शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...आस विक्रमाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 15:31 IST

एखादा विक्रम करायचा म्हटला तर कल्पना सुचण्यापासून तो अंमलात येईपर्यंतचा मोठा प्रवास असतो. विक्रम एकटी व्यक्ती करीत असो की, सामूहिक रीत्या करावयाचा असो, त्यासाठी नियोजनबध्द, शिस्तबध्द कृतीकार्यक्रम लागतोच. त्यासाठी अनेकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लागतेच. तसेच दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावाद आणि ध्येयवेडेपणा लागतो, त्याशिवाय विक्रम घडत नाही.

- मिलिंद कुलकर्णी

एखादा विक्रम करायचा म्हटला तर कल्पना सुचण्यापासून तो अंमलात येईपर्यंतचा मोठा प्रवास असतो. विक्रम एकटी व्यक्ती करीत असो की, सामूहिक रीत्या करावयाचा असो, त्यासाठी नियोजनबध्द, शिस्तबध्द कृतीकार्यक्रम लागतोच. त्यासाठी अनेकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लागतेच. तसेच दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावाद आणि ध्येयवेडेपणा लागतो, त्याशिवाय विक्रम घडत नाही.जळगाव शहर अशाच दोन विक्रमांची अनुभूति घेणार आहे. पहिला विक्रम आहे, प्लॅस्टिकच्या एक लाख बाटल्यांपासून गणपतीचे म्यूरल साकारण्याचा...खान्देश कॉलेज आॅफ एज्युकेशन या संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकलव्य क्रीडा संकुलाच्या दीड एकर मैदानावर ५० विद्यार्थी ३६ तासांमध्ये हा विक्रम साकारत आहेत. ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून म्युरल उभारणीस सुरुवात झाली आहे. तीन दिवसांपासून विद्यार्थी या रिकाम्या बाटल्यांमध्ये रंगीत पाणी भरत होते. पर्यावरण संवर्धनाला हातभार म्हणून हाती घेतलेल्या या उपक्रमाची दखल दिल्लीच्या इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् व फरिदाबाद येथील एशिया बुक आॅफ रेकॉर्डस् यांनी घेतली आहे. १२ रोजी हा उपक्रम यशस्वी झाला तर त्याची विक्रम म्हणून नोंद होईल. जळगावचे नाव जागतिक पातळीवर पोहोचेल.असाच दुसरा विक्रम साकारणार आहे, २१ डिसेंबर रोजी. नवनवीन उपक्रम हाती घेणाऱ्या मराठी प्रतिष्ठानने या मातीचे ऋण फेडण्यासाठी जळगावचा अभिमान आणि ओळख असलेल्या वांग्याचे भरीत जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांची मदत घेतली आहे. तब्बल २५०० किलो भरीत बनविण्याचा विक्रम गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे.भरीताच्या वांग्यांसाठी प्रसिध्द असलेल्या बामणोद (ता.यावल) येथून ३२०० किलो वांगे आणले जातील. भरीत बनविण्यासाठी लागणारी सामुग्रीसुध्दा निश्चित झाली आहे. १२० किलो शेंगदाणा तेल, १०० किलो मिरची, ५० किलो लसूण, २० किलो शेंगदाणे, ५ किलो जिरे, १०० किलो कोथिंबीर, २५ किलो जाड मीठ असे जिन्नस लागेल.जळगावातील मध्यवर्ती मैदान असलेल्या सागर पार्कवर हा विक्रम साकारणार आहे. त्यासाठी ४००० किलो वजन पेलणारी चूल बनविण्यात येणार आहे. ४५० किलो वजन, १० बाय १० फूट आकार व तीन फूट खोलीची कढई बनविण्याचे काम कोल्हापुरात सुरु झाले आहे. ११ फूट लांबीचा सराटा असेल.सकाळी ५ वाजेपासून वांगे भाजायला सुरुवात होईल. त्यासाठी ६ ट्रॅक्टर तूरकाठ्या (तुरीच्या काड्या), २ ट्रॅक्टर डाळींबाच्या काड्या, ५ ट्रॅक्टर सरपण लागेल.भरीत बनविण्यातील स्थानिक तज्ज्ञ देवराम भोळे, दत्तात्रय चौधरी यांचे सहकार्य यावेळी घेतले जाणार आहे. त्याशिवाय ६० महिला, ४० पुरुष, २० पर्यवेक्षक आणि दोन मुख्य निरीक्षक असा लवाजमा सोबत राहील.केळी आणि भरीताचे वांगे ही जळगावची ओळख आहे. परंतु दोघांच्या नशिबी भोग आहेत. केळी हे फळ आहे. पण शासकीय भाषेत त्याला फळाचा दर्जा मिळत नाही. कारण आंबा किंवा इतर फळांची झाडे असतात. त्यांना दरवर्षी फळे येतात. तर केळीचे झाड हे वर्ष -दोन वर्षांनी नव्याने लागवड करुन उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शासकीय योजनांचे लाभ केळी उत्पादक शेतकºयाला फारसे मिळत नाही. केळी हे नाशवंत फळ असल्याने त्याच्या निर्यातीवर बंधने आहेत. प्रक्रिया उद्योगाविषयी शासकीय व सहकार पातळीवर मोठी उदासीनता आहे.तीच स्थिती भरीताची आहे. केवळ हिवाळ्यातील तीन महिने भरीताचा हंगाम असतो. त्याकाळात बाहेरील पाहुणे खास जळगावात येतात. हुरडा पार्टीसारख्या भरीताच्या पार्टी शेत, मळ्यात होतात. वर्षभर वांग्यांचे उत्पादन आणि त्याची परराज्य व परराष्टÑात निर्यात होण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘बेंगन भरता’ हा मेनू असतो, मात्र ती वांगी भरीताची नसतात. भाज्यांची असतात. हे शेफ विष्णू मनोहर यांनी ओळखले आणि विश्वविक्रमाच्या माध्यमातून जळगावच्या भरीताची ओळख जागतिक पातळीवर करुन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव