शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

खोऱ्यातील वणवा

By admin | Updated: April 24, 2017 00:19 IST

काश्मीर खोऱ्यात शासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दलांविरुद्धचा असंतोष पराकोटीला पोहोचला आहे. खोऱ्यात पेटलेल्या या वणव्याने आता

काश्मीर खोऱ्यात शासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दलांविरुद्धचा असंतोष पराकोटीला पोहोचला आहे. खोऱ्यात पेटलेल्या या वणव्याने आता तेथील विद्यार्थ्यांनाही आपल्या कवेत घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यानच्या संघर्षात येथील बेरोजगार तरुण जवानांवर दगडफेक करताना दिसत असत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालयीन विद्यार्थीही या दगडफेकीत सामील झाल्याचे चित्र समोर आले आहे. पुलवामा येथील महाविद्यालयात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईच्या विरोधात काश्मिरी विद्यार्थी रस्त्यावर आले असून, परिस्थिती आणखी चिघळली आहे. विद्यार्थ्यांकडून होणारी ही दगडफेक आणि स्वतंत्र काश्मीरची नारेबाजी धोक्याचा इशारा देणारी आहे. बहुधा येथील लोकांनीही एवढी अस्थिरता आणि वाईट दिवस यापूर्वी कधी बघितले नसावेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणी याला चकमकीत ठार मारण्यात आल्यानंतर खोऱ्यात जी अराजकता माजली त्यावर नियंत्रण मिळविण्यात जम्मू-काश्मीरचे सरकार आणि सुरक्षा दलालाही अपयश आले आहे. या आठ-दहा महिन्यांच्या काळात राज्यात उफाळलेल्या हिंसाचारात शंभरावर लोक मृत्युमुखी पडले असून, जवळपास १२ हजार लोक जखमी झाले आहेत. याशिवाय पॅलेट गनच्या माऱ्यात एक हजार लोकांनी आपली एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे. येथे नुकत्याच झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये केवळ ७.१४ टक्केच मतदान झाले. यावरून येथील लोकांच्या मनात खदखदणारा असंतोष आणि दहशत लक्षात यावी. सुरक्षा यंत्रणेची चिंता वाढविणारी आणखी एक बाब म्हणजे येथील तरुणांचा दहशतवादाकडील ओढा वाढत चालला आहे. गेल्या वर्षभरात २५० तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला असल्याचे समोर आले आहे. या परिस्थितीमुळे काश्मिरी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसते आहे. येथील लोकांच्या मनातील परकेपणाची भावना तीव्र झाल्याचे स्पष्ट दिसत असून, केवळ बळाच्या वापराने त्यांच्यातील ही अस्थिरता दूर होईल असे वाटत नाही.