शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खोऱ्यातील वणवा

By admin | Updated: April 24, 2017 00:19 IST

काश्मीर खोऱ्यात शासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दलांविरुद्धचा असंतोष पराकोटीला पोहोचला आहे. खोऱ्यात पेटलेल्या या वणव्याने आता

काश्मीर खोऱ्यात शासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दलांविरुद्धचा असंतोष पराकोटीला पोहोचला आहे. खोऱ्यात पेटलेल्या या वणव्याने आता तेथील विद्यार्थ्यांनाही आपल्या कवेत घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यानच्या संघर्षात येथील बेरोजगार तरुण जवानांवर दगडफेक करताना दिसत असत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालयीन विद्यार्थीही या दगडफेकीत सामील झाल्याचे चित्र समोर आले आहे. पुलवामा येथील महाविद्यालयात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईच्या विरोधात काश्मिरी विद्यार्थी रस्त्यावर आले असून, परिस्थिती आणखी चिघळली आहे. विद्यार्थ्यांकडून होणारी ही दगडफेक आणि स्वतंत्र काश्मीरची नारेबाजी धोक्याचा इशारा देणारी आहे. बहुधा येथील लोकांनीही एवढी अस्थिरता आणि वाईट दिवस यापूर्वी कधी बघितले नसावेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणी याला चकमकीत ठार मारण्यात आल्यानंतर खोऱ्यात जी अराजकता माजली त्यावर नियंत्रण मिळविण्यात जम्मू-काश्मीरचे सरकार आणि सुरक्षा दलालाही अपयश आले आहे. या आठ-दहा महिन्यांच्या काळात राज्यात उफाळलेल्या हिंसाचारात शंभरावर लोक मृत्युमुखी पडले असून, जवळपास १२ हजार लोक जखमी झाले आहेत. याशिवाय पॅलेट गनच्या माऱ्यात एक हजार लोकांनी आपली एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे. येथे नुकत्याच झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये केवळ ७.१४ टक्केच मतदान झाले. यावरून येथील लोकांच्या मनात खदखदणारा असंतोष आणि दहशत लक्षात यावी. सुरक्षा यंत्रणेची चिंता वाढविणारी आणखी एक बाब म्हणजे येथील तरुणांचा दहशतवादाकडील ओढा वाढत चालला आहे. गेल्या वर्षभरात २५० तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला असल्याचे समोर आले आहे. या परिस्थितीमुळे काश्मिरी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसते आहे. येथील लोकांच्या मनातील परकेपणाची भावना तीव्र झाल्याचे स्पष्ट दिसत असून, केवळ बळाच्या वापराने त्यांच्यातील ही अस्थिरता दूर होईल असे वाटत नाही.