शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही अन् वेताळ पुन्हा झाडावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:23 IST

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडावर चढला. फांदीवर लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे स्मशानाच्या दिशेने मौनात चालू लागला. प्रेतात बसलेला वेताळ पुन्हा जागा झाला.

- नंदकिशोर पाटीलविक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडावर चढला. फांदीवर लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे स्मशानाच्या दिशेने मौनात चालू लागला. प्रेतात बसलेला वेताळ पुन्हा जागा झाला. विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला.‘राजा! तुझ्यासारख्या राजांना कोणी बोललं तर त्यास किती महत्व द्यायचं, याचं तारतम्य नसतं. सुखाने विश्रांती घ्यायची सोडून तू नको ते कष्ट कशाला उपसत बसला आहेस ? वारसाहक्कानं थोरल्या बंधूस गादी मिळाल्यामुळे तू चिडून राजवाडा सोडलास आणि नवं राज्य स्थापन करण्याचे स्वप्न उराशी बाळगून नवनिर्माणाचा ध्यास घेतलास. पण तुला सांगू? नुसती स्वप्नं पाहून नवनिर्माण होत नसतं. त्यासाठी लवकर उठायला हवं. पण, तुझ्यासाठी तर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस! खबरे हाताशी बाळगले म्हणून बखर लिहिली जाईलच असे नाही. राजा, प्रजेला नमस्कार लागतो, तसा चमत्कारही लागतो. तूझे तर दर्शनच दुर्लभ! तुझे राजगृह कसले, गुहाच ती. कायम बंद. दरबारी दाराशीच ताटकळून निघून जातात. नुसते फतवे काढून नवनिर्माण कसं होणार? कोणतंही सैन्य भावनेवर नव्हे, तर पोटावर चालतं. किती दिवस तू नुसतंच खळ्ळखट्याकऽऽऽ करत राहाणार?तो बघ, न बोलता सगळं करून निघतो. कोणाला थांगपत्ता लागू देत नाही. राज्यकारभार करावा तर त्यानेच. तुझी टाळीही म्हणे त्याने बेमालुमपणे टाळली. तू फक्त बोलतोस आणि पुन्हा आपल्या गुहेत शिरतोस. आणखी किती लढाया हरणार आहेस? किमान तहात जिंकला असतास तरी, सैन्यांची आशा जिंवत राहिली असती.पण तू तेही केलं नाहीस. आपले सरदारच बिभीषण निघाले म्हणून आता कसला शोक करतोस? आजकाल दाम हाच राम!वेताळाच्या या भडिमाराने संतप्त झालेला राजा उद्गारला-‘यापुढे फक्त गालावर टाळी!’...अशा तºहेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला!