शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खोऱ्यातील वणवा

By admin | Updated: April 24, 2017 00:19 IST

काश्मीर खोऱ्यात शासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दलांविरुद्धचा असंतोष पराकोटीला पोहोचला आहे. खोऱ्यात पेटलेल्या या वणव्याने आता

काश्मीर खोऱ्यात शासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दलांविरुद्धचा असंतोष पराकोटीला पोहोचला आहे. खोऱ्यात पेटलेल्या या वणव्याने आता तेथील विद्यार्थ्यांनाही आपल्या कवेत घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यानच्या संघर्षात येथील बेरोजगार तरुण जवानांवर दगडफेक करताना दिसत असत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालयीन विद्यार्थीही या दगडफेकीत सामील झाल्याचे चित्र समोर आले आहे. पुलवामा येथील महाविद्यालयात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईच्या विरोधात काश्मिरी विद्यार्थी रस्त्यावर आले असून, परिस्थिती आणखी चिघळली आहे. विद्यार्थ्यांकडून होणारी ही दगडफेक आणि स्वतंत्र काश्मीरची नारेबाजी धोक्याचा इशारा देणारी आहे. बहुधा येथील लोकांनीही एवढी अस्थिरता आणि वाईट दिवस यापूर्वी कधी बघितले नसावेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणी याला चकमकीत ठार मारण्यात आल्यानंतर खोऱ्यात जी अराजकता माजली त्यावर नियंत्रण मिळविण्यात जम्मू-काश्मीरचे सरकार आणि सुरक्षा दलालाही अपयश आले आहे. या आठ-दहा महिन्यांच्या काळात राज्यात उफाळलेल्या हिंसाचारात शंभरावर लोक मृत्युमुखी पडले असून, जवळपास १२ हजार लोक जखमी झाले आहेत. याशिवाय पॅलेट गनच्या माऱ्यात एक हजार लोकांनी आपली एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे. येथे नुकत्याच झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये केवळ ७.१४ टक्केच मतदान झाले. यावरून येथील लोकांच्या मनात खदखदणारा असंतोष आणि दहशत लक्षात यावी. सुरक्षा यंत्रणेची चिंता वाढविणारी आणखी एक बाब म्हणजे येथील तरुणांचा दहशतवादाकडील ओढा वाढत चालला आहे. गेल्या वर्षभरात २५० तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला असल्याचे समोर आले आहे. या परिस्थितीमुळे काश्मिरी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसते आहे. येथील लोकांच्या मनातील परकेपणाची भावना तीव्र झाल्याचे स्पष्ट दिसत असून, केवळ बळाच्या वापराने त्यांच्यातील ही अस्थिरता दूर होईल असे वाटत नाही.