शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

विदर्भाचा ‘विजय’ कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:25 IST

तब्बल ६० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रणजी करंडकावर आपले नाव कोरत विदर्भ संघाने इतिहास रचला आणि ‘सोशल मीडिया’वर एक नवी चर्चा सुरू झाली. हा विजय वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे एक पाऊल ठरेल, असा विश्वास विदर्भवाद्यांना वाटू लागला आहे.

तब्बल ६० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रणजी करंडकावर आपले नाव कोरत विदर्भ संघाने इतिहास रचला आणि ‘सोशल मीडिया’वर एक नवी चर्चा सुरू झाली. हा विजय वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे एक पाऊल ठरेल, असा विश्वास विदर्भवाद्यांना वाटू लागला आहे. मात्र केवळ विश्वास वाटणे आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. केवळ ‘सोशल मीडिया’वर वेगळ्या विदर्भाचे समर्थन करत आंदोलनाची भाषा करणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार ठरतो. विदर्भाच्या क्रिकेट संघाने मिळविलेला विजय हा सांघिक प्रयत्नांचा आहे. त्यामागे कठोर परिश्रम व अनेक वर्षांची तपस्या आहे. या स्पर्धेत तर कामगिरीतील सातत्यामुळेच यशाचा टप्पा गाठता आला. वेगळ्या विदर्भ राज्यासाठीचे आंदोलनदेखील तसे जुनेच आहे. मात्र वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे आंदोलनदेखील बदलत गेले. कधीकाळी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी विदर्भाच्या आंदोलनाला नेतृत्व दिले. मात्र काळाच्या ओघात आंदोलनातील सातत्य हरवत गेले. मधली काही वर्षे तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अक्षरश: थंडबस्त्यात पडला होता. नाही म्हणायला प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही हौशी कार्यकर्ते ‘जय विदर्भ’ म्हणत पत्रकबाजी करायचे. मागील लोकसभा निवडणुकांनंतर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा खºया अर्थाने परत चर्चेत आला. मात्र अ‍ॅड.श्रीहरी अणे वगळता या आंदोलनाला सक्षम नेतृत्व लाभू शकले नाही. नाही म्हटले तरी आता आ.आशिष देशमुख या आंदोलनाला राजकीय नेतृत्व देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नेतृत्वामागे जनतेचे समर्थन असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जनतेच्या भरवशावरच लोकशाहीत विजय मिळविणे शक्य आहे. विदर्भाच्या क्रिकेट संघाच्या मागे जनतेचे आशीर्वाद होते, भावना जुळल्या होत्या. या खेळाडूंनी जनतेमध्ये विजयाचा विश्वास निर्माण केला होता. या संघाकडून विदर्भवाद्यांनीदेखील शिकवण घेण्याची आवश्यकता आहे. केवळ गप्पा हाकून किंवा वर्तमानपत्रांमध्ये छायाचित्र छापून विजय मिळू शकत नाही. विजय मिळविण्यासाठी तप लागते, घाम गाळावा लागतो. विदर्भवाद्यांनी ‘एअर कन्डिशन्ड’ आंदोलनाची तºहा सोडून जनतेमध्ये जाऊन वेगळ््या विदर्भासाठी समर्थन जुटविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यात नियोजन आणि सातत्य अपेक्षित आहे. जर कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे घाम गाळला तरच जनतेमध्ये विश्वास निर्माण होईल व वेगळ्या विदर्भ राज्याची स्वप्नपूर्ती होऊ शकेल. जर असे झाले तर एक दिवस विदर्भ राज्याची चमू रणजी करंडक उंचावेल आणि तो सर्वार्थाने दुग्धशर्करा योग ठरेल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या