शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

‘वीर’ अन् सिंगही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:57 IST

शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी ही त्या शहरातील विकास प्राधिकरणाची असते.

शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी ही त्या शहरातील विकास प्राधिकरणाची असते. बाहेरच्या व्यक्तीने एखाद्या शहराचा फेरफटका मारला तर तेथील रस्ते, फूटपाथ, अतिक्रमण, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आदी बाबी पाहून त्याला तेथील विकास प्राधिकरण किती सक्षम आहे, याचा अंदाज येतो. शेवटी प्राधिकरण ही एक संस्था आहे. तीत काम करणारे अधिकारी- कर्मचारी सक्षम असतील तर ते प्राधिकरणही सक्षम होते. कोणताही अधिकारी एखाद्या शहरात नवा नवा आला की खूप कामाचा सपाटा लावतो. जसजसा वेळ निघत जातो तसा अधिकारी रुळतो व त्यालाही ‘चलता है’ची सवय लागते. नंतर रस्त्यावर फिरणारा अधिकारी आपली एसी केबीन सोडतच नाही. मात्र, नागपूर महापालिकेला मिळालेले आयुक्त वीरेंद्र सिंग यांची कार्यशैली व कामातील सातत्य सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांची निर्भीड शैली पहिल्या दिवसांपासून नागपूरकर अनुभवत आहेत. सिंग यांनी आल्याआल्या आपल्या प्रशासनाला शिस्तीची छडी दिली. लेटलतिफ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. कर्मचारी वठणीवर येताच सिंग शहरातील रस्त्यांवर उतरले. ज्या गल्लीत कदाचित नगरसेवक पोहचले नसतील तेथे ते स्वत: आपली टीम घेऊन पोहचत आहेत. आज पांढराबोडी तर उद्या नाईक तलाव, असा दौरा दररोजचा ठरलेलाच. शहरातील फूटपाथ, रस्त्यांवर पडलेले खड्डे असो की कुणी केलेले अतिक्रमण, सिंग स्वत: पाहणी करतात व त्वरित सुधारणा करण्याचे आदेश देतात. आपले आयुक्त दररोज शहरात फिरतात, ते कधीही आपल्या एरियात पोहचतील याचा धसका निर्ढावलेल्या झोन कर्मचाºयांनीही घेतला आहे. सफाई कर्मचारी दररोज रस्त्यावर दिसतात. झोन कार्यालयात कर्मचारी वेळेत कामावर पोहचतात. दुपारी चहाच्या टपºयांवर वेळ न घालवता आपल्या टेबलवर दिसतात. यामुळे प्रशासनाला एकप्रकारे गती मिळाली आहे. झोन कार्यालयातील प्रलंबित फाईलची संख्याही कमी झाली आहे. विशेष म्हणजे दूषित हेतूने काम करणाºया नगरसेवकांवरही वचक निर्माण झाला आहे. चुकीच्या कामासाठी आयुक्तांच्या कक्षात जाण्यापूर्वी नगरसेवकही चारदा विचार करतात. महापालिका आयुक्त अश्वीन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यावर सिंग आयुक्त म्हणून आले. पण सिंग यांचा ‘झेलुगिरी’न करण्याचा जुना रेकॉर्ड पाहता सत्ताधारी गटाचीही चिंता वाढली होती. सिंग यांना रुजू करून घेण्यात सरकारकडून झालेला विलंब बरेच काही सांगून गेला. ऐकलं ते खरं होतं, हेच आयुक्त सिंग यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. हा दरारा, कामाचा सपाटा, निर्भीड स्वभाव पुढेही असाच कायम राहोे, हीच अपेक्षा. कारण यातच नागपूरकरांचेही हित आहे. कारण तीन वर्षांनी अधिकारी तर बदली होऊन जातात पण त्याचे कामच त्यांची आठवण देत असते.