयुष्यात पोरकेपणा येऊ नये म्हणून वयाच्या १९व्या वर्षीच म्हणजे २००४ साली संतोषने सहारा परिवाराची सुरुवात केली. समाजातील अनाथ, निराधार निराश्रित, बेघर, वंचित, उपेक्षित, पीडित, गरीब मुलांची अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षण ही जबाबदारी घेतानाच त्यांचे पुनवर्सन करण्याची जबाबदारी संतोषने उचलली. गेवराईपासून ३ कि.मी. अंतरावर तीन एकराच्या कॅम्पसमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात हे अनाथालय वसले आहे. या परिवारात वय वर्षे तीनपासून १८ वर्षांपर्यंतची मुले राहतात आणि खासगी शाळेत शिक्षण घेतात.‘हम दो, हमारे दो’च्या या जमान्यात ८५ मुलांचा सांभाळ करणे तसे कठीणच. संतोष ते करतो. तो म्हणतो, यांना घडविताना आम्हाला एक हात तुमचा लागणार आहे. भविष्याची स्वप्न दाखविताना तुमची दूरदृष्टी मागणार आहे. यांच्या पंखांना बळ देण्यापूर्वी त्यांना तुमची भरारी दाखविणार आहे. सुजाण नागरिक घडविताना आम्ही तुमचाच आदर्श पुढे ठेवणार आहोत. आम्ही स्वप्न बघत आहोत एका सुसंस्कृत समाजाचे, जिथे आयुष्य ओझं वाटणार नाही. जगण्याचा धाक वाटणार नाही. जीवन असेल एक आनंददायी प्रवास. या प्रवासात अनाथ लेकरांच्या जीवनाला आकार देण्यासाठी आम्हाला आपली साथ हवी आहे... संतोषच्या या हाकेला साथ कोणी दिली? गेवराईपासून पुणे-मुंबईपर्यंत ती अनेकांनी दिली. म्हणूनच बालग्राममध्ये हा ८५ लेकरांचा संसार सुरू आहे. तो आनंदात सुरू आहे असे नक्कीच म्हणता येणार नाही. अनेक गोष्टी आहेत ज्या करता येत नाहीत. अनाथालयातील ५० मुलींसाठी वेगळी इमारत बांधायची आहे. संगणक कक्ष, प्रयोगशाळा, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, अन्नपूर्णा सदन, अतिथी भवन, असे अनेक प्रकल्प उभारायचे आहेत. गरज आहे ती मदतीचे अनेक हात पुढे येण्याची. हीच जाणीव ठेवून गेवराई तालुक्यातील खळेगाव या छोट्याशा गावाने गेल्या आठवड्यात प्रत्येक घरातून एक रुपया आणि थोडे-थोडे धान्य जमा केले. तब्बल ३ हजार रुपये आणि चार क्विंटल धान्य जमा झाले. राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या कार्यक्रमात ही मदत संतोषच्या हवाली करण्यात आली. ही मदत फार मोठी वाटणार नाही कदाचित. गावातील प्रत्येक हाताने दिलेला एक रुपया आणि प्रत्येक उंबरठ्यावरून किमान मूठभर मिळालेले धान्य हेच त्याचे मूल्य. ते पैशांत थोडेच मोजता येणार? इतरांना देण्यासाठी स्वत:कडे खूप असावे लागते, असे अजिबात नाही. तुमच्याकडे काय आहे, यापेक्षा काय देण्याची दानत आहे, यावरच सारे काही अवलंबून असते. म्हणूनच तर खळेगावसारख्या सर्वसामान्य गावाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणुसकीच्या अशा अनेक गावांची आज गरज आहे. जशी ती गेवराईच्या संतोषला आहे तशी ती अनेक अनाथालयांना आहे. या माध्यमातून अनाथालयांप्रति आणि त्यात राहणाऱ्या बालकांप्रति गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेली ही भावना खूप महत्त्वाची आहे. माणूस माणसांपासून दूर जात असलेल्या या जगात सामाजिक स्वास्थ्यासाठी हेच तर हवे आहे.- सुधीर महाजन