शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही अन् वेताळ पुन्हा झाडावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:23 IST

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडावर चढला. फांदीवर लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे स्मशानाच्या दिशेने मौनात चालू लागला. प्रेतात बसलेला वेताळ पुन्हा जागा झाला.

- नंदकिशोर पाटीलविक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडावर चढला. फांदीवर लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे स्मशानाच्या दिशेने मौनात चालू लागला. प्रेतात बसलेला वेताळ पुन्हा जागा झाला. विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला.‘राजा! तुझ्यासारख्या राजांना कोणी बोललं तर त्यास किती महत्व द्यायचं, याचं तारतम्य नसतं. सुखाने विश्रांती घ्यायची सोडून तू नको ते कष्ट कशाला उपसत बसला आहेस ? वारसाहक्कानं थोरल्या बंधूस गादी मिळाल्यामुळे तू चिडून राजवाडा सोडलास आणि नवं राज्य स्थापन करण्याचे स्वप्न उराशी बाळगून नवनिर्माणाचा ध्यास घेतलास. पण तुला सांगू? नुसती स्वप्नं पाहून नवनिर्माण होत नसतं. त्यासाठी लवकर उठायला हवं. पण, तुझ्यासाठी तर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस! खबरे हाताशी बाळगले म्हणून बखर लिहिली जाईलच असे नाही. राजा, प्रजेला नमस्कार लागतो, तसा चमत्कारही लागतो. तूझे तर दर्शनच दुर्लभ! तुझे राजगृह कसले, गुहाच ती. कायम बंद. दरबारी दाराशीच ताटकळून निघून जातात. नुसते फतवे काढून नवनिर्माण कसं होणार? कोणतंही सैन्य भावनेवर नव्हे, तर पोटावर चालतं. किती दिवस तू नुसतंच खळ्ळखट्याकऽऽऽ करत राहाणार?तो बघ, न बोलता सगळं करून निघतो. कोणाला थांगपत्ता लागू देत नाही. राज्यकारभार करावा तर त्यानेच. तुझी टाळीही म्हणे त्याने बेमालुमपणे टाळली. तू फक्त बोलतोस आणि पुन्हा आपल्या गुहेत शिरतोस. आणखी किती लढाया हरणार आहेस? किमान तहात जिंकला असतास तरी, सैन्यांची आशा जिंवत राहिली असती.पण तू तेही केलं नाहीस. आपले सरदारच बिभीषण निघाले म्हणून आता कसला शोक करतोस? आजकाल दाम हाच राम!वेताळाच्या या भडिमाराने संतप्त झालेला राजा उद्गारला-‘यापुढे फक्त गालावर टाळी!’...अशा तºहेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला!