शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

राजकारणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2016 02:28 IST

हैदराबाद विद्यापीठाच्या अन्यायकारक वर्तणुकीचा निषेध म्हणून ज्याने आपणहूनच स्वत:चे प्राण त्यागले, (अर्थात त्याने आपल्या मृत्युपूर्व निवेदनात तसे स्पष्ट म्हटले

हैदराबाद विद्यापीठाच्या अन्यायकारक वर्तणुकीचा निषेध म्हणून ज्याने आपणहूनच स्वत:चे प्राण त्यागले, (अर्थात त्याने आपल्या मृत्युपूर्व निवेदनात तसे स्पष्ट म्हटले नव्हते) त्याच रोहित वेमुला या बुद्धिमान विद्यार्थ्याचा आता दुसऱ्यांदा राजकीय बळीदेखील घेतला जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. डाव्या विचारसरणीचा रोहित विद्यापीठातील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा नेता होता. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर लटकविण्याच्या कृतीचा या संघटनेने निषेध केला म्हणून संघप्रणीत अभाविप या विद्यार्थी संघटनेच्या मागणीवरून रोहितसह सहा विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या वसतिगृहातून गेल्या जुलैमध्ये हकालपट्टी केली गेली व रोहितला मिळणारी दरमहा पंचवीस हजारांची शिष्यवृत्तीदेखील गोठवून ठेवली गेली. याशिवाय अभाविपनेच दिल्ली विद्यापीठात ‘मुझफ्फरनगर बाकी है’ या लघुपटाच्या प्रदर्शनावर जो हल्ला चढविला त्याचाही रोहितने निषेध केला होता. परंतु केवळ तितकेच नव्हे तर अभाविपच्याच एका कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ला प्रकरणीही रोहितलाच जबाबदार धरले गेले होते. मुळात याकूब मेमन याला फासावर लटकविण्याच्या कृतीच्या विरोधात अनेकानी विरोधी सूर लावला होता. पण तोच सूर लावला म्हणून रोहित मात्र देशद्रोही ठरविला गेला. तरीही इथपर्यंतचा सारा प्रकार म्हणजे विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला कोणतेही सबळ कारण आणि ठोस पुरावे नसताना, भाजपाचे एक मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दबाव टाकला म्हणून कारवाई केली गेली, जी नि:संशय अन्यायकारक होती. या अन्यायाचा सर्व स्तरांमधून निषेध केला जाणे म्हणूनच समर्थनीयही होते. पण रोहित जन्माने दलित होता म्हणूनच त्याच्यावर अन्याय केला गेला असा सूर सर्व दिशांनी आळवायला प्रारंभ झाला. याचा अर्थ रोहित जन्माने सवर्ण असता तर त्याच्यावर झालेला अन्याय समर्थनीय ठरला असता! साहजिकच सारे लक्ष तो दलित असण्यावरच केन्द्रित केले गेले. याचा होऊ नये तोच परिणाम होऊन मग रोहितची मुळे शोधण्याचा प्रयत्न काहींनी सुरू केला. तो दलित नसल्याचे सर्वप्रथम केन्द्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी जाहीर केले. त्यावरून व्हायचा तो गदारोळही झाला. आता काहींनी असेही शोधून काढले आहे की रोहित वेमुला वडार समाजात जन्मला होता आणि हा समाज आंध्र प्रदेशात म्हणे अन्य मागासवर्गात मोडतो. हे संशोधन ज्यांनी जाहीर केले त्यांच्या मते आता ‘तो वडार ठरला आहे, दलित नव्हे ना, मग बोलू नका’ असा तर होत नाही? मुळात दलित्वाची व्याख्या तरी कुणी केली आहे का आणि जर व्यक्ती वा विद्यार्थी दलित असेल तरच तिला किंवा त्याला मिळालेली हिणकस वर्तणूक अन्याय आणि एरवी ती न्याय ठरत असते?