शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
4
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
5
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
6
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
7
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
8
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
9
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
10
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
11
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
12
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
13
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
14
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
15
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
16
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
17
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
18
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
19
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
20
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख

कूटनीतीचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 05:32 IST

अमेरिका, भारत आणि अन्य देशांच्या दबावामुळे पाकिस्तानने हाफिजच्या शिक्षेचे नाटक पार पाडल्याची अटकळ बांधली जात आहे. तरीही हाफिजच्या अटकेपासून शिक्षेपर्यंतची प्रक्रिया पार पाडण्यासाठी भारताला सायास घ्यावे लागले हे नाकारता येणार नाही.

मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याचा सूत्रधार सजात उद दवा संघटनेचा सर्वेसर्वा हाफिज सईद आणि त्याचा सहकारी झफर इक्बाल यांना दहशतवादाशी संबंधित दोन खटल्यांत लाहोरच्या विशेष न्यायालयाने नुकताच साडेपाच वर्षांचा तुरुंगवास आणि १५ हजार रूपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. पाकमधील पंजाब पोलिसांनी हाफिजविरोधात मनीलाँड्रिंग व दहशतवादी कारवायांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हाफिज तसेच त्याच्या संघटनेविरोधात पाकिस्तानात २३ वेगवेगळे खटले दाखल आहेत.

पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात भारत गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या आघाड्यांवर संयमाने लढत आहे. शेकडो दहशतवादी संघटना भारताच्या सीमा पोखरून घुसखोरी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यात यशस्वी झालेल्या दहशतवादी संघटना भारतात आपल्या हस्तकांमार्फत घातपात घडवून आणत आहेत. २००८ साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा त्यातील एक मोठा हादरा. त्या हल्ल्यात मुंबई पोलिसांच्या हाती जिवंत सापडलेल्या अजमल कसाब याला फासावर चढवण्यासाठी मुंबई पोलिसांपासून केंद्र सरकारला मोठी लढाई लढावी लागली होती. घातपात घडवणाऱ्या दहशतवाद्यांना कोणताही विधिनिषेध नसतो तर भारतातील तपासयंत्रणांना मात्र कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांच्याशी दोन हात करायचे असतात. मुंबईवरील हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी अथक परिश्रम घेत केलेल्या तपासाच्या आधारे भारताने आपली बाजू साक्षी-पुराव्यांसह जगासमोर मांडली. परिणामी गेल्या जुलै महिन्यात पाकिस्तानातील लाहोरमध्ये पाकच्या दहशतवादविरोधी पथकाने हाफिजला बेड्या ठोकल्या. हाफिजला झालेली अटक म्हणजे दहशतवादाविरोधात भारताने जागतिक पातळीवर निर्माण केलेल्या दबावाचे यश मानले गेले. मात्र पाकिस्तानचे दुटप्पी धोरण हाही भारताच्या डोकेदुखीचा भाग आहे. पाकिस्तान स्पष्टपणे अतिरेकीविरोधी भूमिका घेत नसून प्रकरण गळ्याशी आल्यावर तोंडदेखली कारवाई करीत असल्याचेही दरवेळी दिसून येते. कारण हाफिजला अटक झाली त्यानंतर काही दिवसांतच पंतप्रधान इम्रान खान यांचा अमेरिकेचा दौरा होणार होता. त्या दौºयाला अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी त्याला अटक करण्यात आली होती.

अवघ्या दोन महिन्यांतच ही शंका पाकिस्तानने खरी ठरवली. हाफिजविरोधात टेरर फंडिंगचे प्रकरण सुरू असतानाच, पाकिस्तानने त्याच्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली. खर्चासाठी हाफिजला बँक खात्याचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडे केली. ती विनंती मान्यही करण्यात आली. पाकिस्तान दहशतवादी संघटनांना कुुठल्या मर्यादेपर्यंत पाठीशी घालते, हे आता लपून राहिलेले नाही. दहशतवादांना पायबंद घालण्याचा आव पाकिस्तान आणत असले तरी त्यामागे स्वत:ची कातडी वाचवण्याचाच प्रयत्न अधिक असतो. हाफिजला झालेली शिक्षा हाही त्यातीलच एक प्रकार असावा. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लवकरच फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सची बैठक होणार आहे. त्या बैठकीत दहशतवाद्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप असलेल्या पाकिस्तानला काळ्या यादीत समावेश होण्यापासून वाचण्यासाठी आपली बाजू मांडावयाची आहे. गेल्या वर्षी पाकचा करड्या यादीत (ग्रे लिस्ट) समावेश करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका, भारत आणि अन्य देशांचा दबाव, तसेच आर्थिक निर्बंध लादले जाण्याच्या शक्यतेने पाकिस्तानने हाफिज शिक्षेचे नाटक पार पाडल्याची अटकळ बांधली जात आहे. तरीही हाफिजच्या अटकेपासून शिक्षेपर्यंतची प्रक्रिया पार पाडण्यासाठी भारताची कूटनीती कामी आली, हे नाकारता येणार नाही. तपास यंत्रणा देशात घातपात रोखण्यासाठी झुंजत असताना सरकारला दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद तोडण्याची व्यूहरचना कौशल्याने आखावी लागणार आहे.

 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तान