शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

हा विजय चमत्कार निश्चित नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 13:23 IST

भाजप पुन्हा सत्तारुढ होण्याचे संकेत मिळाले आणि निकालानंतर शिक्कामोर्तब झाले

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आटोपला. दीड-दोन महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप, टीका असा सगळा धुराळा सुरु होता. एक्झीट पोल जाहीर झाल्यानंतर मोदी आणि भाजप पुन्हा सत्तारुढ होण्याचे संकेत मिळाले आणि निकालानंतर शिक्कामोर्तब झाले. भल्या भल्यांचे अंदाज चुकले. राजकीय पंडितांना भारतीय मानसिकतेचे अचूक आकलन करता आले नाही. निवडणूक आयोग, सक्तवसुली संचलनालय, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा सत्ताधारी भाजपने दुरुपयोग केल्याचा आरोप झाला. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी-शहा या जोडीने टीकेकडे कधी दुर्लक्ष केले तर कधी त्याचे भांडवल केले. यासोबतच सूत्रबध्द नियोजन करुन राज्यनिहाय, मतदानाच्या टप्पेनिहाय रणनीती आखत भाजपला यश मिळवून दिले. मोदी आणि भाजप केंद्रस्थानी राहतील, अशीच व्यूहरचना आखली आणि विरोधक आपसूक जाळ्यात अडकले. प्रचार आणि प्रसिध्दीमध्ये मोदी आणि भाजप प्रभावशाली राहिले. पत्रकार परिषदेतील मौन, बद्रिनाथ-केदारनाथचे दर्शन, हिमालयाच्या गुहेतील ध्यानधारणा, कलकत्यातील प्रचारसभा, वाराणसीतील रोड शो अशा प्रत्येक प्रसंगातून मोदी राष्टÑीय प्रसारमाध्यमांचे केंद्रबिंदू राहिले. मग ती प्रसिध्दी सकारात्मक असो की, नकारात्मक. त्याचा फायदा भाजपला निश्चित झाला.२०१४ मध्ये लाट होती, आता तर त्सुनामी आली असा सूर आता माध्यमांमध्ये उमटत आहे. पण हा चमत्कार निश्चित नाही, हे लक्षात घ्यायला आहे. रा.स्व.संघ आणि भाजपने प्रयत्नपूर्वक केलेल्या कार्याची ही पावती आहे. संघटनात्मक कार्य, विचारधारा, धाडसी निर्णय, सर्वसमावेशकता या गुणांमुळे दोन जागांवरुन ३०३ हा पल्ला भाजपने गाठला आहे.देशाचे जाऊ द्या, आपण खान्देशचे उदाहरण घेऊ. जळगाव जिल्हा हा गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्यापासून तर उन्मेष पाटील यांच्यापर्यंत भाजपने अनेकदा प्रयोग केले आणि ते यशस्वी झाले. भाकरी फिरवत राहिल्याने यशाचे सातत्य कायम राहिले. एकनाथराव खडसे, गिरीश महाजन यांनी नेतृत्व केले आणि पक्षाला यश मिळवून दिले. जळगाव मतदारसंघातील उमेदवारी नाट्याची चर्चा झाली. परंतु, महाजन यांनी आपत्ती व्यवस्थापन इतक्या उत्कृष्टपणे केले की, उन्मेष पाटील यांनी ए.टी.पाटील यांचा मताधिक्याचा विक्रम मोडीत काढला.नंदुरबारात डॉ.हीना गावीत यांच्यारुपाने भाजपचा खासदार गेल्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आला. काँग्रेसने भाकरी फिरवली, भाजपमध्ये बंडखोरी झाली, या परिस्थितीतही डॉ.गावीत या दुसऱ्यांदा निवडून आल्या.धुळ्यात उत्तमराव पाटील हे जनसंघातर्फे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. रामदास गावीत, प्रतापराव सोनवणे हे त्यानंतर खासदार झाले. डॉ.सुभाष भामरे यांच्यापुढे आव्हाने होतीच. स्वपक्षीय आमदार अनिल गोटे यांचे बंड आणि रोजचा टीकेचा भडीमार, मालेगावातील सामाजिक गणित या आव्हानांवर मात करीत भामरेंनी चांगला विजय मिळविला.विपरीत परिस्थितीतून मार्ग काढण्याचे तंत्र आता भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांना अवगत झाले आहे. इतर पक्षांमधील सक्षम उमेदवारांना तिकीटे देऊन निवडून आणणे, युतीतील घटक पक्षांची मदत घेण्यासोबतच प्रतिस्पर्धी पक्षांमधील नाराज, असंतुष्ट मंडळी, गटांची मदत ‘अदृश्य’रुपाने घेणे हे भाजप लीलया करु लागला आहे. शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपण्यापूर्वी दिल्लीतील भाजप मुख्यालयात राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या संघटनात्मक कार्याची माहिती दिली, तो खरा भाजपचा आत्मा आहे. सत्तेचा उपयोग हा पक्ष, संघटना विस्तारासाठी करण्यात भाजप अग्रेसर आहे. त्यामुळे नित्यनवीन यशोशिखर हा पक्ष गाठत आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष, संघटना महत्त्वाची या संघविचाराची दिशा जाणून घेत या पक्षाची वाटचाल सुरु असल्याने विक्रमांची नोंद या पक्षाच्या नावावर होत आहे. हा निश्चितच चमत्कार नाही. हे तपाचे फळ आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Jalgaonजळगाव