शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

काँग्रेसच्या वर्मावर घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:41 IST

ठाण्यातील काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पूर्णेकर आणि संजय चौपाने यांचे एकाच अपघातात मागेपुढे झालेले मृत्यू दुर्दैवी तर आहेतच

ठाण्यातील काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पूर्णेकर आणि संजय चौपाने यांचे एकाच अपघातात मागेपुढे झालेले मृत्यू दुर्दैवी तर आहेतच पण ठाण्यातील काँग्रेसकरिता तर ही कधीही भरून न येणारी हानी आहे. औरंगाबाद येथे स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी सोहळा आटोपून हे दोघे एकाच मोटारीतून निघाले होते. एका मोटारसायकलस्वाराला वाचवताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला आणि ती रस्त्याचा दुभाजक ओलांडून पलीकडे गेली. तिकडून येत असलेल्या बसची या मोटारीला धडक बसून चौपाने जागीच गेले. पूर्णेकर यांची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अखेर संपली. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांची प्राणज्योत मालवावी हा विचित्र व दुर्दैवी योगायोग म्हणता येईल. राजकारण हेही कमालीच्या अस्थिरतेचे व पर्यायाने तणावाचे क्षेत्र आहे. वेगवेगळी व्यवधाने सांभाळताना अनेकदा तारांबळ उडते. अनेक नेते रात्री प्रवास करतात. विमानतळावर जाण्याकरिता पुरेसा वेळ हाती ठेवत नाहीत व मग चालकाला वाहन पिटाळायला भाग पाडतात. आतापर्यंत काही तरुण, उमद्या राजकीय नेत्यांना रस्ते अपघातात एक तर प्राण गमवावे लागले आहेत किंवा ते जायबंदी झाले आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मुंबईतील शिवसेनेचा गड काहीसा कमकुवत झाला असतानाही ठाण्यात शिवसेना मजबूत आहे. अशा वेळी काँग्रेस पक्षात राहून कायम विरोधी पक्षाची भूमिका सांभाळायची हे काम पूर्णेकर यांनी यशस्वीरीत्या केले होते. त्यामुळे ते ठाण्यातील काँग्रेसचा चेहरा होते. चौपाने हे अजातशत्रू होते. त्यांची पक्षनिष्ठा दृढ होती. पूर्णेकरांना समाजकारणाचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. स्व. आनंद दिघे यांच्याकडे त्यांचे भवितव्य वडिलांनी सोपवले होते. पूर्णेकर यांनी शिवसेनेत अल्पावधीत यश प्राप्त केले. मात्र ऐन मोक्याच्या वेळी निवडणूक लढण्याची संधी नाकारल्याने ते काँग्रेसमध्ये आले व पक्षाशी एकनिष्ठ राहिले. ठाण्यातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, खड्डे अशा अनेक समस्यांविरुद्ध चिकाटीने आंदोलन करून पूर्णेकरांनी स्वत:ची वेगळी छाप पाडली होती. रेती काढणे हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. त्यामध्ये लिलाव पद्धती लागू ेकेल्यावर राज्यात स्वपक्षाचे सरकार असूनही पूर्णेकरांनी संघर्ष करून सरकारला निर्णय बदलायला भाग पाडले. पूर्णेकर अनेक सामाजिक उपक्रम राबवून सतत लोकांमध्ये राहायचे. रक्तदानाच्या चळवळीचे ते कार्यकर्ते होते व त्यांनी पन्नासहून अधिक वेळा रक्तदान केले होते. ठाण्यातील काँग्रेस मुळात कमकुवत असताना दोन नेत्यांच्या मृत्यूमुळे काँग्रेसच्या वर्मावर घाव बसला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे नाही.